नवीन लेखन...
Avatar
About रविंद्रनाथ गांगल
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

हसण्यावारी नेऊ नका

आपण कुटुंबप्रिय व समाजप्रिय आहोत. दैनंदिन जीवनात आपले अनेकां बरोबर संबंध येत असतात. कुटुंबातील सदस्यांनी जशी काही बंधने पाळायची असतात, तसेच अमुक एका परिस्थितीत कसे वागावे याचे काही निकष समाजाने स्वीकारलेले असतात. यापेक्षा वेगळी वागणुक दिसून आली तर ती समाजमान्य नसते. मग असं वागणार्‍याला ‘वेडा’ ठरविलं जातं ते योग्य आहे का, असा मला प्रश्न पडतो. याचे उत्तर देण्याआधी काही उदाहरणे देतो. […]

स्मृती-विस्मृती

मानवी मेंदू सर्व प्राणिमात्रांच्या मेंदूंपेक्षा प्रगत आहे. विचार करण्याची क्षमता, सामाजिक भान व भाषा ही माणसाची वैशिष्ठ्ये आहेत. आपली माहिती साठविण्याची क्षमता आपल्या कल्पनेपेक्षा तसेच आपल्या आयुष्यातील गरजेपेक्षा खूप-खूप जास्त आहे. मिळविलेल्या माहितीचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात करत असतो. मेंदूत साठविलेल्या माहितीला `स्मृती’ म्हणतात. योग्य वेळी ही माहिती वापरता येणं म्हणजे स्मरणशक्ती चांगली असणं. ही माहिती काही कारणाने आठवली नाही तर ती `विस्मृती’. […]

करायला गेलो एक

माझे ‘Culinary Skills’ कसे वाढत गेले ते ह्या प्रसंगातून कळेल. पंचवीस वर्षापूर्वी मी माझे बिर्‍हाड पॅरिसला थाटले होते. किचनमधुन ‘आयफेल टॉवर’ दिसत असे. रोजचे जेवण बनविणे सवयीचे झाले होते (ब्रेडच्या विविध प्रकारांनी मला आधार दिला). एका सुट्टीच्या दिवशी माझ्या डोक्यात रवा, साखर व तूप यांचा झिम्मा सुरू झाला व मी शीरा करण्याचा निश्चय केला. […]

यदृच्छता (Randomness)

आज Randomness ही संकल्पना जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात वापरावी लागते आहे. संगणकाच्या मदतीने हे सोपे झाले आहे. आपल्याला याची अनेक उदाहरणं सापडतील. एखादी व्यक्ती अंगावर वीज पडून मृत्युमुखी पडण्याची शक्यता फार कमी असते. तरी यंदा बिहार व उत्तर प्रदेशात वीज पडल्यामुळे अनेकांनी जीव गमावले आहेत. तशीच आणखी एक आश्चर्यकारक घटना आहे. अमेरिकेतील व्हर्जिनिया पार्कमध्ये काम करणारा रेंजर, रॉय सलिव्हन याच्या अंगावर 1942 ते 1977 या काळात वेगवेगळ्या प्रसंगी सात वेळा वीज पडली. तो प्रत्येक वेळेस वाचला व पुढे 71 व्या वर्षापर्यंत जगला. अशा असतात यदृच्छतेच्या करामती. […]

एकाकी लढा

आपला समाज कुटुंबरचनेचा पुरस्कार करतो. सर्वसाधारणपणे दोन-तीन पिढ्या एकत्र रहात असलेली कुटुंबे दिसतात. विस्तारामुळे कुटुंब विभक्त झाली तरी नाती दृढ राहतात. वेळप्रसंगी एक होतात मदतीसाठी, सांत्वनासाठी वा आनंद साजरा करण्यासाठी. असे असले तरी याला अपवाद सापडतात. अशीच एक घटना माझ्या मनाला अस्वस्थ करणारी ठरली. […]

कोरोनाची शाळा

पूर्वीच्या काळाची आठवण झाली. एक शिक्षक अनेक वर्गांना शिकवीत असत. या शाळेत मुळात एकच शिक्षक आहे. जगातले हे विलक्षण ज्ञानपीठ आहे. इथे मी काय शिकलो याची चाचणी देणे बंधनकारक नाही. मी जर एक चांगला माणूस बनू शकलो व निसर्गाचा आदर केला तर शाळा सोडल्याचा दाखला मला नक्की मिळेल. […]

देशोदेशींचे ज्ञानेश्वर

“शास्त्र हे तर्क व सिद्धांत सिद्ध करण्याच्या कसोटीवर सिद्ध होते. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या मारुती स्तोत्रातील सहा दाखले व विज्ञानातल्या संबंधित शोधांमधे साम्य आहे. अलीकडच्या काळातील या संकल्पना ३५० वर्षापूर्वी भारतातील संतांना माहीत होत्या. भारतीय विद्वानांना संतपदी बसविण्यात आले, त्यामुळे आपल्याकडील ज्ञानी लोकांना जागतिक पातळीवर मान्यता मिळाली नाही. फक्त मनन व चिंतनातून शोधनिबंधाच्या तोडीचे साहित्य विद्वानांनी निर्माण केले आहे. मग त्याला जगन्मान्यता का मिळत नाही?” […]

चित्रभाषा

मानवाला मानवपण मिळण्यास महत्वाचे कारण ठरली ती भाषा. जगभरात देशानुरूप वेश, संस्कृती व भाषा विकसित झाल्या. संपर्कमाध्यमानुसार भाषेत बदल होत गेले. शब्दमर्यादा पाळता-पाळता त्याचे कालमर्यादेत रुपांतर झाले. वेळ नाही या कारणाने लांब वाक्य, चार-पाच शब्दांचे समुह यांच्या जागी संक्षिप्त रूपे आली. ‘एक चित्र हजार शब्दांच्या बरोबर असते’ या उक्तिनुसार आता चित्रांची चलती आहे. आता ‘इमोजी’ मान्यता पावली आहे. वाक्यरचना, व्याकरण, भावना व्यक्त करणार्‍या शब्दांची निवड मागे पडू लागली आहे. सांकेतिक प्रणाली रूढ होते आहे. […]

बालपणीचा काळ सुखाचा

‘बालपणीचा काळ सुखाचा’ आठवला की हरवून जातं मन. आठवणींची झुंबड उडते मनात. दिवाळीचे व गणपतीचे दिवस, गोकुळाष्टमीचे व होळीचे दिवस, सुट्ट्यांचे व सहलीचे दिवस आठवतात. प्रत्येक सण वा प्रसंग हे आपल्याला भरभरून देत असतात. असे खास दिवस साजरे होण्यापूर्वी तयारी करण्यात वेगळीच गंमत असते, तर ते खास दिवस पार पडल्यानंतर येणारी ‘पोकळी’ ही देखिल आयुष्याच्या चक्राविषयी नकळत शिकवीत असते. […]

सुखाचे सोपे मार्ग?

संगणक व मोबाईल याद्वारे समाजमाध्यमे वापरणारांचे प्रमाण वाढत आहे. काहींच्या बाबतीत व्यसनाच्या पातळीवर हा वापर पोचलेला आहे. याचं कारण सुरुवातीला नोंदलेल्या वाक्याने स्पष्ट होईल. एखाद्या व्यक्तीला समाजमाध्यमातून सुखद जाणिवा कशा मिळतात? […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..