नवीन लेखन...

प्रेम, मोह (सुमंत उवाच – १२)

प्रेम, मोह असे मनी सद्भावना
नयनी आणते पाणी
क्रोध, लोभ असे मनी वासना
माणूस होतो प्राणी

माणूस होण्या कीर्ती सांगे
नदी तळाचे पाणी
पण माणूस म्हणोनि जगण्यासाठी
शुद्ध लागते वाणी….

अर्थ

प्रेम, मोह असे मनी सद्भावना, नयनी आणते पाणी, क्रोध, लोभ असे मनी वासना, माणूस होतो प्राणी

(हळव्या गोष्टी ना अश्रूंची किंमत मोजावी लागते पण ते अश्रू सुखाश्रु देखील असतात,तर निर्लज्ज झाल्यावर तेच अश्रू आपल्या मूळे इतरांच्या डोळ्यात येतात पण ते सुखाश्रु असतीलच याची ग्वाही नाही, याला जोड ही विचारांची, संस्कारांची आणि तुम्ही समाजाकडे पहात असलेल्या दृष्टीची असते.)

माणूस होण्या कीर्ती सांगे, नदी तळाचे पाणी, पण माणूस म्हणोनि जगण्यासाठी, शुद्ध लागते वाणी.

(उथळ विचारांच्या व्यक्तीचे रूप हे सर्वांना पटकन लक्षात येते, पण जो माणूस स्वार्थ न बघता मनापासून चांगले कार्य करीत असतो त्याला प्रसिद्धी मिळता मिळत नाही कारण तो नदी तळातल्या शांत प्रवाहाप्रमाणे आपले कार्य करीत असतो. समर्थ म्हणतात की चांगला माणूस होण्यासाठी आधी जिभेवर नियंत्रण ठेवणे, असणे फार महत्वाचे असते. कारण माणूसपण हे आपल्या शब्दांमधून जास्त काळ टिकते आणि ठरते सुद्धा.)

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..