नवीन लेखन...

म्हणे मायबोली किती वेगळी (सुमंत उवाच – २२)

म्हणे मायबोली किती वेगळी आमुची
कीर्ती किती सांगू सर्वांना तयाची
आता मुखी शब्द तिचा हो धरेना
मराठीतून शुद्ध कोणीही वदेना…

आता काम सांगे भाषा कोणती
आता दुःख बोले जे शब्द नसती
आता कुणा सांगू मी मराठी भाषा
पुसुनी स्वतःस ठरवावी योग्य दिशा!!

अर्थ

म्हणे मायबोली किती वेगळी आमुची,कीर्ती किती सांगू सर्वांना तयाची,आता मुखी शब्द तिचा हो धरेना,मराठीतून शुद्ध कोणीही वदेना

(जास्त काही बोलायची गरज आहे असे नाही, पण जेवढे शक्य आहे तेवढे आपल्या मायबोलीतून बोलले तरी खूप फरक पडेल. केवळ एक दिवस, 24 तास आपल्या मराठीचा झेंडा व्हाट्सएप आणि फेसबुक वर फडकावून नंतर दुसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग चा मेसेज पाठवणार असाल तर कशाला अट्टाहास करायचा एक दिवस तरी. दर बारा मैलांवर बदलणारी आपली मराठी आता दिवसातले बारा क्षण ही आपण नीट बोलत नाही याचं वाईट जास्त वाटतं.
शाळेत शिकायला इतर भाषिक स्कुल मधे पाठवुन आपला मुलगा किंवा मुलगी फार काही वेगळं करतील असे वाटत असेल तर यासारखा गोड गैरसमज अजून काही नसेल.)

आता काम सांगे भाषा कोणती, आता दुःख बोले जे शब्द नसती, आता कुणा सांगू मी मराठी भाषा,पुसुनी स्वतःस ठरवावी योग्य दिशा!!

(इतर भाषिक जास्त प्रमाणात झाल्यामुळे आता आपली मायबोली मागे पडत चालली, काय करू यार तो ऑटो वाला समझ ताही नहीं हैं, महाविद्यालयात गेलं की I like my mother टंग असं अभिमानाने बोलताना काहीच कसं वाटत नाही. एक अभिमान मात्र खुप हो काय तर म्हणे आमच्या मराठीत जितक्या शिव्या आहेत ना च्यायला दुसऱ्या कोणत्याच भाषेत नाहीयेत, काय मग भे××××× असे म्हणून नाक्यावर चकाट्या पिटायला मात्र आपल्याला मराठीच लागते. अगणित साहित्याने फुललेली, सुंदर शब्दांनी सजलेली, विविध अलंकारांनी सजलेली आपली माय मराठी आता मात्र केवळ आम्ही जातो आमुच्या गावा म्हणण्यासारखी राहिली आहे. विचार आणि कृती स्वतःपासून व्हायला हवी मग अपेक्षा दुसऱ्यांकडून करावी.)

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..