खर आणि खोटं
आज एक फार दिवसापूर्वीची गोष्ट आठवली. एखादे वाक्य जे खोटे आहे पण वारंवार खरं आहे खरं आहे असे सांगत गेले की ती गोष्ट खरच खरी आहे असे वाटते. अगदी तसेच एखाद्या माणसाला पण अनेक लोक मिळून चुकीचे ठरवतात तेव्हाही. तोच खोटा ठरतो. […]
आज एक फार दिवसापूर्वीची गोष्ट आठवली. एखादे वाक्य जे खोटे आहे पण वारंवार खरं आहे खरं आहे असे सांगत गेले की ती गोष्ट खरच खरी आहे असे वाटते. अगदी तसेच एखाद्या माणसाला पण अनेक लोक मिळून चुकीचे ठरवतात तेव्हाही. तोच खोटा ठरतो. […]
तू विसावलीस क्षणक्षण जेथे तो वृक्षही तुझीच वाट पाहतो पानोपानी तुझा स्पर्श लाघवी अजुनही अविरत झुळझुळतो शहारणारा, मस्त धुंद गारवा तनामनाला, अलवार झोंबतो तू अशी ही कोमली नार सुंदरा तुझ्या रुपात, माहोल शृंगारतो नको नां, आता खेळू जीवाशी त्या वृक्षातळी मीही वाट पाहतो जीवनी, प्रीती एक ब्रह्मसुखदा साक्षात्कार, जीवाजीवा भावतो नाते अगम्य राधेचे अन मुरलीचे सत्यभास, […]
मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतर्फे डॉ. खांडगे गेली बारा वर्षे शिकवत आहेत. पीएच.डी.चे मार्गदर्शन असलेल्या डॉ. खांडगेंच्या मार्गदर्शनाखाली सात विद्यार्थी संशोधन करत आहेत.‘खंडोबाचं जागरण’ या पुस्तकासाठी त्यांना 2010चा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट संशोधन ग्रंथांचा वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे. या खेरीज शासनाचा सांस्कृतिक विभागाचा कलादान पुरस्कार मिळवलेल्या डॉ. खांडगेंनी भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या महापरिषदेवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. 2010मध्ये त्यांनी चीनमधील बीजिंग येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेत भारताचे नेतृत्व करताना लोकसंगीतावर निबंध सादर केला तर याचवर्षी अमेरिकेतील नॅशव्हिला येथे आंतरराष्ट्रीय लोकसाहित्य लोकसंस्कृती परिषदेत भारताचे नेतृत्व करताना लोककलांवर निबंध सादर केला. […]
संजीवकुमारने प्रत्येक रोल आव्हान म्हणून स्वीकारला. त्याची लांबी बघितली नाही कारण त्याला आपल्या अभिनयाच्या ताकदिवर पूर्ण विश्वास होता, त्याला दस्तक चित्रपट मिळाला.त्या चित्रपटाला अवॉर्ड मिळाले ( ह्या चित्रपटातील “ हम हे मताए कुचा बाजार की तरहा “ या गाण्यात संजीवकुमारची अगतिकता,चीड द्वेष पाहिली की संजीवकुमार काय चीज आहे हे लक्षात येते फक्त पाच ते दहा सेकंद त्याच्यावर शूट आहे ) कोशिश मध्ये तर एकही वाक्य नव्हते ,जे बोलायचे होते ते डोळे व देहबोलीतून.नया दिन नई रात ह्या चित्रपटासाठी आधी दिलीपकुमारला विचारले होते पण त्याने सांगितले की “ माझ्या पेक्षा संजीवकुमार काम जास्त चांगले करेल.” उलझन चित्रपटांच्यावेळी सुलक्षणा पंडित त्याच्या प्रेमात पडली,पण त्याने नकार दिला. […]
