नवीन लेखन...

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील पर्यटनस्थळांचा परिचय – वाचकांच्या नजरेतून…

कोकणातील अष्टविनायक

कोकणवासीयांचे आराध्य दैवत म्हणून सर्व थरातून फार वर्षांपासून गणेशाची उपासना कोकण प्रांतात होते. आंबा, नारळ, फणस, सुपारीसारख्या प्रसिद्ध फळांप्रमाणेच कोकणातला गणेशोत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक कोकणी माणूस या उत्सवाला तरी हटकून आपल्या गावी जाणारच. परशुरामाने स्थापन केलेल्या या कोकणभूमीमध्ये काही प्रसिद्ध गणेशस्थाने आहेत. त्याचा प्रचार आणि प्रसार जरी मोठ्या प्रमाणात झाला नसला तरी ती स्थाने अत्यंत सुंदर, देखण्या मूर्ती असलेली व अत्यंत पवित्र स्थाने आहेत. […]

मराठवाड्यातील अष्टविनायक

अष्टविनायक ही संकल्पना आपल्या सगळ्यांना परिचित असून आपण सर्वजण त्या स्थानांची आवर्जून यात्रा करतो. ही अष्टविनायकांची स्थाने बरीचशी प्राचीन असून या प्रत्येक स्थानाला पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक बैठक आहे. या सर्व गणेशस्थानांमध्ये देवांनी, असुरांनी, ऋषींनी, भक्तांनी गणेशाची आराधना केलेली असून त्याचे प्रतीक म्हणून गणेशमूर्तीची स्थापना केलेली आढळते. […]

नागांवची श्री दक्षिणाभिमुखी महाकाली

अतिशय श्रध्देय असणारे जागृत देवस्थान आहे. देऊळ चौसोपी असून भक्तांच्या वंदन पूजन, अर्चन, भजन, किर्तन, पादसेवन आदि सेवांच्या परिपूर्तीसाठीच मुख्यत्वे बांधलेले असल्यामुळे त्याची रचना, उभारणी अतिशय साधी आहे. देवळाचा अलिकडेच जिर्णोध्दार करण्यात आला आहे. हे करताना देवळाच्या मूळ धाटणीत बदल करण्यात आलेला नाही. देऊळ आंग्रे कालीन (वा कदाचित त्या पूर्वीपासून) अस्तित्वात असावे असे पुरावे उपलब्ध आहेत. […]

सिद्धीविनायक यात्रेतील आठवणी

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील २१ सिद्धीविनायक यात्रेला जाण्याचा योग आला. औरंगाबादहून नागपूरच्या रस्त्याला लागलो. मध्ये यवतमाळच्या अलीकडे जानक एक आठ- नऊ वर्षांचा मुलगा सारखा आमच्या मागून धावत येत होता. धावताना काही खाणाखुणा करीत होता. […]

कथा गणेशाच्या

जपानमध्ये गणपतीची २५० देवळे आहेत. कन्जिटेन या नावाने तो तिकडे ओळखला जातो. कन्जिटेन म्हणजे भाग्यदेवता. सुखकर्ता, समृद्धी देणारी देवता. मध्य अशिया आणि जगातल्या अन्य भागात गणपती या देवतेची फार पूर्वी साग्रसंगीत पूजाअर्चा कशी होत असे ते ऑक्सफर्डने प्रसिद्ध केलेल्या अनेक पुस्तकातून वर्णिले आहे. […]

यात्रा छप्पन्न काशी विनायकांची

प्राणी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काशीक्षेत्र त्याला मान, प्रतिष्ठा, ऐश्वर्य, अन्न-पाणी, आसरा, भक्ती, ज्ञान देत राहील आणि अंतःसमयी त्याला मोक्ष प्राप्त करुन देईल, असे म्हटले जाते. काशीक्षेत्राचे महत्त्व सांगणारे असे अनेक प्राचीन व अर्वाचीन ग्रंथ आहेत. […]

श्रीनगर – काश्मीर रेल्वे : स्वप्न की सत्य?

काश्मीर भारताशी रेल्वेने जोडलं जाईल हे १२५ वर्षांपूर्वीचे स्वप्न.  या रेल्वेमार्गाच्या बांधणीची पहिली कल्पना १८८९ मध्ये काश्मीर संस्थानातील डोगरा जमातीचे प्रमुख महाराजा प्रतापसिंग यांनी मांडली होती. जम्मू-श्रीनगर रेल्वे प्रकल्पाचं ऑफिस रीआसी या गावात उघडलं होतं. […]

परिक्रमा श्री अष्टविनायकांची

भारताची भूमी आध्यात्मप्रवण आहे. भारतीय लोक स्वभावतःच धर्मनिष्ठ आणि पापभीरू आहेत. देवावर त्यांची अलोट श्रद्धा आहे. इथे अनेक देवदेवता आणि त्यांची देवळे आहेत. ब्रह्मा-विष्णू-महेश-श्रीकृष्णा… प्रमाणेच इथे ‘श्रीगणपती’ या देवालाही लोकमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. गणांचा अधिपती म्हणून याला गणपती म्हणतात. कुणी सुखकर्ता तर आणखी कुणी विघ्नहर्ता असेही म्हणतात. […]

झापगावचा प्राचीन भूपतगड

…सन १९६०मध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ठाणे जिल्ह्याचा नकाशा संकोचला.
दमणगंगेच्या ऐलपैल तीराजवळील संजाण, उंबरगाव आदी २७ गावे गुजरात राज्याला जोडली गेली, तरीही आजघडीला ठाणे जिल्ह्यात ५५ गडकिल्ले अवशेष रूपाने आपणास पाहता येतात. […]

बार्सिलोनातले beggars…

बार्सिलोना तसं म्हणाल तर मुंबई सारखंच खूप मोठ्ठ आणि पसरलेलं Spain मधील एक शहर! त्यामुळे सहाजिकच अफाट लोकसंख्या आणि त्यातूनच निर्माण झालेली उत्कृष्ठ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (Public Transportation)! […]

1 2 3 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..