नवीन लेखन...

पैसा च पैसा चोहीकडे

काळ बदलला विचार सरणी बदलली. स्वातंत्र्य. सोयी. महत्व. वाढले म्हणून शिकणे शिकवणे ही प्रथा सुरू झाली. आणि एक प्रकारचा व्यवसाय सुरू झाला. गाणी. नाच. खेळ. स्वयंपाक. पोहणे आणि किती किती काय शिकवायचे प्रकार आहेत. जे पूर्वी आपलेपणा. […]

संस्कार

अनेक जन्मानंतर मानवी जन्म मिळतो असे म्हणतात. सृष्टितील सर्व जीवसृष्टित मानवी जन्म हा सर्वश्रेष्ठ बुद्धिजीवी जन्म मानला जातो परमेश्वराने माणसाला विवेकबुद्धी, वाचा, स्मरणशक्ती, श्रद्धा, भक्तिप्रीती, वात्सल्य, जिव्हाळा, निःस्पृहता, निर्मलता, विश्वास, त्याग, कृतज्ञता, नम्रता, परोपकार, साहस अशा अनेक सुसंस्कारी संस्कारशक्ती जन्मताच प्रदान केल्या आहेत. त्याच संस्करण होण म्हणजे संस्कार!! संस्कार हे करून होत नाहीत ते घडावे लागतात […]

वृद्धाश्रम

वृद्धाश्रमात ठाण्याच्या – माझी आत्या असते, मधूनमधून जातो – मी तिला भेटायला. गेल्यावर मात्र जे – भकास चित्र दिसते, पाहिल्यावर नको वाटतं – पुन्हा तिथे जायला. सणवार वाढदिवसाचे गोडधोड – सारे काही मिळते, डोळे मात्र आतुरले असतात – मुलांना पाहायला. ती दिसणार नाहीत सदा – हे जेव्हा उमजते , शिकतात मग सारी स्वतःशी – खोटं खोटं […]

पाइड किंगफिशर (कवड्या खंड्या)

“उडू नको रे बाबा. एकच फोटो काढू दे ” … मनातून विनवणी चालू होतीच. त्याने जाणले असावे. डौलदारपणे माझ्याकडे वळलेली नजर आणि माझी “क्लिक” … एकच गाठ पडली. .. Pied Kingfisher कॅमेरा मधे बंदिस्त करायची बऱ्याच वर्षांची इच्छा पूर्ण झाली. […]

रेल्वे आणि मालवाहतूक

रेल्वेच्या विस्तारामुळे मालाच्या देशांतर्गत वाहतुकीत प्रचंड प्रमाणात वाढ होत गेली असून, त्याचा आलेख दिवसेंदिवस चढताच आहे. त्याचबरोबर परदेशांशी होणारी आयात व निर्यात यांतही भरघोस भर पडलेली आहे. शेतीच्या अर्थव्यवस्थेत तर क्रांतीच घडविली गेली. रेल्वेद्वारे होणाऱ्या मालवाहतुकीमुळे देश प्रगतीच्या वाटेने चालू लागला व त्यामुळे आज भारत स्वत:च्या पायांवर खंबीरपणे उभा आहे. आसाममधील चहा व ज्यूट; राणीगंजमधील कोळसा; […]

एक परीस स्पर्श ( भाग – ४९)

त्याने स्वतःपेक्षा अधिक प्रेम कधीच कोणावर केले नाही अगदी अनामिकावरही नाही… त्याने तिच्या आयुष्यातही कधी ढवळाढवळ केली नाही. तिलाही त्याच्या आयुष्यात कधी ढवळाढवळ करून दिली नाही. यापूर्वी त्याचे जिच्या जिच्यावर प्रेम होते तिच्या आयुष्यातही त्याने कधी  ढवळाढवळ केलेली नव्हती. त्याच्या मनात त्याच्याबद्दल यकिंचितही तिरस्कार नव्हता कारण त्याने तेच केले होते जे त्याला हवे होते. […]

माझे शिक्षक – भाग ४ (आठवणींची मिसळ १८)

माझ्या जन्माच्या सुमारास माझ्या वडिलांना स्थिर नोकरी नव्हती.वकिली न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि १९३४मधे बेळगावला कोचिंग क्लासेस काढले.त्यांत खूप नुकसान झालं.क्लासेसना चांगले दिवस यायला अजून वेळ होता.त्यानंतर बेळगावचं घर विकून, कर्ज फेडून ते मुंबईस आले.वसईचे वाघ हायस्कूल, लालबाग-परळचे सरस्वती हायस्कूल, खारचे एक हायस्कूल अशा अनेक शाळांमधे त्यांना तात्पुरती नोकरी मिळत असे.पण कायमस्वरूपी कधीच मिळाली नाही. […]

उगाच काहीतरी – ११ (भारतीय शालेय वर्ष – एक (रिकामटेकडा) विचार)

भारतातील शिक्षण व्यवस्था ही इंग्रजांनी बनवलेल्या प्रमाणे चालते आहे. त्यात आपले शालेय वर्षाचा कालावधी पण येतो जसं पावसाळा ते हिवाळा शाळा आणि उन्हाळ्यात सुट्ट्या. तसं पाहायला गेलं तर अशी रचना त्यांनी त्यांच्या सोयीसाठी बनवली होती त्याला माझ्या माहिती प्रमाणे एक प्रमुख कारण होतं भारतातील कडक उन जे इंग्रजांना सहन होत नव्हते. त्यासाठी ते भर उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी मुक्काम ठोकत आणि त्याच प्रमाणे त्यांनी शालेय वर्ष पण योजले होते. […]

संधीचं सोनं

विधात्याने सृष्टी निर्माण करताना भर दिला तो विविधतेवर. जगात कोणत्याही दोन गोष्टी समान नसतात. माणसामाणसाचं रुप वेगळं असतं, राहणीमान वेगळं असतं. प्रत्येक प्राण्याची प्रवृत्ती वेगळी असते. वनस्पतींचे आकार वेगळे असतात, प्रकार वेगळे असतात. संपूर्ण जगात कोणत्याही दोन ठिकाणी कोणासाठीही समान अशी एखादी गोष्ट असते का? सृष्टीतील विविधतेने भारावून गेल्याने आपल्या मनात या प्रश्नाचं प्रथम नकारात्मक उत्तर […]

उखाणा नको त्याला बहाणा

उखाणा हो नुसते म्हटले तरी लाजायला. होते. हो ना. कुणी शोधले असेल हे. पण आज तागायत उखाणा घेणे आवश्यक आहे लग्न ठरले की घरातील व बाहेरील बायका मैत्रीणी उखाणे शिकवतात. आता हल्ली म्हणे उखाण्याचे पुस्तक मिळते. कोणता उखाणा कधी घ्यायचा हे असते त्यात. आणि यातून बरेच काही शिकायला मिळाले. इतिहास लिहिताना जसे अनेक साधने असतात त्यातून […]

1 2 3 4 5 6 28
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..