नवीन लेखन...

वेळेत घ्यावी निवृत्ती (सुमंत उवाच – ६१)

वेळेत घ्यावी निवृत्ती
नसावी क्रोधाची पुनरावृत्ती
सोडुनी द्यावी आवृत्ती
संस्कार असावे!!

कार्य करुनी जो निघतो
तोचि लक्षात रहातो
जो तेथेचि घुटमळतो
कटकट त्याची

अर्थ

देवाने आयुष्य दिले ते जगण्यासाठी, जागण्यासाठी नव्हे हे ज्याला कळले तो सुखी होतो. एखादा माणूस मरेपर्यंत झटत राहतो, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कष्ट करत राहतो त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच. पण हे सगळे करत असताना त्याच्या घरच्यांच्या निर्णयक्षमतेला बळकटी आणणे हेही त्याचेच काम असते हे विसरून चालत नाही.

वैराग्य अंगी आणणे महा कठीण पण त्याच्या जवळ जरी जाऊ शकलो तरी खूप मोठा पल्ला गाठला म्हणायला हरकत नाही. परमार्थ करणे फार गरजेचे पण त्यात अडकून किती राहायचे आणि त्याने किती लाख वेळा क्रोधीत व्हायचे? हे कोण ठरवणार? अशाने किंमत शून्य होऊन कर्ता पुरुषावर नाकर्ते पणाचा मुखवटा लावला जातो आणि मग उर्वरित आयुष्य भरलेल्या घरात एकट्याने काढायची नामुष्की ओढवते.

पुस्तकाच्या आवृत्या निघणं म्हणजे वाह वाह होते पण क्रोधाची आणि अहंकाराची आवृत्ती जर आपल्या पुढच्या पिढीत आली तर? अशा वेळी संस्कार होणे महत्त्वाचे, म्हणून बालवयात दासबोध ग्रंथ जर घरोघरी शिकवला गेला तर आवृत्ती सुखाची येईल हो घरा, जणू प्रत्येक दिवस होईल दिवाळी दसरा.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..