नवीन लेखन...

भूल देऊनी करता क्रिया (सुमंत उवाच – ५)

भूल देऊनी करता क्रिया
जाण न होते जगण्यात
भुलू नये काय घडले मागे
काय दिव्य झाले पश्चात

पावले पडती सुबक नक्षी ती
उठे मुखी सागरात
झरझर वारा मिटवूनी जातो
तिला ही क्षणार्धात….

अर्थ

भूल देऊनी करता क्रिया,जाण न होते जगण्यात

(नशेच्या, व्यसनांच्या आहारी जाऊन केलेली कामे त्यांचे दुष्परिणाम लक्षात रहात नाहीत.)

भुलू नये काय घडले मागे,काय दिव्य झाले पश्चात

(पण ती जेव्हा इतिहास बनून येतात तेव्हा मात्र आपण काय केले याची प्रचिती आपल्याला सतत धडा शिकवत रहाते.)

पावले पडती सुबक नक्षी ती, उठे मुखी सागरात

(आठवणी साठवाव्यात आपल्या मनात, त्यांना चव्हाट्यावर आणू नये,जगासमोर सोसलेलं दुःख मांडून त्यातून काही मिळत नाही.)

झरझर वारा मिटवूनी जातो, तिला ही क्षणार्धात.

(जशी एखाद्या गोष्टीची हवा तयार होते, पण कालांतराने ती गोष्ट विस्मरणी जाते, तसेच आपण यशाच्या शिखरावर असताना हवेत उडू नये, वारा पडला की पक्षांनाही नमत घ्यावं लागतं.)

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..