नवीन लेखन...

कोणे एकेकाळी घडले रामायण (सुमंत उवाच – 136)

कोणे एकेकाळी घडले रामायण
काही हजार वर्षे नुसते पारायण
प्रसन्न होत नाही याने नारायण
आचरण महत्वाचे!!

अर्थ

लहानपणापासून बाळाला त्याच्या घरातले पुराण काळातल्या कथा, रामायण, महाभारत, शिवाजी महाराज, जिजाऊ, रामदास स्वामी यांच्या कथा सांगतात. जेणेकरून धर्म आणि कर्म यांचे मर्म त्याच्यात योग्य उतरावे. पण इतिहासातून काय करायचे आणि काय करणे टाळायचे हे मात्र कोणीच सांगत नाही.

मी नेहमी म्हणतो की मंत्र पठण, स्तोत्र पठण नुसते करून काही होत नाही, एकपाठी असणं हे जितकं कौतुकास्पद आहे तितकेच घातक ही आहे कारण, आजकाल चांगले शब्द, चांगले विचार यांच्यापेक्षा शिव्या अन वाईट भाषा ही जास्त प्रमाणित झाली आहे.

एखादं शरीर जमिनीत पुरलं की काही काळाने तेही मातीमोल होतं, आपल्या आधीच्या लोकांनी केलेल्या चुका नुसत्या उगाळत बसण्यापेक्षा काही काळा नंतर त्यांना देखील तिलांजली देणं गरजेचं असतं नाहीतर काही जखमा अशा असतात ज्यांना कितीही मलम लावलं तरी त्या सुकत नाहीत, त्या नेहमी ओल्याच रहातात, आणि त्या जखमा मनावर अन हृदयावर झालेल्या असतात. म्हणून काळानुसार बदलणे, इतिहासजमा झालेल्या गोष्टी शिकून परत इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही ना याची काळजी घेतली की झालं.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..