जड झाले (मोठेपणाचे) ओझे !
एखाद्याची कोठलीही तयारी नसताना आयुष्य त्याला/तिला बखोटं धरून उचलतं आणि जबाबदाऱ्या खांद्यावर सोपविण्यासाठी उभं करतं. शरीर आणि मन मुलांना मोठ्यांचे काम शिरी घेण्यासाठी तयार करतात-बऱ्याचदा मनाविरुद्ध ! […]
नियमितपणे प्रसिद्ध होणार्या मजकूरासाठी खास सदरे
एखाद्याची कोठलीही तयारी नसताना आयुष्य त्याला/तिला बखोटं धरून उचलतं आणि जबाबदाऱ्या खांद्यावर सोपविण्यासाठी उभं करतं. शरीर आणि मन मुलांना मोठ्यांचे काम शिरी घेण्यासाठी तयार करतात-बऱ्याचदा मनाविरुद्ध ! […]
राज कपूर साठी रचलेल्या या गीतपंक्ती दोनदा खऱ्या ठरल्या – १९८७ साली त्याच्या मृत्यूच्यावेळी आणि आता २०१९ मध्ये त्याने निर्मिलेली हिंदी चित्रसंस्कृतीची वास्तू ” आर के स्टुडीओ “अस्तंगत होत असताना ! हे गीतकाराचे द्रष्टेपण म्हणायचे कां ? येणाऱ्या काळाची चाहूल इतकी आधी लागू शकते कां ? कदाचित हे चिरंतन सत्य काहींना आधीच कळत असावे. […]
मन,देह आणि आत्मा यांचे क्लिष्ट मिश्रण म्हणजे मानव ! या तिघांची एकमेकांशी जुळवून घेण्याची सतत धडपड सुरु असते. आणि त्या जुळणीवर आणि परस्परांमधील समन्वयावर व्यक्तीचे आरोग्य आणि चैतन्य अवलंबून असते.माणसाचे वर्तन, मानसिक प्रक्रिया,संवाद या तिघा घटकांवर अवलंबून असतात. […]
चित्रपटाच्या पांढऱ्या पडद्यावर दिसणारे सगळे खरे आणि म्हणून भावनांना अपील करणारे असते या वयातून मी गेलोय. […]
आपल्यातील सुंदर नात्याचा अस्त कधी,कसा आणि कां झाला, कळलेच नाही. एकेकाळी फार गळ्यात गळा नसले तरी गेलाबाजार आपल्यात बऱ्यापैकी संबंध होते. खूप काही सुचायचं, आत काहीतरी रटरटत असायचं. खूपदा सकाळी उठल्यावर मस्त लिखाण व्हायचं. त्याला कुठलाही फॉर्म वर्ज्य नव्हता. हातात हात धरून मस्त वाटचाल सुरु होती. लिहिलेलं छापूनही यायचं. बोटांना जणू परीस चिकटला होता. उमटलेला,हाती घेतलेला प्रत्येक शब्द झळाळून जायचा. थोडंफार नांव झालं. शब्दांमुळे कधी व्यासपीठही मिळालं. किंचित आणि क्वचित कमाई झाली.खूप जीवाभावाचे मैत्र झाले-ही कमाई अधिक मोलाची ! […]
नुकताच हरिहरेश्वरला अथांग समुद्र भेटला. मी त्याच्या टप्प्यात भान हरपून उभा असतानाचा हा फोटो. मला समुद्र व्हायला अजून खूप वेळ लागणार आहे? […]
दहिवली या खेड्याचा आधार घेत कर्जत स्टेशनची बांधणी झाली. दहिवली, वेणगाव, तमनाथ, कडाव अशा अनेक खेड्यांना पेशव्यांनी भेटी दिल्याचाही उल्लेख आहे. १८५३ मध्ये मुंबई-ठाणे या मार्गावर सुरू झालेली रेल्वे १८६० सालापर्यंत कल्याण, बदलापूर, नेरळ, कांपोली (खोपोली) असा अडीच तासांचा रेल्वेप्रवास करीत होती. त्यावेळी मुंबई ते खोपोली तिकीट होतं २ रुपये. याच मार्गावर घाटाच्या पायथ्याशी रेल्वेमार्गांच्या बांधकामाचं सामान उतरवण्याकरता म्हणून व घाटात आवश्यक असलेला गाडी चढण्यापूर्वीचा मोठा थांबा, अशा दोन कारणांकरता कर्जतच्या अवाढव्य स्टेशनची बांधणी झाली. […]
दुःख वाटल्याने कमी होतं म्हणे ! हेही पटत नाही. माझ्याकडचं एक किलो दुःख चार जणात वाटल्याने ते प्रत्येकी २०० ग्रॅम ( मी धरून पाच ) होत नाही. माझ्यासाठी ते एक किलोच राहतं आणि प्रदीर्घ काळ टिकतं . नवं दुःख आलं म्हणजे जुनं विसरलो असं होत नाही. ते सतत असतच आणि एकाकी असताना नव्याने, पूर्ण शक्तीनिशी भिडतं. […]
नात्यांनी,जवळीकेने आजकाल चकीत व्हायला होतं – जी नाती कधी रुजतच नाहीत, ती जवळ आल्यावर धसकल्यासारखं होतं आणि दूर गेली की सुस्कारा सोडल्यासारखं हायसं वाटतं. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions