नवीन लेखन...

चिंटी कान मैं हातीके (सुमंत उवाच – १२३)

चिंटी कान मैं हातीके
वर्णभेद सो प्रजातीके
दुख के दिन हो आंगन के
कौन संभाले!!

अर्थ

जेथे सुखं तेथेची दुःख, हा नियम जीवन चक्राचा आहे आणि तो कितीही झाले तर आपण बदलू शकत नाही. भगवंताला सुद्धा अनेक दुःख, अनेक संकटांना सामोरे जावे लागलेच. हे आपल्याला आजकाल डेली सोप पाहून लक्षात येतेच.

कोणास कोणते दुःख, किती ते दुःख याला सीमा कोण घालू शकते? जसा मनावर असलेल्या दडपणाचा आकडा कोणी सांगू शकत नाही तसेच कोणाचे दुःख किती मोठे अथवा किती लहान याचे मोजमाप या जगात होऊ शकत नाही. बलाढ्य असणारा, जगात सर्वात बुद्धिवान मानला जाणारा जीव म्हणजे हत्ती, तो जंगलं पालथी घालतो, राग आला तर झाडांची वाट लावतो, माणसाची वाट लावतो, त्याची शिकार करणे वाघांच्या बस की बात नसते पण, त्याचे दुःख तोच जाणे जेव्हा एक लहान मुंगी त्याच्या कानात जाते तेव्हा. शिकार हा निसर्गाचा नियम आहे पण त्यापेक्षा जास्त दुःख मुंगी चावल्याने होते हे इतरांना काय समजणार.

कोणाचे दुःख कोणते असते याला काही सीमा नसते. एखादा काळा माणूस मी काळा का? म्हणून दुःख करीत बसतो तर एखादी गोरी बाई बाहेर गेल्यावर गोरेपण टिकवण्यासाठी ते झाकावे लागते या दुःखात बुडालेली असते. पण जेथे रंगा मुळे डावलले जाते त्याचे दुःख कोण समजणार?

दिसणाऱ्या आजाराचं दुःख हे माणसाला दिवसागणिक कमजोर बनवतं पण न दिसणाऱ्या आजाराचं दुःख? म्हणजेच मनाच्या आजाराचं दुःख हे माणसाला श्वासागणिक कमकुवतपणा आणतं. शारीरिक आघात मनाला टोच पोचवतो तर मानसिक आजार हा शरीरावर आघात करतो. येथे कोणाचे दुःख मोठे किंवा कोणाचे दुःख लहान याचा प्रश्न नसून कोणाचे मन खंबीर आहे यावर ते दुःख किती लावून घ्यायचे हे ठरते.

म्हणूनच श्री समर्थांनी या मनाच्या खंबीरतेला बळकटी यावी म्हणून मनाच्या श्लोकांची निर्मिती केली आणि जगातल्या सर्व दुःखांवर पाझर घालणारे रामबाण औषध आपल्याला उपलब्ध करून दिले.

शेवटी म्हणतात ना, मन चंगा तो सब चंगा!!

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..