नवीन लेखन...

मती आखूड आखूड (सुमंत उवाच – ४२)

मती आखूड आखूड
शरीर होई फार जड
नको वाटे बडबड
क्रोधापोटी

काय हवे मज वाटे
दूरदृष्टी न डोळी साठे
क्षण तो असावा ओठी
सुखं मिळती

अर्थ-

एखाद्याच गोष्टीचा सतत विचार केला की बुद्धी म्हणजेच विचार कोंडतात, तिथेच घुटमळत रहातात. दुसरं काही सुचेनासे होते, डोकं जड होतं, दुखायला लागतं, झोप लागत नाही, खावंसं वाटत नाही. काही करावं असं वाटत नाही. मग त्यातून बाहेर पडतो तो क्रोध, राग, चिडचिड याचा परिणाम भांडणं, वादविवाद, त्याचा परत होणारा त्रास हे सगळं कसं एका दुष्टचक्रात अडकल्यासारखं वाटतं.

श्री समर्थांनी म्हटलं आहे, मनी असावे साधेपण, वास नसावा अंतरी, मिळे न जे स्वार्थापोटी, सोडून द्यावे

मला सगळं मिळालं पाहिजे,किंवा मला सगळं मिळालंच पाहिजे यातून बाहेर पडणारा, लोभ, क्रोध आणि असमाधानी वृत्ती जी येते ती आयुष्य कठीण करून बसते. काहीवेळी दूरदृष्टी नसलेली बरी, कारण उद्याच माहीत नाही तर 10 वर्षांनंतर काय होईल हा विचार करून जगण्यात काय अर्थ आहे.

काही क्षण ,काही गोष्टी या त्या त्या क्षणी जगायच्या असतात. आयुष्य केवळ भविष्य समोर ठेऊन जगलं तर ते वर्तमान जगू देत नाही हेही खरं आहे. म्हणून काही वेळा पुढे काय वाढून ठेवलंय त्या पेक्षा अत्ता माझ्याकडे काय आहे हे बघुन जगण्यात जास्त आनंद असतो.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..