Articles by रविंद्रनाथ गांगल
कल्हईवाला – जुनी आठवण
स्टीलच्या, हिंडालियमच्या भांड्यांची चलती असली तरी या जमान्यात पितळी भांडीसुद्धा वापरली जातात. साहजिकच कल्हई करणे आले. दारी येणारा कल्हईवाला तात्काळ सेवा देणारा असतो. […]
नावात काय नाही?
भारतात गाजणारा एक विषय आहे तो म्हणजे नामांतराचा, जे नाव सध्या आहे ते बदलण्याच्या मागणीचा. हे नाव कशाचेही असू शकते. रस्ता, चौक, बाग, शहर, जिल्हा, राज्य यांचे वा बस स्टँड, रेल्वे स्टेशन, विमानतळ यांचे वा विद्यापीठ, आस्थापना यांचे. स्वतःचे नाव बदलणारांची दखल बाकीच्यांनी घ्यायची गरज नसते. पण या सार्वजनिक ठिकाणांची नावे बदलण्यासाठी जनमताचा कौल घ्यावा लागतो. नाव बदलण्याचा आग्रह धरणारे ‘नावात काय नाही’ ची वाट धरणारे असतात. […]
दुसर्या महायुद्धातील ‘ही शर्यत रे अपुली’
शर्यत दोन वा अधीक प्रतिस्पर्ध्यांमधे असते. ती स्थळ काळ ठरवून होते. स्पर्धकांना एकमेकांच्या तयारीचा अंदाज असतो. ससा आणि कासव हे मित्र धावण्याची शर्यत ठरवतात. तयारीत ससा वरचढ असल्याचे माहीत असते. पण अनपेक्षितपणे कासव ही शर्यत जिंकतो. अशीच एक शर्यत दुसर्या महायुद्धात लागली होती. ‘दुसरे महायुद्ध’ या विषयावरील हा दुसरा लेख. […]
दुसर्या महायुद्धातील ‘समज गैरसमज’
दुसर्या महायुद्धावरील अनेक पुस्तकांच्या वाचना दरम्यान समज गैरसमज यांची ही उदाहरणे माझ्या स्मरणात राहिली. या घटना मी अगदी संक्षेपात मांडल्या आहेत. काही वेगळे समोर ठेवावे या हेतूने बॉंबची सर्वश्रृत नावे (Little boy, Fat man) न सांगता त्यांचे प्रकार सांगितले आहेत. युद्ध रम्य नक्कीच नाही, पण युद्धकथा काहीतरी विचार करण्यास वाव देतात ना? ‘दुसरे महायुद्ध’ या विषयावरील हा पहिला लेख. […]
सुजाण नागरिकत्व म्हणजे काय?
‘ज्या देशाचा नागरिक सुजाण आहे, तो देश समृद्ध आहे.’ या वाक्याने मी लेखाची सुरुवात करीत आहे. त्यातील शब्दांची संकल्पना अशी आहे. नागरिकः सृष्टीमधील घटक सजीव व निर्जीव या प्रकारांमधे विभागता येतात. सजीवांचे वनस्पती व प्राणी यात वर्गीकरण करता येते. प्राण्यांचे मनुष्य व इतर प्राणी असे भाग पाडता येतात. ‘मनुष्य’ या प्राण्याचे पुढील भेद देश, समाज यानुसार […]
कोण जिंकले?
शांतपणे चालणारा कुत्रा बहुधा हसत असावा. मनातल्या मनात म्हणत असावा – ‘’Valentine Day ला आपण बाजी मारली. समोरून जाणार्या आपल्या ‘श्वान मैत्रीणीला’ आपण आधी भेटलो. अब मालिक जाने और उसकी Girl Friend जाने. मालक ‘अष्टावधानी’ तर मी ‘प्रसंगावधानी’.’’ […]
बिघडलेल्या आठवणी
स्मरणाशी संबंधित सर्व बिघाड गंभीर नसतात. ‘गाड्यांच्या गर्दीत आपण कार कुठे पार्क केली ते आठवत नाही’ ही काही मोठी बाब नाही, पण आपण पार्किंग लॉटमधे कसे आलो हे आठवत नसेल तर ती गंभीर समस्या असते. आपल्याला एखादी गोष्ट आठवली नाही वा चुकीची आठवली तर आपण कावतो, कधी अपराधी वाटतं, तर कधी खजिल व्हावयास होतं. असा अनुभव सर्वांना येत असतो आणि वयाच्या सर्व टप्प्यांमधे येतो. […]
झिगार्निक परिणाम
‘आपला मेंदू पूर्ण झालेली कामे अल्पकालीन स्मृतीतून काढून टाकतो.’ याला म्हणतात ’ झिगार्निक परिणाम’ (Zeigarnik Effect). ब्लूमा झिगार्निक या रशियन मानसोपचारतज्ञ महिलेने केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष निघाला. […]
