नवीन लेखन...

उजाड जमीन उजेड खाती (सुमंत उवाच – ११५)

उजाड जमीन उजेड खाती
पाणी पिऊनी शांत रहाती
उजेड मिळतो क्षणभर तरीही
दाट जंगले सृष्टी जगविती!!

अर्थ

मागे एकदा सुधागड ला जाताना पाली गावात गेलो होतो. गावात गडाबद्दल विचारणा केली असता सौ पुराणिक यांचे नाव काही लोकांनी सुचवले. कॉलेज प्राध्यापिका, इतिहासात जाणकार त्यामुळे आम्ही त्यांचे घर गाठले. मग ओळख, गडाबद्दल माहिती, काय करता वगैरे विषय झाले. पुराणिक मॅडम त्यांच्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेविषयी उत्साहाने बोलत होत्या, दर पावसाळ्यात आम्ही सुधागडावर वृक्षारोपण करतो. त्यांचा चेहरा अभिमानाने खुलला होता. मात्र ठिकाण तेच असते हे ऐकून माझा चेहरा मात्र हसू की रडू या विवंचनेत पडला. सांगायचं तात्पर्य इतकंच, आपण कुठे काय पेरतो यावर खूप काही अवलंबून असते. मोकळ्या प्रदेशात पाणी मुरतंच नसेल तर तिथे पीक लावण्यात काय अर्थ आहे. जमिनीत पाणी शोषून घेण्याची क्षमता नसेल तर तेथे शेत उगवेल काय? किंवा जमीन पोषक असूनही चुकीचे बियाणे पेरले तर त्याचा उपयोग किती होईल?हा विचार करायला हवा.

हेच आयुष्यात कोणतेही पाऊल टाकताना, कोणा सोबत काय पेरतोय ओळखणे गरजेचे असते. आपलं म्हणणारे पोषक नसून शोषक आहेत हे नंतर कळले तर त्या जमिनीची रान उगवायचीही योग्यता टिकणार नाही हे खरे. मग नुसतेच वृक्षारोपण होत राहील वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..