सात बेटांची मुंबई एकसंध नव्हती. इथे व्यापार वाढूच शकला नसता. सर्वत्र माजलेली दलदल, सुकत घातलेली मासळी, त्यापासून बनविला जाणारा खताचा कुटाणा,अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि कीटक, भरतीबरोबर खाऱ्या पाण्याने भरून जाणारी सातही बेटे, सतत चिखल यामुळे इथे जमिनीवरून मोठी वाहतूक करणे शक्य नव्हते. […]
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात या देवीची ही त्रिगुण रूपे पाहावयास मिळतात. तेथे महालक्ष्मीबरोबरच महाकाली आणि महासरस्वती विराजमान आहे. देवी माहात्म्यातील पौराणिक आख्यायिकेनुसार, महालक्ष्मीनेच तमोगुण आणि सत्त्वगुणांपासून ही दोन रूपे निर्माण केली व त्यांना आपापल्या गुणांनी योग्य असा स्त्री–पुरुषांचा एकेक जोडा उत्पन्न करण्यास सांगितले. त्यातून पुढे विश्वाची व सृष्टीची निर्मिती झाली. […]
पुराणांनुसार ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांपैकी ब्रह्मा ही पहिली देवता आहे. तो ब्रह्मांडाचा निर्माता मानला जातो. पुराणकथांनुसार विश्वनिर्मात्याने सर्वप्रथम ब्रह्मांडिय जल निर्माण केले व त्यात एक बीज टाकले. त्यापासून सोनेरी ब्रह्मांडिय अंडे तयार झाले. त्या अंड्यातून एक हजार वर्षांनी सृष्टीकर्त्याने स्वतः ब्रह्माच्या रूपात जन्म घेतला. […]
हिरवीगार वनराई, निळाशार समुद्र आणि रुपेरी वाळूच्या किनाऱ्यावर असलेले श्रीवर्धन तालुक्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वर येथे महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. पेशव्यांचे कुलदैवत असलेले हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या या स्थानाची ‘दक्षिण काशी’ म्हणून ख्याती आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सरखेल कान्होजी आंग्रे आणि पेशवे घराण्यातील अनेकांनी येथे दर्शन घेतल्याच्या नोंदी आहेत. […]
मूळ महिकावती म्हणजे आजचे केळवे माहीम – जिल्हा पालघर. अनेक राजवंशांनी महिकावतीवर राज्य केले. व्यापारसमृद्ध शूर्पारक (म्हणजे नालासोपारा) आणि महिकावती संपूर्ण दक्षिण आशियात प्रसिद्ध होते. रोम राज्याशी इथला वाणिज्यसंपर्क भरपूर होता. […]
राज्यात पोलीसांच्या सशस्त्र मानवंदनेचा बहुमान असलेली केवळ दोन मंदिरे आहेत. पैकी पंढरपूरचे विठ्ठल देवस्थान हे पहिले आणि त्यानंतर रोह्यातील ग्रामदैवत असलेले धावीर महाराज हे दुसरे मंदिर होय. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी या मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी निघणाऱ्या पालखीला पोलीसांकडून सशस्त्र मानवंदना दिली जाते. […]
गुजरात या राज्याची पहिली पायरी चढताच जणू एक नवा जग अनुभवायला मिळतो. गजबजलेल्या उद्योग-धंद्यांसोबत इथली परंपरा, संस्कृती, रंगीत सण आणि खाद्यसंस्कृती मनाला वेगळाच ठसा उमटवतात. खाद्यसंस्कृतीचा अनुभव गुजरात मध्ये पाऊल टाकताच आपले स्वागत एका ताटाने होते – ज्यात गोड, तिखट, आंबट अशा सगळ्या चवींचा सुंदर समतोल असतो. […]
1931 साली परळ ते शिवडी रस्ता बांधण्याचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले. त्या वेळेस एक अत्यंत आश्चर्यकारक अशी मूर्ती या उत्खननात सापडली. या मूर्तीचा निर्मितीकाळ हा इसवीसन पाचवे ते सहावे शतक असा आहे. म्हणजेच भारताचा सुवर्णकाळ म्हणून गणलेल्या गुप्त काळातील ही मूर्ती आहे. […]
आजचा लेख गोमय वर आहे. शेतकरी गायीचे शेण खत शेतात टाकतो त्या बदल्यात शेतातून अन्न रूपी लक्ष्मी प्रगट होते. शेतकरी आणि जनतेचे पोषण या अन्नावरच होते. बहुतेक हेच कारण असावे शरद ऋतुत नवीन अन्न आल्यावर गोवर्धन पूजेची परंपरा आपल्या देशात आहे. […]
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक निसर्गसमृद्ध व टुमदार गाव. हे गाव प्रसिद्ध आहे ते येथील विस्तीर्ण, स्वच्छ व सुंदर समुद्रकिनाऱ्यामुळे! याच दिवेआगरची एक वेगळी ओळख निर्माण झाली ती येथील सुवर्ण गणेश मंदिरामुळे! नोव्हेंबर १९९७ मध्ये येथे सुमारे १३२० ग्रॅम वजनाचा गणेशाचा सोन्याचा मुखवटा आणि २८० ग्रॅम वजनाचे गणेशाचे दागिने जमिनीत खोदकाम करताना सापडले आणि दिवेआगर संपूर्ण राज्यात प्रसिद्धीच्या झोतात आले. […]