नवीन लेखन...

मार्शलींग यार्ड

कोणतीही मालगाडी नीटपणे न्याहाळली तर असं लक्षात येतं, की तिला भारतातील वेगवेगळ्या विभागांचे डबे जोडलेले असतात. नॉर्थन रेल (एन.आर.), वेस्टर्न रेल (डब्ल्यू.आर.), वगैरे. असे डबे काही महत्त्वाच्या जागी एकमेकांना जोडले जाऊन त्यांची ६० ते ७० डब्यांची मालगाडी तयार होते. ज्या जागी अशा अनेक मालगाड्यांचे डबे वेगवेगळ्या विभागांतून येतात त्या जागांना ‘मार्शलींग यार्ड’ म्हणतात. यांमध्ये मुख्यत: दोन प्रकार आहेत:

१. फ्लॅट: ज्या जागी साधारण प्रत्येक दिवशी ५०० डबे जोडले जातात.

२. हम्प: या जागी ५००० डबे प्रत्येक दिवशी जोडले जातात.

या मार्शलींग यार्डांमध्ये उंच मार्गावरून डबे त्यांच्या मूळ वजनांमुळे खाली आणले जातात. त्यामुळे अर्थातच ते हलवण्याकरता होणाऱ्या खर्चात बचत होते. परंतु अशा ठिकाणी जागा भरपूर मोठी असावी लागते.

एके काळी मुगलसराई (वाराणसीपासून १९ कि.मी. अंतरावरील स्टेशन) हे आशियातील सर्वांत मोठं मार्शलींग यार्ड होतं. आता टर्मिनल यार्डस् जास्त प्रमाणात आहेत, जिथे एका स्थळाहून दुसऱ्या ठरलेल्या स्थळाकडे मालगाड्या जातात. उदाहरणार्थ, वाडीबंदर (मुंबई) पासून ते थेट शालीमार (कलकत्ता) येथपर्यंत मालगाड्या जाऊन पोहोचतात. यामुळे सर्व माल लवकर पोहोचण्यास मदत होते.

मालगाड्यांचं प्रवासी गाड्यांसारखं पक्कं छापील टाईम टेबल नसतं, परंतु त्यांना वेगळा क्रमांक व नावं असतात. त्यावरून त्या ओळखल्या जातात. कोणत्याही मधल्या स्टेशनावर थांबा नसल्यानं त्या चांगल्या वेगात जातात. रेल्वेचं उत्पन्न या माल पोहोचविण्यावर जास्त प्रमाणात अवलंबून असल्यानं या गाड्यांनाही तितकंच महत्त्व दिलं जातं. रशियामध्ये मालगाड्यांचं महत्त्व मेल एक्सप्रेस गाड्यांपेक्षा जास्त आहे.

-डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 178 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..