श्रीपाद श्रीवल्लभ यांची माहिती दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य ग्रंथ जो ‘गुरुचरित्र’ त्याच्या पाच, आठ, नऊ व दहा या चार अध्यायात आलेली आहे. त्यापलीकडे त्यांची माहिती इतर कोठल्याही ग्रंथात विशेष करून मिळत नाही. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामधुन त्यांचे चरित्र सर्वश्रुत झाले आहे. श्रीगुरुचरित्र ज्यांनी लिहिले त्या श्रीसरस्वती गंगाधरांचा हेतू श्रीनृसिंहसरस्वतींची लीला वर्णन करण्याचा असल्यामुळे श्रीपादश्रीवल्लभांची माहिती त्यात केवळ पूर्वपीठिका सांगण्यापुरतीच आलेली आहे. […]
मला आनंद झाला तो हिंदुस्थानी क्रिकेटचा विजय साजरा झाला म्हणून. मुंबई रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही याच दुःखही तेवढंच आहे. विदर्भाने तिसऱ्यांदा रणजी करंडक जिंकताना आपण पहिल्या दोन्ही वेळेला रणजी करंडक जिंकला तो विजय आपल्या कर्तुत्वावर जिंकला होता. तसेच यंदाही आपलं कर्तृत्व त्यापेक्षाही जास्त सरस होतं यात शंकाच नाही आणि हेच त्यांनी हिंदुस्तानी क्रिकेट जगताला दाखवून दिले. […]
पुस्तक प्रदर्शनाच्या मॉलमधून फेरफटका मारताना नेमका हाच अनुभव मिळतो. याची जाण मॉलच्या प्रदर्शनीय खरेदीतून ग्राहकाला येऊ लागलेली आहे. त्यातूनच शहर, गांवागावांत, सभासंमेलनात होणाऱ्या कार्यक्रमातून वा अन्यत्र सातत्याने भरणाऱ्या पुस्तक प्रदर्शनातून पुस्तकांची विक्रमी विक्री उच्चांकाचे परीघ उंचावित अधिकाधिक उलाढाली करू लागली आहे. […]
अत्रि – अनुसूयानंदन प्रभू श्रीदत्तात्रेय महाराजांनी जगदुध्दारासाठी श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती, श्रीमाणिक प्रभू आणि अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ असे चार अवतार धारण केले. ‘विश्वगुरु’ म्हणून उपनिषदकारांनी गौरविलेल्या प्रभू दत्तात्रेयांच्या महान संप्रदायाचे प्राचीनकालापासून चालत आलेले लोकोदाराचे व वैदिक धर्मरक्षणाचे कार्य ज्या चार दत्तावतारांनी पुढे चालविले, त्यांची ओळख करून घेण्यापूर्वी आपण दत्तसंप्रदायाची थोडक्यात माहिती करून घेऊ. […]
‘जून’ महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या सर्जनशील व मोकळ्या मनाच्या असल्याचे मानले जाते. चालू ‘जून’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया. […]
एखादी पाक कृती करताना त्यासाठीच्या फोडणीत कढीपत्ता घालतात त्यामुळे त्या डिशला अप्रतिम चव येते. उदा: कांदापोहे. या डिशमद्धे कढीपत्ता नाही ही कल्पनाच आपण सहन करू शकत नाही. त्यामुळे तर पोह्याच्या डिशला सुंदर चव येते. परंतु आपण पोहे खाताना प्रथम कढीपत्त्याची पाने डिश मधून काढून टाकतो. कारण त्याचे महत्व आपणास माहित नसते. […]
अंबाजोगाई बीड जिल्ह्यातील एका तालुक्याचे गाव म्हणजे भाविक भक्तांचे स्थान जगन्माता योगेश्वरी होय. देवीच्या स्थापनेचा कालावधी पुरातन असून याविषयी ऐतिहासिक उल्लेख प्राचीन शिलालेखात असलेल्या जोगाईचे माहेर या ठिकाणी आढळतो. […]
दवणा (Artemisia pallens) ही एक सुगंधी वनस्पती आहे, जी अॅस्टेरेसी (Asteraceae) कुळातील आहे. याला संस्कृतमध्ये ‘दमनक’ आणि मराठीमध्ये ‘दवणा’ असे म्हणतात. ही वनस्पती लहान औषधी वनस्पती किंवा झुडुपांच्या वंशात येते आणि झेरोफिटिक निसर्गात वाढते. जी भारतात तिच्या नाजूक सुगंधासाठी खूप मौल्यवान आहे. देशाच्या बहुतेक भागांमध्ये ती सामान्यतः हार, पुष्पगुच्छ आणि धार्मिक प्रसादांमध्ये वापरली जाते. दवणा म्हटलं […]
श्री महालक्ष्मी देवीच्या नित्य निवासाने पुनित झालेले महाराष्ट्रातील महाक्षेत्र करवीर वा कोल्हापूर या नावाने ओळखले जाते. हे क्षेत्र प्राचीन शक्तिपीठ असून पुराणमताप्रमाणे याला १०८ कल्पे झाली आहेत. अठरा पुराणांपैकी काशीखंड, पद्मपुराण, देवीभागवत, हरिवंशपुराण, स्कंदपुराण आणि मार्कंडेय पुराणात करवीर क्षेत्राचा उल्लेख सापडतो. […]
श्रीक्षेत्र माहूरगड नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असून ते डोंगराळ भागात वसले आहे. समुद्रसपाटीपासून अडीच हजार फूट उंचीवर माहूरगड असून दक्षिणेस सह्याद्रीच्या रांगा पश्चिमेस सहस्त्र कुंड आणि उत्तर व वायव्य दिशेला पैनगंगा नदी सर्पाकृती वाहताना दिसते. या गडावर श्रीविष्णूंनी उन्मत्त राक्षस लवणासुराला मारल्यामुळे श्री ब्रह्मदेवाने आनंदाप्रीत्यर्थ आपल्या कमंडलूतून आणलेल्या पाण्याने श्रीविष्णूचे पाय धुतले तेव्हा त्यांचे चरणतीर्थ जे पृथ्वीवर वाहू लागले तीच पैनगंगा नदी आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते. […]