नवीन लेखन...

अल्पायुषी कडी

शनीची कडी कशी निर्माण झाली असावीत, हा खगोलशास्त्रातील एक चर्चेचा विषय आहे. एका तर्कानुसार या कड्यांची निर्मिती आपल्या ग्रहमालेच्या निर्मितीच्या वेळीच झाली असावी. आपल्या ग्रहमालेतील शनी आणि इतर ग्रह ज्या धुळीच्या आणि वायूच्या मेघातून निर्माण झाले, त्या मेघातूनच ही कडी तयार झाली असावीत. या कड्यांतील पदार्थ म्हणजे पूर्णपणे निर्माण होऊ न शकलेल्या, शनीच्या एखाद्या छोट्या उपग्रहाचे खंड असावेत. […]

विचारांचा घोळ झालायं सगळा

मला अंग चेपून घ्यायला फार आवडते. माझे काही जुने मित्र कुठे भेटले, म्हणजे जर का त्यांनी मला कुठे पहिले, अगदी सभा, समारंभात सुद्धा, तर हळूच मागून येऊन खांदे दाबायला लागतात. […]

कचऱ्याचे वर्गीकरण का करावे?

मुंबई महानगरपालिकेने ओला कचरा आणि कोरडा कचरा अशा दोन भागात रोजच्या कचऱ्याचे वर्गीकरण करावे असा फतवा काही वर्षापूर्वीच काढला आणि जे कोणी असे करणार नाहीत त्यांना दंड करु असेही तेव्हा म्हटले होते. पण लोक आपण काढलेल्या फतव्याचे पालन करतात की नाही यावर देखरेखीची काही सोय केली नाही. […]

कर्करुग्णांसाठी माहेरघरे – पूर्वार्ध

एकदा कर्करोगाचे निदान झाले की, रोगी स्वतः व त्याचे नजिकचे कुटुंबिय दोघांवर प्रचंड तणाव येतो. कर्करोगाचा इलाजासाठी इतर काही रोगांच्या तुलनेत खूप जास्त खर्च येतो. देण्यात येणारी औषधे व रेडिएशन हेदेखील खर्चिक उपाय आहेत. कर्करोगाला वापरण्यात येणारी औषधे व रेडिएशन यामुळे माणसाला अतिशय थकवा येतो, उलट्या होतात, मळमळते, डोक्यावरचे केस गळतात. या सगळ्याला आपल्याला तोंड द्यावे […]

बोंगो, ढोलकी आणि मी

माझ्या वडिलांना तबल्याची आवड होती.तरुणपणी त्यांना ते वाजवायला शिकता नाही आले.उस्ताद थिरकवा हे त्यांचे आवडते होते. रेडिओवरील शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम ते ऐकत असत.मी लहान असताना मला त्याची गोडी वाटत नव्हती.मी त्यांना मराठी किंवा हिंदी गाण्यांचे कार्यक्रम लावायला सांगायचो. […]

कचऱ्याचे व्यवस्थापन

एकूण कचऱ्यातील धूळ आणि इतर अंश सोडता जवळजवळ ८० ते ८५ टक्के भागावर परत काहीना काही प्रक्रिया करून तो पुन्हा वापरात आणता येतो. अगदी वर वर्णन केलेला ओला कचरासुद्धा. भाजी मंडईत रोज पडणारा भाज्या आणि खराब झालेल्या फळांचा भागही वापरात आणता येतो तर हॉटेलात उरलेले अन्नही खाण्याच्या नव्हे पण इतर प्रकारे उपयोगात आणता येते. […]

कर्करुग्णांसाठी माहेरघरे – उत्तरार्ध

दरवर्षी जवळजवळ ५००० मुले दूरवरच्या प्रांतातून कर्करोगाचे निदान व उपचाराकरिता मुंबईत येतात. यातील च बहुसंख्य मुलांना कर्करोगावरील उपचार परवडण्यासारखे नसतात. अशा आर्थिक दुर्बल मुलांना सेंट ज्युड इंडिया चाइल्डस् सेंटर ही संस्था अत्याधुनिक, स्वच्छ, सुरक्षित निवारा देते. सेंट जुड ही संस्था शामा व निहाल कविरत्ने यांनी स्थापित केली. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या गरजू मुलांस व त्याच्या […]

पत्रास कारण कि

हल्लीच्या पिढीला हा मायना कळणारच नाही, आणि त्यात त्यांची काही चुकी आहे असे मला तरी वाटत नाही. आजच्या इंटरनेटच्या जगात, व्हाट्सअँप, ट्विटर, इंस्टाग्राम, सिग्नल, स्नॅप-चॅट, वगैरे अँप्स वरून क्षणार्धात हव्या असलेल्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट, म्हणजे संपर्क करणे त्यांना सोपेच वाटणार. […]

तेजपुंज क्रांतीसुर्य वीर सावरकर

जुलै १९१० लंडनहून मोरिया नावाचे जहाज भारताकडे रवाना झाले त्यात भारताचे क्रांतीवीर कैदेत होते त्यांच्या भोवती कडेकोट पहारा होता. लंडन आणि मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या भोवती जहाजावर डोळयात तेल घालुन पहारा देत होते. त्यांच्या डोळयात धूळ फेकुन समुद्रामध्ये उडी मारून पोहत कुठल्यातरी विदेशी समुद्र किना-यावर पोहचण्याची योजना त्या क्रांतीवीराच्या मनामध्ये येत होती. […]

तलवार आणि लेखणी !

लेखणी व तलवारीची आमनेसामने भेट झाली, दोघात मग श्रेष्ठतेवरून बरीच वादावादी रंगली ! सांगे तलवार लेखणीला, इतिहासाच्या वाच कथा, वाचून बघ समजतील तुला माझ्या पराक्रमांच्या गाथा ! जिंकली अनेक वीरांनी युद्धे माझ्याच बळावर, ठेवून भरवसा माझ्याच, धारधार तलवारीवर ! बोले तलवारीस लेखणी, रक्तरंजित तुझी कहाणी, झाल्या तुझ्यामुळे विधवा नाहक गरीब सवाशिणी ! माझ्या शब्दांच्या माऱ्यापुढे धार […]

1 2 3 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..