भारतातील डिजिटल इकोसिस्टमची वाढ अनेक घटकांमुळे झाली आहे, ज्यात सरकारचा डिजिटलायझेशनवरचा जोर, इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वाढलेला वापर आणि ई-कॉमर्सचा उदय यांचा समावेश आहे. भारत सरकार डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया सारख्या विविध उपक्रमांद्वारे डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरास सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे. […]
पर्यटन या विषयाच्या कक्षा आता रुंदावल्या आहेत. काँक्रिटच्या जंगलाला कंटाळून प्रत्येकाला सुटीच्या दिवशी निसर्गरम्य शांत परिसरात जाण्याची ओढ लागली आहे. सुखवस्तूंच्या सोबतच आता मध्यमवर्गीय माणूसही मोठ्या संख्येने पर्यटनासाठी बाहेर पडू लागला आहे. पर्यटनासाठी चार पैसे खर्च करण्याची सर्वसामान्यांचीही मानसिक तयारी झाली आहे. यामुळेच पर्यटन हा आता जगभरात व्यवसाय बनला आहे. […]
आज जगातील प्रत्येक विकसित व विकसनशील देशात शेअर बाजाराचे अस्तित्व आहे. भारतात पहिला संघटित शेअर बाजार १८७५ मध्ये मुंबईमध्ये स्थापन झाला जो आशियातील सर्वात जुना बाजार आहे. […]
महाराष्ट्र राज्याला विशेषतः कोकणामध्ये खारे, गोडे आणि निमखारे पाणी असे तिन्ही प्रकारचे नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत. या उपलब्ध असलेल्या नैसर्गिक जलस्रोतांच्या सुयोग्य नियोजनाद्वारे मत्स्य उत्पादन वाढवून नीलक्रांती घडविणे ही काळाजी गरज आहे. देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात मत्स्य व्यवसायाचा महत्त्वाचा वाटा आहे. कोकणामध्ये सागरी मासेमारी व्यवसायामुळे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील लोकांकरिता स्वस्त व पोषक अन्न उपलब्ध होते. त्याचबरोबर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. या अनुषंगाने या लेखामध्ये कोकणातील सागरी मासेमारी या विषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. […]
निसर्गरम्य, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जो कोकणाला लाभलेला आहे, तो वारसा कायमस्वरूपी जपण्यासाठी स्थानिक लोक, सरकार तसेच पर्यटन व्यावसायिक ह्या सर्वांनी एकत्र येऊन कोकणासाठी पर्यटन टिकविण्याच्या दृष्टिकोनातून काम केले पाहिजे. […]
कोकण म्हणजे एक अंगठी मानली तर त्यात कोकम म्हणजे माणिक, पाचू म्हणजे हिरवागार निसर्ग आणि नारळ म्हणजे गोमेद अशी तीन रत्न त्यावर जडली आहेत असं म्हणायला हरकत नाही. आहे त्यात भागवण्यापेक्षा जे आहे त्यात साजरं कसं करता येईल असा स्वभाव असणाऱ्या कोकणी माणसाकडे आदरातिथ्य यथायोग्य होतंच. […]
रुपयाचे मूल्य घसरतेय, त्याचे ‘अवमूल्यन’ होतेय, अशा बातम्या आपण नेहमीच वाचतोय, ऐकतोय! मग रुपयांचे मूल्य म्हणजे काय? ते मूल्य कशावरून ठरते? रुपयाचे मूल्य घसरते म्हणजे नक्की काय होते? त्याचे परिणाम काय होतात? त्यावर उपाय कोणते? […]
पंतप्रधानांनी आत्मनिर्भरता हा मंत्र दिला ‘लोकल को व्होकल कीजिए’ म्हणजे जे लोकल आहे त्याचा गाजावाजा करा. लोकल उत्पादने लोकांनी जास्तीत जास्त विकत घ्यावीत, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ. यातून स्वदेशी उत्पादने, स्वदेशी वस्तू हा विषय नव्याने चर्चेला आला. […]
जाहिरातदारांच्या उत्पादनाच्या विक्री वृद्धीसाठी आवश्यक असणारी पहिली गुंतवणूक म्हणजे प्रसारमाध्यमांव्दारे केलेली जाहिरात होय. अनेकदा उद्योजक जाहिरातीवर आर्थिक गुंतवणूक करायला तयार नसतात. मुळातच जाहिरात ही गुंतवणूक न समजता खर्च समजला जातो. त्यामुळेच त्यांचा जाहिरातीवर होणारा खर्च अनेकदा जाहिरात करण्यापासून त्यांना रोखणारा पहिला अडथळा ठरत असतो. […]
‘जेसीबी’ हे जगातलं पहिलं यंत्र जे कुठल्याही नावाशिवाय बाजारात लाॅंच झालं.. साल होतं १९४५. ज्यांनी हे धूड बनवलं ते अनेक दिवस चिंतित होते की याचं नाव काय ठेवायचं? शेवटी याचं वेगळं नाव न ठेवता त्याच्या इंजिनचंच नाव वापरूया यावर शिक्कामोर्तब झालं.. इंजिनाचं नाव होतं जेसीबी..हे नाव ज्यांनी हे इंजिन शोधलं त्याची अद्याक्षरं होतं.. शोधकर्त्याचं नाव होतं जेसीबी अर्थात ‘जोसेफ सिरिल बमफोर्ड’. […]