नवीन लेखन...

हसत-लिखित

सुमारे तीस एक वर्षापूर्वीची गोष्ट. आते-बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने पुण्यनगरी गेलो होतो. कॉलेजचं शिक्षण चालू होतं. लग्न समारंभाला जाताना प्रवासखर्च, आहेराचा भुर्दंड, रजा यांची डोक्याला विवंचना नव्हती. […]

एकेकाचे खाणे

रुमालात लाईटचा बल्ब फोडून त्याच्या काचा खायच्या. त्याच्या नंतर उसाचे कांडे खावे तशी ट्यूबलाईट तिरकी हातात धरून खायचा. एखादी खमंग शेव खावी तसे खिळे खायचा. तर एखादा तोंडातून, घशातून आख्खी तलवार आत घालायचा. एखादी परदेशातली बातमीही त्यावेळी वाचायला मिळायची की, अल्याण्या गावच्या फल्याण्या माणसाने आख्खी मोटारकार हळू हळू म्हणजे पाच दहा वर्षात खाऊन संपवली अर्थात एक एक पार्ट वेगळा करून. […]

आंतरराष्ट्रीय योग दिन

आंतरराष्ट्रीय योग दिन पाळण्याच्या प्रस्तावाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद बघून भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील स्थायी प्रतिनिधी अशोक कुमार मुखर्जी म्हणाले की योग या विषयाला वांशिक-सांस्कृतिक भेदांच्या पलीकडे जाऊन दिलेल्या पाठिंब्याचे हे द्योतक आहे. […]

छतावर साहित्यिकांच्या नावांचे कोंदण

लहानपणापासून कवितांची प्रचंड आवड. वाचलेल्या कवींवर निस्सीम प्रेम. या कवींची नावे सतत आपल्या डोळ्यासमोर आसावीत ही भावना. मात्र, घर पत्र्याचे. त्याला छत नसल्यामुळे नावे टाकण्याची अडचण. ही अडचण पत्र्याच्या घराला पीओपी करून सोडवली. […]

चिटणीस बंधू – साबाजी तुकाजी व कृष्णाजी तुकाजी

आंग्रे काळात अष्टागरातील नागाव ग्रामातील कर्तबगार व्यक्तीमध्ये साबाजी तुकाजी चिटणीस व कृष्णाजी तुकाजी चिटणीस या कायस्थ समाजातील पुरुषांचा विशेषत्वाने उल्लेख केला गेला आहे. त्या काळात खार जमिनी लागवडीस आणण्याचा उपक्रम साबाजी व कृष्णाजी या चिटणीस बंधुद्वयांच्या भगीरथ प्रयत्नांनी सिध्दीस गेला हे मोठ्या अभिमानाने नमूद करावयास पाहिजे. […]

महाडचे प्रसिद्ध होमिओपॅथी डॉ. वसंतराव पुरुषोत्तम सुळे 

डॉ. सुळ्यांचा उण्यापुऱ्या ६० वर्षांच्या आयुष्याचा जीवनपट म्हणजे वेगवान घटनांची एक मालिकाच होती गुजराथ मध्ये कलोल येथे जन्म. नंतर बडोदा येथे बालपण व शिक्षण वयाच्या १८ व्या वर्षी घरातून पळून जाऊन ब्रिटीश आर्मीच्या वैद्यकीय विभागात नोकरी. […]

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नाना दुर्वे

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाला आदर्शवत ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणजे नारायण माधव तथा नाना दुर्वे हे होय. वयाच्या ९४ व्या वर्षात यशस्वीपणे वाटचाल करीत असतांना त्यांनी गेल्या अनेक वर्षात पाहिलेले चढउतार स्वातंत्र्याआधीचा काळ आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळ यशापयशाची पर्वा न करता केलेले मार्गक्रमण या साऱ्यातून त्यांचा वेगळा इतिहास पहावयास मिळत आहे. […]

स्त्री मुक्ती आभास की आव्हान

जिच्या पासून एक ‘विश्व’ तयार झाले अशी स्त्री ही अनंत काळाची माता आहे. दैत्यांचा संहार करणारी देवता तिचा आपण सन्मान करतो. माणूस म्हणून स्त्री-पुरुष दोन्हीही सारखेच महत्त्वाचे आहेत. दोघांमध्ये अनेक गुण समान असतात मग असे असताना स्त्री ही पुरुषांइतकी समाजात किंवा कुटूंबात मुक्त आहे काय? माझ्या विचारांती मी प्रथम भारतीय स्त्री मुक्ती आभास की आव्हान या विचार प्रवाहात डोकावणार आहे. […]

ग्लोबलायझेशन आणि वृद्धाश्रम

प्रचंड उलथापालथीतून पृथ्वी निर्माण झाली. पुढे पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली. अप्रगत आदिमानवाचे रुपांतर आज आधुनिक महामानवात झाले. देश, सत्ता, भूखंड इतकेच काय तर ग्रह, ताऱ्यांवरही अभ्यासपूर्ण बोलले जाऊ लागले. आपला देश, आपले राष्ट्र याविषयीचा जाज्वल्य अभिमान जोपासला जाऊ लागला… […]

स्वच्छता

स्वच्छता हा एक मनाचा आरसा आहे. ही स्वच्छता स्वतःपुरती ठेवून चालणार नाही. फक्त आपलेच नाही तर देशाचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास स्वच्छतेला पहिला मान दिला पाहिजे. त्यासाठी प्रथम आपले घर, सभोवतालचा परिसर, आपला गाव, आपला देश स्वच्छ ठेवला पाहिजे म्हणजे निरनिराळे किडे, माशा, डास, उंदीर यांची पैदास होणार नाही. त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. […]

1 2 3 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..