नवीन लेखन...

अधांतरी साकव कसा पार होई (सुमंत उवाच – ७८)

अधांतरी साकव कसा पार होई
कशाचाच कशास आधार नाही
मनी सक्त नाही त्याला कोण पाही
विचारे मना सर्व सोडुनी जाई!!

अर्थ

प्रवाह कसा पार करायचा, हा प्रश्न या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला केव्हा ना केव्हा पडतोच, मग तो नदीचा प्रवाह असेल, जगण्याचा प्रवाह असेल अथवा अजून कसला प्रवाह असेल. प्रवाह ओलांडून जाणं हे कधी कधी गरजेचं असतं तर कधी प्रवाहात उतरून प्रवाहा बरोबर जाणं योग्य असतं. अशा वेळी काय करावे? प्रत्येकाला प्रवाहाच्या बरोबर जाणे जमतेच किंवा रुचतेच असे नाही तेव्हा मनुष्य शोध घेतो साकवाचा पण त्यावरून जाणे किती कठीण असते हे त्यावर पाऊल ठेवल्या शिवाय कळत नाही.

कठीण प्रसंगी किंवा आयुष्यात जेव्हा संकटं येतात तेव्हा साथीला कोण असते? एक मित्र, एक सखा नक्की असतो माणसाबरोबर तो म्हणजे त्याचं स्वतःचं मन. त्याच्याशी सलाह करून ती परिस्थिती, ते संकट पार करणे शक्य असते पण माणूस अशा वेळी सहाय्य मिळवण्या ऐवजी असहाय्यचं कसे मिळते, मिळाले, माझ्या नशीबातच ही गोष्ट कशी नाही या गोष्टींना प्राधान्य देत समोर असलेले संकट अजून ओढून घेतो आणि मग मनाला आवर घालण्या ऐवजी माणसाला आवरणे फार कठीण होऊन बसते.

आयुष्यात बॅलन्स राखणे गरजेचे असते पण तो समतोल स्वतः राखणे गरजेचे असते पण पावलं नीट न टाकता अडखळणे हा माणसाचा स्थायी स्वभाव आहे.

संकट कोणतंही येउदे त्या संकटातून बाहेर पडताना समोर बाजूला कोण असेल किंवा नसेल तरीही स्वतः मनाला भक्कमपणा प्राप्त करून त्याच्याशी मैत्री करून पुढे जाणं हेच खरं महत्वाचं असतं.

स्वतःच्या मनाला जितकं विचाराल तितकं ते गुरफटून राहतं, पण जर मनाला भक्कम बनवले तर गोष्टी, वेदना, दुःख त्यातून बाहेर काढणे आणि मनास उभारी आली की शरीर धडधाकट येणं हे क्रमप्राप्त आहे.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..