नवीन लेखन...

काळ बोले कळ काढुनी (सुमंत उवाच – १२२)

काळ बोले कळ काढुनी
कळकळ तेवढी रहावी बाकी
तळमळ सोडुनी कार्य करावे
भरून जावी टाकी!!

अर्थ

“माझी अवस्था काय आहे काय सांगू जगाला… मन, जीवन सगळे काही दुःखाने भरून गेले आहे. माझ्यावर जी वेळ आल्ये ना ती कोणावरही येऊ नये.” हे असे बोलणाऱ्या व्यक्तींना हे असेच बोलायचे असते म्हणून ते होत रहाते. हेच जीवनात सुखद काही घडले तर ते आपण जास्त काळ घेऊन पुढे जातो का?

एखाद्या गोष्टीचा त्रास होणे, दुःख होणे हे निसर्गाच्या नियमानुसार योग्य आहे पण, जर तेच दुःख गोंजारून पुढे गेले तर आयुष्याला वेग येण्या ऐवजी हातपाय लटपटायला लागतात. प्रगतीचा वेग कमी होतोच शिवाय वैद्याचा खर्च वाढतो.

दुःख किती बाळगावे यापेक्षा आहे त्या परिस्थितीत मी आनंदी कसा राहू शकतो हे ताडले तर कित्येक दुःख ही केवळ धुक्या सारखी असतात हे लक्षात येईल. यातूनच बाहेर पडण्यासाठी केवळ प्रारब्धास दूषण न लावता कार्य वाढवावे, कामात झोकून द्यावे, ज्यांच्या बरोबर राहून आनंद मिळतो अशा व्यक्तींच्या सोबत रहावे आणि अशा एखाद्या व्यक्तिमुळे दुःख झालं असेल तर स्वतः बरोबर रहावे.

हळहळ होणे स्वाभाविक असते, शेवटी मनुष्य काही भगवंत नाही, पण त्यात होरपळून जाणे हा गुण माणसाला निसर्गाने दिलेला नाही. तेव्हा हळहळ- तळमळ करून घेण्यापेक्षा पुढे चालत राहिले, कार्य करीत गेले की आनंदाचं रिकामं झालेलं टाकं पुन्हा भरायला वेळ लागणार नाही. शेवटी छत्रपती होण्यासाठी कित्येक वर्षे वाट पहावी लागली, पण नुसती वाटच पाहिली असती तर तो आनंद मिळाला नसता, त्याला जोड होती अपार कष्टांची अन कित्येक दुःखांना दिलेल्या आहुतींची.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..