नवीन लेखन...

शुभ, मंगल समय येता

सावधान कोण करितो
जो घडवितो, जो जगवितो
तोचि संदेश धाडीतो..
जगण्यासाठी!!

अर्थ

बोहल्यावर चढलेल्या नारायणास मंगलाष्टकांच्या समयी प्रश्न पडला, “अरे… सारे काही शुभ आहे, मंगल आहे मग सावधान का राहायचे?” आणि त्यात नारायणास साक्षात्कार झाला की जर मला काही मोठे देशकार्य करायचे असेल तर या शुभमंगल समयी मला नुसते सावधान नाही तर अतिशय दक्ष राहावे लागेल. अन्यथा एकदा का मी या अग्नीच्या साक्षीने विवाह केला तर ते कार्य मला अर्धवट सोडता येणार नाही आणि मग 2 दगडांवर पाय ठेवूनि तोल सांभाळणे कठीण होऊन बसेल.

म्हटल्या जाणाऱ्या किंवा कानावर पडणाऱ्या शब्दांचं मर्म समजणं किती आवश्यक आहे याची प्रचिती आपल्या सर्वांना नेहमीच येत असते.

काय करायचे आहे हे पक्के झाल्याशिवाय काय करायचे नाही हे कळत नाही. म्हणून आयुष्यात काय करायचे हे ठरवणे महत्वाचे. काय करायचे ठरले की त्याविषयी जिद्द, महत्वाकांक्षा, विश्वास आपोआप निर्माण होतो. पण जर काय करायचे हेच ठरवले नाही तर सगळेच करायचे यावर समय निघून जातो अन हाती काहीच लागत नाही.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..