नवीन लेखन...

कसं हुईन तं हू माय…

अमृता खंडेराव यांचं हे कथासंग्रह म्हणजे विदर्भाच्या मातीतून उगम पावलेलं, चुलीवर शिजवलेलं आणि बोलीभाषेच्या फोडणीने झणझणीत झालेलं साहित्यिक जेवण आहे. हे पुस्तक वाचताना वाटतं, आपण एखाद्या खेड्यातल्या अंगणात बसलो आहोत, समोर चुलीवर भाकरी भाजतेय, आणि आजूबाजूच्या बायका आपापल्या कहाण्या सांगतायत—कधी हसवणाऱ्या, कधी डोळ्यांत पाणी आणणाऱ्या, पण नेहमीच मनात घर करणाऱ्या. […]

आज फिर जीने की तमन्ना है

“आज फिर जीने की तमन्ना हैं, आज फिर मरने का इरादा हैं.” बाल्कनीतल्या झोपाळ्यावर बसून पावसाला बघत कॉफी पिताना ती गुणगुणत होती. चाळीशी गाठली होती तिने गेल्याच आठवड्यात; पण तसं कोणतंच लक्षण तिच्या अंगभर कुठेही दिसत नव्हतं. […]

एक भेट सुरेश भटांची

महाराष्ट्राचे जे चार काल्पनिक भाग मानले जातात, त्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या भागांचा समावेश केला जातो. या चारीही विभागांत अनेक मान्यवर कवी, साहित्यिक, वाङ्मयकार, वक्ते यांची फार मोठी मांदियाळी आहे. आज सुरेश भट या मान्यवर वैदर्भीय कवि-गझलकार यांच्या कामगिरीचा ताळेबंद मांडताना त्याच विदर्भातल्या कवी अनिल, (आर. रा. देशपांडे), कुसुमताई देशपांडे, ग. ल्यं. माडखोलकर, प्राचार्य राम शेवाळकर, मधुकर केंचे, पु. भा. भावे अशा किती तरी नामवंत साहित्यिक वाङ्मयकारांची नावं नजरेसमोर येतात. या नावांमध्ये ठसठशीतपणानं दिसणारं एक नाव म्हणजे सुरेश भट. […]

समाजसेवा आणि भुतदया

थंडी खूपच पडली होती. संध्याकाळच्या वेळेस तर बाहेर पडणे शक्यच नव्हते. घरांतील बाहेरची कामे सकाळीच उरकून टाकण्याची आता सवयच झाली होती. गेले दोन महिने थंडीने कहरच केला होता. भाजी आणण्यासाठी सुद्धा उन्हाच्या वेळेत जाणे भाग पडत होते. एकतर अशा कडाक्याच्या थंडीत उन्हात चालायला मजा येते. दुपारच्या वेळेस तर रहदारीही कमी असते. त्यामुळे जरा आजूबाजूला नजर ही टाकता येते. […]

डाऊन टू मेमरी लेन

‘जिंदगी’ एक रेस है रफ्तार के सिवा कुछ नही. आपल्या सगळ्यांची जगण्याची ही एक पध्दतीच झाली आहे. आयुष्यभर या रेस बरोबर आपण धावतच असतो. आला दिवस गेला दिवस रुटीनच्या नावाने फक्त जगतच असतो. काही कारणांनी या रुटीनमध्ये जेव्हा खंड पडतो किंवा बदल होतो तेव्हा लक्षात येते की अरे त्या रेस बरोबर आपण धावत पळत कुठपर्यंत पुढे निघून आलो. […]

मॉर्निंग वॉक

नुकताच आमच्या अहोंच्या ‘बायपास’ नंतर हा चालू झाला. आमच्या दोघांच्याही मनावर भयंकर भीतीचे दडपण होते. ऐन उन्हाळ्याचे दिवस सकाळी उठून देवाचे नाव घेऊन आम्ही आपले निघालो. पहिल्याच दिवशी सोसायटीच्या गल्लीतले कुत्रे ‘भसाभसा’ भुंकत अंगावर आले. ते ही बिचारे काय करणार? रात्रभर गल्लीचा पहारा देऊन थकले असावे किंवा कायम गाडीतून जाणारी माणसं त्याच्या रस्त्यावर अतिक्रमण करायला आली असे बहुतेक त्याला वाटले असावे. […]

एक स्पर्श

संध्याकाळी शिंप्याकडे जायला निघाले होते. रस्ता ओलांडताना मोबाईल वाजला म्हणून बाजूला उभी राहून बोलत होते. बोलता बोलता सहज समोरच्या रस्त्याकडे लक्ष गेले एक वयोवृध्द आजी आजोबा एकमेकांचा हात धरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. […]

फ्रेंडशिप

सदैवी आनंदी, शेवटी दुखण्यातही आपल्या वेदना, दुःख काळजी कधीही तीने दाखविली नाही. मला आठवते तीच्या पहिल्या किमोच्या वेळेस मी आणि शुभा दवाखान्यात गेलो होतो. माधुरी आमच्याशी इतकी हसून गप्पा मारीत होती की आम्ही तर विसरूनच गेलो की आपण कशाला इथे आलो ते. प्रीतीने तर कमालच केली होती भरपूर चहा बिस्किटस् खाकरे घेवून चार वाजता kitty पार्टीसारखी हजर होती. […]

इंद्रधनुषी रंग नदीचे…

पावसाळा संपत आला की पक्षपंधरवाड्याची सुरुवात होते.खेड्यापाडयातून पितरांच्या सर्वत्र वावरणा-या भुकेलेल्या आत्म्यांना दरवर्षी पिंडदान करून तृप्त करण्याची प्रथा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे.शेवटी ही पिंडे नदीकाठावर कावळ्याच्या प्रतिक्षेत ठेवली जातात किंवा नदीच्या पाण्यात मासे खातील यासाठी अलगद सोडली जातात. त्यानंतर सुरु होते ती घराची स्वच्छता व शुद्धता करणे,घराच्या भिंती मातीच्याच असायच्या त्या मातीनेच सारवून स्वच्छ करायच्या.पावसाळाभर पावसाने […]

केक्या दादा

ग्रामीण भागात सर्वात कलंदर कलाकार कोण असेल तर तो म्हणजे केक्या दादा. केक्या दादाला ओळखत नाही असा शोधूनही माणूस सापडणार नाही. […]

1 2 3 307
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..