आजच्या पार्श्व गायिका पूर्णिमा म्हणजेच सुषमा श्रेष्ठ होत. सुषमा श्रेष्ठ या संगीतकार भोला श्रेष्ठ यांच्या कन्या होत. सुषमा श्रेष्ठ यांनी बाल गायिका म्हणून गायलेली ‘तेरा मुझसे है पहले का नाता कोई’ व ‘क्या हुआ तेरा वादा’ खूपच गाजली होती. […]
डॉ. सी. एन. आर. राव यांना त्यांच्या आयुष्यभराच्या विज्ञान संशोधन व विज्ञानाच्या क्षेत्रातील कामगिरीसाठी भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे. १९३४ साली जन्मलेले प्रा. राव यांनी म्हैसूर विद्यापीठातून बीएस्सी केली. प्रा. राव यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून एमएस्सी केली, तर अमेरिकेच्या पर्यु विद्यापीठातून पीएचडी केली. […]
१९३७ साली राजस्थानातल्या जोधपूर येथे जन्मलेले मनमोहन शर्मा जोधपूरच्या जसवंत महाविद्यालयातून बीएस्सी झाले. नंतर मुंबई विद्यापीठातून बीई व एमटेक या रसायन अभियांत्रिकीतील पदव्या घेतल्या. नंतर केंब्रिज येथून त्यांनी पीएच.डी. केली. त्यानंतर ते मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये अध्यापन करू लागले व पुढे या संस्थेत संचालक झाले. […]
पॉल रत्नसामी यांचा जन्म चेन्नईला १९४२ साली झाला. चेन्नईच्या विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी. आणि पीएच.डी. केली. त्यानंतर पुढील दोन वर्षे त्यांनी न्यूयॉर्क येथील क्लार्कसन तंत्रशास्त्र महाविद्यालयात संशोधन केले व पुढे बेल्जियम येथील लिव्हान विद्यापीठात प्रा. फ्रिप्लाट यांच्याबरोबर संशोधन केले. औद्योगिक उत्पादन करताना वापरावी लागणारी उत्प्रेरके (Catalyst) हा या दोन्ही ठिकाणच्या संशोधनाचा विषय होता. […]
पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे पहिले भारतीय संचालक होते डॉ. के. वेंकटरामन! त्यांचा जन्म चेन्नईचा! तेथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून १९२३ साली ते रसायनशास्त्रात एम.ए. झाले. नंतर मॅन्चेस्टर विद्यापीठातून त्यांनी पीएचडी आणि डीएससी केले. १९२७ साली ते भारतात परत आले आणि एक वर्ष बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये फेलो म्हणून कार्यरत होते. १९२८ ते १९३४ या काळात ते लाहोरच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिकवत असत. […]
डॉ. वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म १९३३ साली कोल्हापूरला झाला. कोल्हापूरला ते एमएस्सी करून त्यांनी लंडनच्या बर्मिंगहॅम विद्यापीठातून पीएचडीची पदवी प्राप्त करून घेतली. त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या एटॉमिक एनर्जी व एव्हिएशनमध्ये काम केले. या वेळी भारताच्या अवकाश संशोधनशास्त्राचे प्रमुख डॉ. विक्रम साराभाई यांन त्यांना भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमासार्ट भारतात बोलावून घेतले १९६७ साली ते थुम्ब येथे झाले […]
प्रा. हरी जीवन अर्णीकर (१९१२- २०००) यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला. बनारस हिंदू विद्यापीठातून एम.एस्सी. करून त्यांनी तेथेच ‘कोरोना इफेक्ट ॲन गॅसेस अंडर डिस्चार्ज’ या विषयावर पीएच.डी. केली. १९५५ मध्ये पॅरिस येथील प्रा. फ्रेडरिक जुलिएट क्यूरी आणि प्रा. इरेन क्यूरी या नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘सेपरेशन ऑफ आयसोटोप बाय इलेक्ट्रोमायग्रेशन इन फ्युज्ड सॉल्टस’ हा प्रबंध […]
डॉ. बाळ दत्तात्रय टिळक (१९१८ -१९९९) हे मुळातले यवतमाळ जिल्ह्यातील कारंजा गावचे. मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ तंत्रज्ञानातील बीएस्सी करून मग सायन्समधून ऑफ इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीमध्ये केमिकल त्यांनी प्रा. के. व्यंकटरामन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. केली. नंतर ते इंग्लंडला ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले व नोबेल पुरस्कार विजेते प्रा. रॉबिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सेंद्रिय रसायनशास्त्रात संशोधन केले. त्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना […]
रमेश गणेश देशपांडे (१९३४-१९९४) यांनी पुणे विद्यापीठातून एमएस्सी केले. लगेच ते मुंबईच्या भाभा अणू संशोधन केंद्रात (BARC) समस्थानिक (Isotope) विभागात रुजू झाले. बीएआरसी तेव्हा नुकतेच सुरू होत होते. आणि अशा प्रकारच्या प्रकल्पात कोणतीही परदेशी तांत्रिक मदत मिळत नसल्याने प्रत्येक शास्त्रज्ञाला अगदी मुलभूत काम करून उपकरणे बनवायला लागत व आपले नेहमीचेही करावे काम लागे. समस्थानिक विभागाचे प्रमुख […]
डॉ. विक्रम त्र्यंबक आठवले यांनी १९४५ साली बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून रसायनशास्त्रात पीएच.डी. केली. त्यानंतर त्यांनी कोलकात्याच्या नॅशनल टेस्ट हाऊस या प्रयोगशाळेत जाऊन रसायनशास्त्राच्या अद्ययावत विश्लेषण पद्धतीचे संशोधन केले. १९४९ साली डॉ. भाभा यांनी त्यांना अणू संशोधन संस्थेत काम करण्यासाठी मुंबईत बोलावून घेतले व त्यांना अॅनालिटिकल केमिस्ट्री विभागाचे प्रमुख म्हणून नेमले. पुढे ते संपूर्ण रसायनशास्त्र […]