नवीन लेखन...

विविध प्रकारची परिक्षणे आणि परिचय

फितूर दिवसांचे संदर्भ

ज्या संदर्भात माणसं जगलेली, असतात, ती जेव्हा बदलतात , फितुर होतात, तेव्हा एकाकी होण्याची संभावनाची, नैराश्याची भावना जास्त असतें.सभोवताली पसरलेल्या उजाड वस्त्या, फितूर झालेले हंगाम, डाटा जीबी वरचे जग, व्यवस्थेच्या टाचाखाली जगणारी हतबल माणसं पाहून येणारी हतबलता या सर्व बाबींचा धांडोळा कवी स्वप्नील मेश्राम यांनी घेतला आहे. […]

गदिमांच्या पंचवटीतून

या पुस्तकात १ मुकी अंगडी बालपणाची… २ रंगीत वसने तारुण्याची… ३ लेणे वार्धक्याचे ह्या शीर्षकानुसार मायाताई यांनी तीन भागात माहिती दिली आहे. पहिल्या भागात त्यांनी लग्नापूर्वीच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यात त्यांनी कर्जत जि. रायगड येथील आरेकर वाडा व तेथील आई, वडील, आजी आजोबा, काका, काकू व लहान भावंडे यांच्या बद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत. […]

शिक्षण प्रक्रियेला दिशा देणारे “अभ्यासाचे तंत्र आणि मार्कांचा मंत्र”

सध्याच्या शिक्षण पद्धतीमधील नेमके मर्म ओळखून डॉ. चंद्रकांत कणसे यांनी अभ्यासाचे तंत्र आणि मार्काचे मंत्र हे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासाठीचे उपयुक्त असे मौलिक मार्गदर्शन या पुस्तकाद्वारे केले आहे. बालकापासून पालकापर्यंत शिक्षणा बाबत अनेक संभ्रम आहेत, अनेकांचे शिक्षणा मधील संकल्पनेचे संबोध स्पष्ट नाहीत. […]

रिवर्सल मंत्र

ज्यांनी मधुमेहाचे जीवघेणे अनुभव सोसले, वडिलांच्या मधुमेहाचा दीर्घ लढा पाहिला असे गोल्ड मेडलिस्ट डॉ. चंद्रकांत कणसे यांनी अनुभवातून जाणले की मधुमेह हा केवळ औषध व इंजेक्शन घेऊन बरा करता येत नाही, तो जीवन शैलीशी निगडित आहे. युट्युब वरील त्यांच्या अनेक व्याख्यानामधून व इतरत्र झालेल्या अनेक व्याख्यानांमधून ते सडेतोडपणे काय करायला पाहिजे ते सांगतात. सगळं संपलं आहे असं वाटणाऱ्यांना व नैराश्य आलेल्यांना हे पुस्तक मधुमेहातून नक्कीच बाहेर काढेल. […]

करपलेल्या बालपणाचा व्याकुळपट – अरसड

या कादंबरीतील काही पात्राच्या माध्यमातून उदाहरणार्थ चक्रम, यादव, गंगा,सूर्याजी,मारुती ही पात्रे व्यंकटेश सोळंके आपल्यासमोर व्यक्तीचित्रणाची फळी उभी करतात.अनेक नातेसंबंध हे दिखाऊ असतात त्यातलं पोकळ असणं काय असतं हे आपल्याला अस्वस्थ करून जातं. श्रद्धा, अंधश्रद्धा याबाबत समाजात असलेली धारणा, पूर्वपार चालत आलेल्या प्रथा, परंपरा, विविध चालीरीतीतून साकारलेलं समाजमन सर्वसामान्या […]

क्रिकेट एक बहाणा

लाहोरच्या हॉटेलपर्यंतच्या प्रवासात तो बरंच काही बोलत होता. किती सांगू आणि किती नको, असं त्याला होऊन गेलं होतं. टॅक्सीच्या मालकाला तेव्हा रोज तीनशे रुपये आपल्याला द्यावे लागतात, असं तो म्हणाला, त्याचा अर्थ मला उमजला होता. रोज तीनशे रुपयांखेरीज आणखी तीनशे रुपये तरी त्याला मिळायला हवेत. त्यातून तो पेट्रोलसाठी किती खर्च करत असेल आणि घरखर्चासाठी त्याच्या हातात किती पैसे राहत असतील, हा प्रश्नच होता. […]

लाहोरच्या ग्रंथालयात

लाहोरमधल्या वेगवेगळ्या भागांची माहिती करून घ्यायला लागलो. मी त्याला ‘इथलं सर्वांत मोठं ग्रंथालय कोणतं?’ असा सवाल केला. तेव्हा तोच म्हणाला, “तुम्हांला दयाळसिंग ग्रंथालयाबद्दल कुतूहल दिसतंय. मी लगेचच विचारलं, “हे तुम्ही कसं ओळखलंत?” त्यावर तो छद्मीपणानं हसत म्हणाला, की ‘इथे येणारे भारतीय दयाळसिंग ग्रंथालयाविषयी न चुकता विचारतात. आता तिथे तुम्हांला जे हवं ते सापडेल असं मात्र नाही. […]

पेशावरमधले थरारक स्वागत

लाहोरमध्ये एक रात्र काढून पेशावरकडे जायचं असल्यानं हॉटेल शाहताजवर सामानाची उचकाउचकी करत बसलो नाही. खालच्या मजल्यावर असलेल्या हॉटेल व्यवस्थापकाकडे पेशावरला कसं जाता येईल, या संदर्भात माहिती घ्यायला मी गेलो. तो मला म्हणाला, ‘आत्ता रात्री आठनंतर पेशावरला जाणाऱ्या बऱ्याच बसेस पलीकडून सुटतात. त्यांपैकी कोणतीही घेतलीत तरी पेशावरला जाता येईल. […]

पाकिस्तानमधला प्रवेश

१९९६ च्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी खरंच पेशावरमध्ये तिच्या घरी जाऊन उभा राहिलो, तेव्हा रझियाचा स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसेना. ‘गोखलेसाब आप? ‘ म्हणतानाचे तिच्या डोळ्यांतले अत्यानंदाचे ते भाव आणि न्यूयॉर्क सोडतानाचा तो चेहरा यात बरंच अंतर होतं. रझियाच्या भावांनी तर अगदी आलिंगन देऊन स्वागत केलं. मी त्यांच्या शेजारी बसलो. फोटो काढले, म्हटलं पाहा, ‘तुमच्या माझ्यात काही फरक आहे का? ‘ त्यांच्याबरोबर जेवलो. पेशावरमध्ये फिरलो. यात कुठेही दोन राष्ट्रांतल्या शत्रुत्वाची दरी नव्हती. […]

पाकिस्तानात डोकावणारा भारत

पर्यटकाच्या रूपानं एखादा लेखक जेव्हा देशा- परदेशात प्रवास करतो, तेव्हा त्याच्या मनात अनेक गोष्टींचा कल्लोळ उठतो. त्याच्या मनातला लेखक अनेक नव्या गोष्टींचा तिथे शोध घेऊ लागतो. या नव्या देशात, नव्या भागांत जेव्हा तो तिथल्या वैशिष्ट्यांची माहिती घेत असतो, तेव्हा त्यात स्वदेशाचं कुठं दर्शन घडतयं का, ते उलगडून पाहू लागतो. पाकिस्तान हा देश कधीकाळी आपल्या देशाचा अविभाज्य घटक होता, या भावनेनं त्याचं मन उचंबळून येतं. […]

1 2 3 36
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..