पौराणिक महत्व: आध्यात्मिक, ऐतिहासीक, पौराणिकदृष्ट्या नर्मदा ही कुमारिका समजली जाते व तिच्या परिक्रमेला अनन्य महत्व आहे. नुसत्या नर्मदामैयेच्या दर्शनाने, स्नानाने मोक्ष मिळतो म्हणतात, ह्या तुलनेत गंगेत स्नानाने पाप धुतले जातात अशी मान्यता आहे. फक्त गया अलाहाबादला म्रृत्यु आल्यास direct मोक्ष मिळतो. हा जरा श्रध्दा,वा अंधश्रद्धेचा भाग म्हणून सोडला तरी मोक्षप्राप्ती साठी सगळे चराचर प्राणी काशीत स्थायिक होऊन […]
पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांनी ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. अरुण साधू हे नावाप्रमाणेच साधे होते. लेखक असल्याचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. ते केवळ पुस्तकांतच रमले नाहीत. अनेक पुरोगामी चळवळीत त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग होता. […]
महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी कोल्हटकर म्हणजे बाळ कोल्हटकर हे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू होते. नाटककारांच्या बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नटही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. हेच एका नाटककाराचे आणि नटाचे मोठेपण आहे. […]
नर्मदा परिक्रमा केलेल्या सतीश परांजपे यांनी या परिक्रमेचे सुंदर वर्णन या लेखमालेत केले आहे. हे फक्त एक प्रवासवर्णनच नसून नर्मदेविषयी इतरही बरीच माहिती आपल्याला या लेखात वाचायला मिळेल.. […]
कोरोनाच्या अभूतपूर्व वातावरणात अभूतपूर्व असं अधिवेशन संसदेत सुरु झालंय.. त्यामुळे ते आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात आणि नुसतं सरकारी बिले पास करण्याच्या सोपस्कारात उरकल्या जाऊ नये. तर, सरकार आणि विरोधी पक्षाच्या राजकारण विरहित सामंजस्यचा एक नवा इतिहास या अधिवेशनातुन घडवला जावा यासाठी हा लेखन-प्रपंच आहे. […]
ऋतु चक्राभोवती अनेक गोष्टी गुंफलेल्या आहेत. रंगीबेरंगी फुले हा त्या ऋतुचा आरसा म्हणूनच जणु कार्यरत असतात. त्या त्या ठराविक ऋतुमध्ये आपल्या स्वत:च्या सौंदर्याने त्या ऋतुचे सौंदर्य वर्णन करून दाखवणारी फुले! […]
श्रीमत् आदि शंकराचार्यांनी रचलेले कालभैरवाष्टक शंकराच्या भगवान कालभैरव या विक्राळ आणि उग्र रूपाचे स्तुतीपर स्तोत्र आहे. रूप रौद्र असले तरी त्याचा स्वभाव अत्यंत सरळ व भक्तांविषयी कणव असणारा आहे. या स्तोत्राचे पठण करण्याने भगवान कालभैरव अत्यंत भयावह भूत प्रेतादिकांना दूर ठेवतो, भीती, दुःख दारिद्र्य, क्लेशांना नष्ट करतो व सर्व संकटे दूर होतात. स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मनाला शांती मिळते, आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि आपले जीवन निरोगी, श्रीमंत आणि संपन्न बनते, असा भाविकांचा विश्वास व अनुभव आहे. […]
नागपूरकडल्या परिसरातील एका सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या प्रेमानंद गज्वी यांना एकांकिका आणि नाट्यलेखनाने आकृष्ट केले. पुढे १९८०-१९८५च्या सुमारास ते मुंबईला आले आणि त्यांची प्रतिभा अधिकच पल्लवीत झाली. ‘देवनवरी'(१९८१), ‘तनमाजोरी'(१९८४), ‘वांझ माती'(१९८४), ‘जय जय रघुवीर समर्थ'(१९८८), गांधी-आंबेडकर(१९८८), ‘किरवंत'(१९९१), ‘पांढरा बुधवार'(१९९५) अशी एकाहून एक सरस नाटके त्यांनी लिहिली *आणि विद्यमान मराठी नाटककारांच्या मांदियाळीत त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले. […]
पूर्वीचे शिक्षक आणि आताचे शिक्षक यांच्यात खूप तफावत दिसून येते. अहो म्हणजे पूर्वीचे शिक्षक मजा घेत शिकवत. आताच्या शिक्षकांना प्रचंड तणावाखाली वावरायला लागतं. त्यामागची कारणंही तशीच आहेत म्हणा. पूर्वी पालकच शिक्षकांना पूर्ण मुभा देत असत की , तुम्हाला वाटेल ते करा ठोका , मारा पण आमच्या मडक्याला घडवा , पण आता जरा जरी शिक्षक ओरडले तरी किंवा फटकावलं तर लगेच पालक असे व्यक्त होतात की जणूकाही शिक्षकांनी जीव घ्यायचाच बाकी ठेवला आहे. […]
गगनभेदी इमारती सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. गाईड त्यांचे महत्व विषद करीत होता. फर्स्ट कॅनेडियन प्लेस (1165 फूट), कॉमर्स कोर्ट वेस्ट (942 फूट), ट्रुंप इंटरनॅशनल हॉटेल अँड टॉवर (908 फूट), स्कोशिया प्लाझा (902 फूट), टीडी कॅनडा ट्रस्ट टॉवर (862 फूट), टोरेंटो डोमिनियन बॅंक टॉवर (732 फूट) अशा एका पेक्षा एक टोलेजंग व ऐतिहासिक इमारती प्रेक्षकांना आकर्षित करीत होत्या. पण मला ओढ लागली होती ती सीएन टॉवर पहाण्याची ! […]