पंढरीची वाट – पाऊले चालती, माऊली माऊली – गजर मुखातुनी. भागवताची पताका – घेऊनी सोबत , भाबडे दिसे ते रूप – वारकऱ्यांचे. मनी एक भाव – दर्शनाचा ठाव, दुजा न विचार – हृदयी वसे. भजन कीर्तनाचा – उसळे कल्लोळ, टाळ मृदुंगाची मिळे – साथ तया. मेळा वारीचा – वेगे वेगे चाले, ओढ भेटीची मनी – विठुरायाच्या. […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. राम नेमाडे यांनी लिहिलेला हा लेख जीवनाचा मार्ग सरळ नसतोच कधी. त्यात वेडीवाकडी वळणे, खाचखळगे असतातच. फुलांचे ताटवे फुललेले पाहावयाचेत ना मग त्यातून वाट काढण्याचीही तयारी ठेवावी लागते. प्रत्येक मोठा माणूस शून्यातूनच मोठा झालेला असतो. शून्याचा आकार लहान मोठा असू शकतो पण मूल्य त्याचे तेवढेच. मोठेपण मिळते खरे पण […]
एखाद्या सिनेमाचा आस्वाद करताना त्याचे थिम म्युझीक त्या सिनेमाशी किती एकरुप होउ शकते याचे सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे बेन हर. सिनेमाच्या प्रत्येक फ्रेमला जिवंत करणारे एक विलक्षण पार्श्वसंगीत बेन हर हा सिनेमा पाहताना तुम्ही अनुभवत राहता. इतके की सिनेमा संपल्यानंतरही बरेच तास ते तुमच्या डोक्यातून जात नाही. ते सारे प्रसंग तुम्हाला राहून राहून आठवत राहतात..अगदी तुमच्या स्वप्नातही..ही कमाल मिल्कस रोजाच्या जबरदस्त थीम संगीताची आहे. […]
कन्नुदादा गेला, पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. आईचं सगळं क्रियाकर्म आटपून कन्नुदादा घरी परतला तोच तापाने फणफणत. ताप, खोकला आणि उपाशी पोट. दुसऱ्या दिवशी म्यूनसिपालिटीच्या दवाखान्यात नेलं त्याला. टेस्ट केली आणि ती positive आली. […]
काही दिवसापूर्वी विजयने एका किर्तनात एक कथा ऐकली ती कथा अशी होती की एका गावात एक मोठे साधू महाराज येतात.. त्या गावातील लोक खूपच धार्मिक असतात ते त्या साधूना लोक वर्गणीतून एक आश्रम बांधून देतात .. त्यावर ते साधू महाराज मानत विचार करतात या गावाने आपल्यावर उपकार केलेले आहेत त्या उपकाराची परतफेड आपल्याला करायला हवी म्हणून ते त्या गावकऱ्यांना सांगतात तुम्ही मला तुमच्या गावातील पन्नास विद्यार्थी द्या मी त्या पन्नास विद्यार्थ्यांना दोन वर्षे शिकवून ज्ञानी करेन त्याप्रमाणे गावकरी ४९ विद्यार्थी जमा करतात पण एक विद्यार्थी कमी पडत असतो. त्या गावात एक मुलगा असतो तो फक्त खात असतो आणि झोपत असतो. गावकरी विचार करतात ५० वा विद्यार्थी म्हणून ह्याला पाठवू या ! घरी झोपा काढतो त्या ऐवजी तेथे जाऊन झोपा काढेल. ठरल्याप्रमाणे ते साधू त्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात करतात तो ५० वा विद्यार्थी आपल्या सवयी प्रमाणे मागे भिंतीला टेकून झोपा काढत असतो. हा ! हा ! म्हणता एक वर्ष होते .. साधू महाराज त्या मागे बसलेल्या ५० व्या विद्यार्थ्याला उठवून पुढे आणून बसवायला सांगतात आणि सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणतात,” एक गॊष्ट लक्षात ठेवा ! ईश्वर चराचर आहे … […]
कोरड्या सोपस्काराचे कोरडेच झरे वैराण वाळवंटातील भगभगीत वारे नात्यांचे आखीवरेखीव बंध काही आपुलकीचा आनंद गंध नाही हास्याच्या कृत्रिम कवायती या अंतरीचा त्यात उन्माद नाही भावनांना यांच्या ओल नाही जिव्हाळ्याचे कुठे बोल नाही आटलेल्याच मनोनद्या साऱ्या पात्र कुणाचेच खोल नाही आपुलकीची ओसरतीही सर नाही भावनांना कुणाच्याही घर नाही अहिल्याच्या शिळांना तर आता कुणा श्रीरामाचा कर नाही काळजात […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions