नवीन लेखन...

ज्याच्या आत माझाच चा कहर (सुमंत उवाच – ५८)

ज्याच्या आत माझाच चा कहर
त्याच्या वागण्याला अर्थ नसतो फार
त्यांचे विचार जरी असती सुविचार
अहंकार वसती!!

अर्थ

एका थोर पुरुषाने 2 तास कीर्तन केले, अगदी जीव तोडून कीर्तन केले. समोरचे रसिकभक्त अगदी तल्लीन होऊन ऐकत होते. त्यांच्या प्रत्येक टाळीवर माना डोलवत होते. झालं, कीर्तन पार पडलं आणि नंतर रसिक त्यांच्या पाया पडायला येऊ लागले. त्यातल्या एका रसिक वृद्धाने त्यांना विचारले की आपण मगाशी कीर्तन करताना एका ओवीचा उच्चार केलात ती ओवी आपण कुठे वाचलीत? त्यावर ते बुवा हात जोडत म्हणाले की ती मी स्वतः लिहिलेली आहे.मला अशा ओव्या रचायची लहान पणापासून आवड आहे. त्यावर ते वृद्ध हसले आणि त्यांनी आपल्या खिशातून एक पुस्तक काढले आणि त्यातली ती ओवी त्या बुवांना दाखवली. त्यावर ते बुवा प्रचंड चिडले आणि त्यांनी तेथून तणतणत काढता पाय घेतला.

हे जग माझ्यामुळेच आहे, माझ्यातूनच हे विश्व निर्माण झाले आहे असे जेव्हा एखाद्या मनुष्याला जाणवू लागते त्यांनी लगेच अहंकारावर औषध घ्यायला सुरुवात करायला हवी. कीर्ती मिळवणे आणि अहंकाराने त्याचा डंका पिटणे यात प्रचंड फरक आहे. एखाद्याने काही चांगले कार्य केले, किंवा लिखाण केले तर त्यावर कौतुकाचे दोन शब्द नाही देता आले तरी चालतील पण त्याच्या कार्याला कमी लेखून आम्ही हे बालवयातच करायचो असे म्हणून त्याच्या नजरेत तरी स्वतःचे स्थान घालवू नका.

अहंकार नसण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी स्वराज्य उभे केले, त्यात कित्येक किल्ल्यांची नव्याने निर्मिती केली. पण त्यावरच्या एकाही दगडावर किंवा भिंतीवर स्वतःचे नाव लिहिले नाही. तसेच त्यांच्या कोणत्याही साथीदाराला कमी लेखले नाही. पण कलयुगातला माणूस मात्र माझे नाव जिथेतीथे कसे येईल यातच अडकलेला असतो. अशाने एखाद्याचे विचार जरी चांगले असले, कार्य जरी उत्तम असले तरी अहंकाराची भिंत त्या कर्तुत्वाला फुशारकी या गढूळ पाण्याच्या डोहात बुडवून मारते.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..