नवीन लेखन...

निद्रा नाश करुनि होते ते काय (सुमंत उवाच – ६९)

निद्रा नाश करुनि होते ते काय
चिंतेचा लोट धरिती पाय
हलकल्लोळ या शिरी माजतो
व्हावे जे तेच होते न की उपाय!!

अर्थ

झोपच येत नाहीये, झोपच येत नाही अजिबात रात्री. काय करावं कळत नाही, अख्खी रात्र विचारांमध्ये जाते. सुचतंच नाही काही, नुसता डोक्याचा भुगा झालाय. दिवसभर काम, संध्याकाळी प्रवास, घरचं काम तरी रात्री झोप येत नाही. काहीतरी गडबड आहे डोक्यात त्याशिवाय हे असं होणार नाही.

रवीस काही टोचू नका
त्यास काही न लपे
स्वच्छ प्रकाश पोचतो जिकडे
तेथेचि रात्री झोप लागे

अपार कष्ट करून सुद्धा काहीतरी व्हायचं, मिळायचं बाकी आहे हे मनात असलं की झोप लागणं मुश्कील. एखाद्या ध्येयाने झपाटून त्या विचाराअंती झोप न लागणं चांगलं पण तरीही तेथे मनास विश्रांती ही हवीच. पण काळजी पोटी, चिंतेपोटी झोप न लागणे योग्य असते? चिंता ही असणारच त्यासाठीच जन्म असतो आपुला, पण त्याच्या बरोबर दुसरी बाजूही असते समाधानाची. माझ्या कडे काय नाही ह्यापेक्षा माझ्याकडे काय आहे ह्यावर जोर दिला तर चिंता समाधानात परावर्तित होऊ शकते.

‘चिंता करितो विश्वाची’ म्हणून नारायणाने आपला हेतू स्पष्ट केला पण त्या हेतूची चिंता करीत तो बसला नाही त्यासाठी लागणारी कृती त्याने केली म्हणून पुढे नारायणाचे श्री समर्थ झाले. समर्थांनी ही कित्येक रात्री जागून काढल्या असतील त्यात तिळमात्र शंका नाही पण त्या माझी आई आता कशी असेल या चिंते पोटी नसतील तर मी जे कार्य करायला जन्मलो आहे ते कसे करावे याच्या विचारांत ते जागले असतील.

उद्या काय होणार याची चिंता आज झोपू देत नाही आणि काल असेच का झाले याचे दुःख नीट जगू देत नाही. याचा अर्थ चिंता करूच नये? अजिबात नाही चिंता करावी योग्यच असते ती पण त्याचा परिणाम आपल्या मनावर, शरीरावर किती करून घ्यायचा हेही पाहायला हवेच. नाहीतर उपाय काही नाही, रात्री झोप येत नाही, रात्री झोप नाही म्हणून दिवसा हुरूप नाही मग काही करावेसे वाटत नाही म्हणून परत रात्री झोप नाही. उद्याची चिंता आजचं जगणं संपवते. विचार होणे गरजेचे, ज्याने त्याने स्वतःशी करावा.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..