नवीन लेखन...

राज्य कारणे लुडबुड असावी (सुमंत उवाच भाग ९७)

राज्य कारणे लुडबुड असावी
राज कारणे सीमा नसावी
परी नीती हो बाळगावी
उंबरठ्या मागे!

अर्थ

निष्ठा, विचार, ध्येय्य, कर्तृत्व, समानता, सर्वसमावेशकता या सगळ्या गोष्टींचा एकत्रित येऊन झालेला विषय म्हणजे राजकारण. पण समर्थांनी सांगितले आहे की राजकारण आणि राज्य कारण यात फरक आहे.

बहोत करावे राजकारण! परी घ्यावे सकळजन! नसावे कपट-मीपण! राज्य बुडते!!

राज्य चालावे म्हणून केलेले कार्य याला राज्य कारण म्हणतात आणि राज करण्यासाठी केलेले कार्य त्याला राजकारण म्हणतात आजकाल राज्यकारणात राजकारण शिरल्यामुळे देशाची दयनीय अवस्था झाली आहे.

राज्य कारणात सुयोग्य राज्य कारभार अपेक्षित असतो आणि राजकारणात बुद्धिबळाच्या चालींचा आणि वाऱ्याच्या वेगाचा खेळ अपेक्षित असतो. आजकाल वाऱ्याच्या वेगाने पक्ष आणि ध्येय बदलली जातात आणि निष्ठा या गोष्टीला विष्ठेचे स्वरूप प्राप्त होऊन ती कचऱ्याची टोपली गाठते.

पण जर हेच राजकारण एखाद्याच्या घरात घुसले तर? तर मराठी शाहीला मिळालेला शाप रुपी वारसा पुढे जाण्यास हातभार लागतो. म्हणून राज्यकारण असो किंवा राजकारण असो ते उंबरठ्या बाहेर असावे.घर शाबूत रहाण्यास मदत होते.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..