नवीन लेखन...

वेग नेई क्षितिजा वरती (सुमंत उवाच – ११९)

वेग नेई क्षितिजा वरती
हाती शस्त्र धरावे
प्रगती न होण्या पुन्हा अधोगती
थांबणे कुठे हे कळावे!!

अर्थ

प्रगतीची वाट सापडली की त्यावर पायाला चाकं फुटतात. मग वेग वाऱ्यापेक्षा अधिक होतो आणि यशाची गाडी धावू लागते. मन आनंदी होते, यश सुखावते, कष्ट मागे पडतात, श्रम वाहून जातात त्या यशाच्या अलोट महापुरात पण, त्या यशाच्या-प्रगतीच्या शिखरावर पोचलं आणि जाणवलं की आपण येथे एकटेच आहोत? तर? काय उपयोग त्या यशाचा? त्या शिखरावरच्या आनंदाचा उपयोग काय? आपला फोटो काढायला कोणी नसेल तेथे आपण एकटेच असू तर मजा काय येणार?

आता सेल्फी काढू शकतो असे काही महाशय म्हणतीलही, पण त्या ठिकाणी पोचल्यावर जर कुणी बरोबर नसेल तर तो व्यक्ती सेल्फीश असल्याशिवाय हे होणार नाही आणि सेल्फीश व्यक्ती चे मन त्याला सेल्फी काढायला तयार करणार नाही हेही तितकेच खरे आहे.

आम्ही ट्रेकिंग ला गेलो की गड- किल्ला उतरताना धावत उतरायची सवय होती. का? तर मजा यायची, अंगात रंग होती. किल्ला पटापट कसा उतरता येईल त्यापेक्षा नंतर मी किती मिनिटात उतरलो हे सांगण्यात जास्त अभिमान वाटायचा. पण ते करताना पायांना मिळालेला वेग वाटेतल्या झाडा झुडपांना भीक घालायचा नाही. मग खाली पोचल्यावर कळायचे हातांना किती खरचटले आहे, किती रक्त येतंय, गुडघ्यांना किती ताण पडला. आणि ते समजल्यावर ते सांगायला बाजूला कुणी नसायचं. कारण तीच वाट शांतपणे, आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारत सुद्धा उतरता यायचीच.

कुठे पोचायचे आहे हे माहीत असले तरी कधी पोचायचे यापेक्षा कसे पोचायचे, कशा प्रकारे पोचायचे हे कळणे महत्वाचे असते.

काहीतरी दाखवण्यासाठी, कुणालातरी सिद्ध करण्यासाठी जर शिखर चढत असाल तर हातात असलेली काठी तुमच्याच पायांना अडथळा आणेल कारण नारळ वाला हातात असलेला कोयता हा नारळ फोडण्यासाठी आहे हे मनात पक्के करून वापरत असतो पण जर मन अशांत असेल, तर तोच कोयता मदतनीस न होता शस्त्र म्हणून वापरला जाऊ शकतो.
आणि जवळचं साहित्य, सहकारी जेव्हा शस्त्र होतील तेव्हा प्रगती वरून अधोगती सुरू झाली हे पक्के. म्हणून किल्ला उतरताना किती वेग असावा यापेक्षा किती थांबत उतरावे हे समजले की पायांना, खांद्यांना, पाठीला, पर्यायाने स्वतःला त्रास होत नाही.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..