नवीन लेखन...

‘निस्तेज’ होणारी पृथ्वी

सिरिस उपकरणांनी गेली काही वर्षं, कमी उंचीवरील ढगांकडून होणाऱ्या प्रारणांचं प्रमाण कमी होत असल्याचं नोंदवलं आहे. कमी होणारं प्रारणांचं हे प्रमाण, कमी उंचीवर पूर्वीइतके ढग तयार होत नसल्याचं दर्शवतं. कमी उंचीवरील ढगांचं कमी प्रमाणात निर्माण होणं आणि चंद्रावरचा पृथ्वीप्रकाश कमी होणं, हे एकाच वेळी घडत असल्याचं या संशोधकांना आढळलं. कमी उंचीवरील ढगांच्या प्रमाणाचा आणि पृथ्वीप्रकाशाच्या तीव्रतेचा थेट संबंध या तुलनेतून स्पष्ट झाला. कमी उंचीवरचे ढग हे सूर्यप्रकाश अधिक प्रमाणात परावर्तित करतात. या कमी उंचीवरील ढगांचं प्रमाण कमी होत असल्यानंच, पृथ्वीकडून सूर्यप्रकाश परावर्तित करण्याचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळेच पृथ्वी निस्तेज होत चालली आहे. […]

संपादक व प्रकाशक अरुण दिगंबर शेवते

शेवते यांच्या ‘ऋतुरंग’ प्रकाशनाने काढलेल्या ‘नापास मुलांची गोष्ट’ या पुस्तकाच्या चाळीस आवृत्त्या निघाल्या. ‘नापास मुलांची गोष्ट’ मुंबई विद्यापीठात अभ्यास क्रमात सामील केले आहे. […]

ज्येष्ठ उद्योगपती व महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा यांनी महिंद्रा कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली होती.  […]

जगा लेकोहो

आज थोडी भाकरं अन कोरड्यास खरडा सुगीवाचून कसं मिळंल खायाला खमंग हुरडा उद्याचे दान काय उद्याच्याला सोडा आज कशापायी ओढता उगा गाडा इतभर खळगी भरून कशाला हाती घेता गाडगा झोपाया थोडी लागलं चारखणी वाडा चारखणी वाड्यातबी निस्ता आरड ओरडा कुठं कुणा सुख टोचे ईर्षा आणि पाय निसरडा उगा खेचू नाही वाईच तुमी हेका सोडा समजून उमजून […]

वाचस्पती अरविंद मंगरूळकर

मंगरूळकर यांची व्याकरणातील तलस्पर्शी दृष्टी ‘मराठी व्याकरणाचा पुनर्विचार’ या ग्रंथात, तर वाङ्मयाची सूक्ष्म आणि साक्षेपी जाण, ‘मम्मटाचा काव्यप्रकाश’ (सहलेखक अर्जुनवाडकर) आणि ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथात व्यक्त झाली आहे. त्यांना सर्वच ललितकलांविषयी जिव्हाळा होता. त्यांची संगीतातील व्यासंगी-जाणकारी त्यांच्या ‘नादातील पाउले’ या पुस्तकातील विविध लेखांत प्रकट झाली आहे. अरविंद मंगरूळकर हे “कालिदासाचे मेघदूत”, “नीतिशतक” , “मराठी घटना रचना आणि परंपरा” अशा अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचे संपादक देखील होते. […]

तनमन ओले अधीर व्हावे

तनमन ओले अधीर व्हावे का मोहाचे धागे गुंतावे? का जीव हळवा व्हावा का मोह कुणाचा मोहरावा.. का भावनांचे फुलणे व्हावे डोळ्यांत चांदणे बहरावे, देहाचा होम का पेटावा हलकेच मनाचा गुंता व्हावा.. जीव व्याकुळ शीण व्हावा नजरेत वेदनांचा पूर सांडावा, कसला मोह हा तनुभर ल्याला का चांदण्यांनाही मोह पडावा.. श्वास हलका अधर व्हावा हा मोह मनास बधिर […]

जगण्याचे मर्म

हरवुनी जाता क्षण श्वासासंगे आयुष्य, विलया जात आहे जीवसृष्टीची जरी ही सत्यता मुक्ती जीवाची मन:शांती आहे।। क्षणोक्षणी, शिकत जगावे गतं न शोकं! सिद्धांत आहे जे जे चांगले,ते नित्य स्मरावे दुःख, वेदनां प्रारब्धभोग आहे।। जीवनी, पेलुनिया आव्हानांना संघर्ष करणे हाच पुरुषार्थ आहे जन्म मानवी, कृपा दयाघनाची तोच एक सद्बुद्धी देणारा आहे।। विवेकी, सत्संगात सदा रहावे मीत्व सोडुनी […]

ती पण एक सावित्री (कथा)

दहा वर्षे झाली, हरीष अंथरुणाला खिळला होता. जिवंत असून नसल्यासारखा. अर्धांगवायूच्या झटक्याने त्याच्या शरीराचा गोळा झाला होता. सर्व गरजांसाठी त्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत होते. त्याला त्याच्या बायकोकडे रागिणीकडे बघून अतिशय दु:ख होत होते. मनात सारखे विचार यायचे माझ्याशी लग्न करून हिला कोणते सुख मिळाले. […]

अभिनेते प्रतिक गांधी

सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरिज काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली होती. देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून टाकणाऱ्या आणि सर्वात मोठा शेअर बाजार घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारित ‘स्कॅम 1992’ या वेबसीरिजमध्ये प्रतीक गांधी यांनी हर्षद मेहताची मुख्य भूमिका साकारली आहे. […]

ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत मेहेंदळे

१९७२ पासून चंद्रकांत मेहेंदळे यांनी आपल्या नाट्य कारकिर्दीला सुरुवात केली होती. गॉसिप ग्रुप या विजय बोंद्रे यांच्या संस्थेशी ते जोडले गेले. या संस्थेच्या अनेक नाटकांसाठी त्यांनी काम केले. अभिनय, पटकथा, दिग्दर्शन यावर त्यांनी प्रभुत्व मिळवले. त्यानंतर ते विनय आपटे यांच्यासोबत त्यांच्या गणरंग या संस्थेत कार्यरत होते. विनय आपटे आणि त्यांची मैत्री होती. चंद्रकांत मेहेंदळे यांनी अरूण साधू यांच्या कादंबरीवर आधारित बहिष्कृत नाटक लिहिले. हे नाटक त्यावेळी लोकप्रिय झाले. […]

1 2 3 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..