भारत सरकारच्या आधिपत्याखाली असलेल्या सरकारी खात्यांमध्ये सर्वांत जास्त कर्मचारी वर्ग हा रेल्वेखात्यात नोकरी करतो. त्यांची संख्या अंदाजे १४ लाखांपर्यंत आहे. साधारणपणे दर ४५० ते ५०० भारतीयांमध्ये एक व्यक्ती ही रेल्वेशी संलग्न असते. हा आकडा ज्यांना रेल्वेकडून पगार मिळतो त्यांचा आहे, रेल्वेशी जोडल्या गेलेल्या अनेक कंपन्या, बांधकामांवरील कर्मचारी, हे यांहून निराळेच असतात. स्टेशनवरील अनेक जोडधंद्यात असलेली मंडळी […]
१८५७ चा स्वातंत्र्य संग्राम पुकारले गेले, अवध मध्ये बेगम हजरत महल आणि त्यांच्या सैन्याने इंग्रजी सैन्यावर जोरदार हल्ला बोल केला, पहिल्या हमल्यात त्यांना माघार घ्यावी लागली, अवध मधील गोंडा, फैजाबाद, सलोन, सुल्तापुर, सितापुर, बहराईच प्रांत इंग्रजमुक्त झालेत. बेगम हजरत महल च्या कुशल नेतृत्वाने प्रभावित होऊन इतर राज्य पण त्यांच्या बरोबरीने लढले. बेगम हजरत महल स्वतः हत्तीवरून या युद्धात आपल्या सैन्याचे नेतृत्व करत होत्या. […]
लहानपणी बेहड्याची फळं दगडाने ठेचायची आणि त्यातील पिवळा गर खायचे मुलांचे उद्योग असायचे. बांधाच्या कडेने असणारे बेहडा खरं तर लक्ष्य वेधून घेणारा वृक्ष कधीच नव्हता. हिवाळा संपून उन्हाळा चालू झाला की यांच्या पिवळसर फुलांची रास झाडाखाली पडलेली दिसते आणि तेवढाच घमघमाट. बेहडा वर्षभर एवढी रूपे बदलतो की प्रत्येक ऋतू मध्ये त्याच्या नव्याने प्रेमात पडावं. लालसर पालवी […]
बद्रीनाथपासून साधारण ३ कि.मी. अंतरावर मूर्तीमातेचे मंदीर आहे. सहस्रकवच राक्षसाचा वध करण्यासाठी श्रीविष्णूंनी नर-नारायणाच्या रूपात मूर्तीमातेच्या उदरात प्रवेश केला व भूतलावर प्रगट झाले. त्यामुळे मूर्तीमाता बद्रीनाथाची आई समजून तिची पूजा केली जाते. मूर्तीमातेच्या मंदिराला माता मंदीर म्हणतात. वामन द्वादशीच्या दिवशी बद्रीनाथाची व मातेची भेट घडवून आणली जाते. शृंगारलेली बद्रीनाथाची चांदीची चतुर्भूज उत्सवमूर्ती वाजत गाजत या ठिकाणी […]
नमामो वयं मातृभूः पुण्यभूस्त्वाम् त्वया वर्धिताः संस्कृतास्त्वत्सुताः अये वत्सले मग्डले हिन्दुभूमे स्वयं जीवितान्यर्पयामस्त्वयि || हे मातृभूमी, हे पुण्यभूमी, आम्ही तुझ्या मुली ज्यांचे तू पालन-पोषण केले, संवर्धन केले तुला नमस्कार करतो. हे वत्सले, मंगले, हिंदुभूमे तुझ्यासाठी आम्ही आपले जीवन समर्पण करतो. प्रार्थने मध्ये शक्ती असते हे आपण जाणतोच, त्याचे फळ अजूनच उच्च होते जेव्हा प्रार्थना सामूहिक केली […]
आपल्या शिक्षणासाठी करावा लागलेला झगडा बघून त्यांना त्यांच्या कामासाठी क्षेत्र निवडणे सोपं झालं. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी काम करायचे ठरवले आणि स्वतःला झोकून देऊन समाजसेवेचे हे व्रत हाती घेतले. नुसतेच पुस्तकी शिक्षण नाही तर शारिरिक शिक्षणावरही त्यांनी भर दिला. मुलींनी स्वतःच्या रक्षणार्थ इतरांवर अवलंबून राहणे त्यांना मान्य नव्हते. १९२१ सालच्या बंगाल मधील भीषण पुराच्या काळात, ढाका महिला मंडळ स्थापन करून, त्याच्या मार्फत नेताजींना भरपूर पैसा गोळा करून दिला. […]
रेल्वेमधला तिकीट तपासणीस अर्थात टी.सी. हा एक स्वतंत्र विषयाचा मामला आहे. या टी.सी.नावाच्या व्यक्तीबद्दल प्रवाशांच्या मनात नेहमीच थोडीशी भीती असते आणि आतून सुप्त राग खदखदत असतो. ‘प्रसंगी दंडाची रक्कम यांच्या हातांत पैसे दाबून टाळता येते’, ‘ते लाचखाऊ असतात’ असाही एक अपसमज जनसामान्यांमध्ये ठसलेला असतो. प्रवाशांवर वचक ठेवणारे आणि स्वत:विषयीचे समज-गैरसमज सोबत घेऊन काम करणारे हे टी.सी. […]
चित्रपटाच्या सुरवातीचा दारुड्या, मध्यंतरी सुधारलेला व हिंदुरावांच्या फॅक्टरीत काम करणारा विश्वासू पण शेवटी सत्याचा छडा लागावा यासाठी उपोषण करणारा एक चळवळ्या माणूस ही जी रेंज डॉ. लागूंनी दाखवलीय, तिला तोडच नाही. […]