नवीन लेखन...

अध्यात्मात सद्गुणांचे महत्व

मार्गांधारे वर्तावि । विश्व हे मोहोरे लावावे ।। या ज्ञानदेवांच्या उक्तीप्रमाणे पू. स्वामी स्वरुपानंदाचे जीवन होते. सहज बोलण्यातून, अत्यंत हळुवारपणे ते साधकाला मार्गर्शन करीत असत. या सर्वांतून सर्वांच्या साधनेला गती मिळत असे. मानवी जीवन हे निवृत्ती व प्रवृत्तीच्या किनाऱ्यातून वाहत असते. साधकही या गतिमान जीवनात हेलकावे घेत असतो. तेव्हा आपले ज्ञानेश्वरी, दासबोध, श्रीमद्भागवतासारखे ग्रंथ, संतांचे अभंग, […]

‘उरी-दी सर्जीकल स्ट्राइक’

मला वाटते ‘उरी’ या सिनेमाने नव्या भारताने सर्जीकल स्ट्राइक्स करुन शत्रु राष्ट्रांच्या व त्यांनी पोसलेल्या दहशतावाद्यांच्या मनात धडकी भरवण्याचे व भिती बसवण्याचे जे काम केलय ते हुबेहुब या सिनेमात प्रतिबिंबीत केलय. ‘ये नया भारत है..ये घुसेगा भी और मारेगा भी..’ हे वाक्य भारतीय लष्कराने दोन सर्जिकल स्ट्राईक करुन अधोरेखित केलय. त्यामुळेच प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी हा लेख लिहीताना मला हा पूर्णतया नव्या भारताचे प्रतिनिधित्व करणारा सिनेमा वाटतो. […]

एक परीस स्पर्श ( भाग – ४६ )

विजय कोठेही असला तरी त्याचे डोळे आणि कान सताड उघडे असतात. लोकांच्यात होणारे संभाषण हे तर त्याच्या कविता, कथा आणि लेखांचे खाद्य असते. लेखक ,कवी असो अथवा पत्रकार त्यांना  सतत लोकांच्या भाव – भावनांचा विचार करत राहावे लागते. काही दिवसापूर्वी विजय बसने प्रवास करत होता. प्रवासात दोन स्त्रियांचा संवाद त्याच्या कानावर पडत होता… बायका तश्या बऱ्यापैकी […]

आईला

तुमचं आमचं नातं कधी एका जन्माचं गुलाम नव्हतं ऋणं आपली फेडता फेडता बंध पावले गाढ दृढता ॥ १ ॥ मनाचा कुठला कोपरा काही जिथे तुमचा ठसा नाही तुमच्या लावल्या वळणांनी सरळ झाले मार्ग जीवनी ॥ २ ॥ दुर्धर दुर्गमशा वाटेवरती काजळलेल्या निराशराती संस्कारांचा दीप सोबतीला आशीर्वादाचा कवडसा ओला ॥ ३ ॥ तुम्ही आम्हा दिलं नाही असं […]

भारतमातेच्या वीरांगना – ५५ – मणिबेन पटेल

१९३० साली मणिबेन आपल्या वडिलांच्या बरोबर काम करू लागल्या. सरदार पटेलांचे सगळे वेळापत्रक त्याच बघत. त्यांच्या कामाच्या, विचारांच्या नोंदी ठेऊ लागल्या. १९४५ साली कारागृहातून परतल्यावर सुद्धा त्या आपल्या वडिलांबरोबर काम करत राहिल्या. १९५० साली सरदार पटेल ह्यांना देवाज्ञा झाली. त्यानंतर मणिबेन ह्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. १९७६ सालच्या ‘इमर्जन्सी’ मध्ये त्यांना परत एकदा कारावास भोगावा लागला. […]

मायेची ओढ़

कधी आठवण अशी येते सारा जीव व्याकुळ होतो प्रियजनाची ओढ़ अनावर अश्रुंना अंतरी महापुर येतो ऋणानुबंधी,जीवलगाला बघण्या जीव आतुर होतो वास्तवताच ती दुर्भलतेची क्षण, अनावर कातर होतो विज्ञान प्रतापी, गरुडपंखी वैभवाला सहज कवेत घेतो अंतरी मायेची ओढ़ आगळी स्पर्शासाठी जीव तडफडतो सांगा, कसे सावरावे मनाला अधीर लोचनांना महापुर येतो जगणेच केवळ हाती असते हतबलतेला या पर्याय […]

मागणे आणखी न काही

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी लिहिलेला हा लेख ‘मनसा चिंतितम् एकं दैवं अन्यत्र चिंतयेत’ असं संस्कृतात एक वचन आहे. आपल्या मायमराठीत एक कवन आहे, त्या कवनात स्वच्छ अशी शाहिरी भाषा आहे. ‘मनात येती हत्ती घोडे, पालखीत बैसावे, । देवाजीच्या मनात आले, पायी चालवावे ।। मर्जी देवाची… एकूण देवाची मर्जी म्हणून निःश्वास […]

बग्या 

खरंच बग्या सारखी माणसं हि आलेपाकाच्या वडी सारखी असतात, अत्यंत गुणकारी, थोडी गोड, थोडी तिखट , पण जिभेवर ठेवल्या शिवाय कुठल्याच पदार्थाची खरी चव कळत नाही हेच खरं. […]

पुन्हा वेध १०००चे…

स्वर – मंच ॲकॅडमीपासून इतके दिवस कधी दूर राहिलो नव्हतो. पुन्हा एकदा सर्व पूर्ववत सुरू केले आणि मग कार्यक्रमांना सुरुवात केली. ‘नज़राना गीत – गज़लोंका’ हा नवीन कार्यक्रम आयोजक मोहन पवार यांच्यासाठी केला. अजून काही कार्यक्रमांसाठी महाराष्ट्राबाहेर गेलो. २७ फेब्रुवारी २०१० रोजी मराठी अभिमान गीत प्रकाशन सोहळा ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये संपन्न झाला. यावेळी आम्ही मराठी […]

केबिन सिग्नलतंत्रज्ञ

सिग्नल व्यवस्था अखंड सुरळीत ठेवण्याचं काम केबीन सिग्नलतंत्रज्ञ करतात. रेल्वेचे रुळ, त्यांतील सांधे खेचण्याचा हलणारा दांडा, बॉक्स, विद्युतप्रवाह या सर्वांचा समन्वय झाला, की सिग्नल लागतो. मध्ये एखादा छोटासा खडा जरी आला, तरी यंत्रणा बिघडते. हा बिघाड तत्परतेने शोधणारे रेल्वे कर्मचारी केबिनमध्ये सतत सतर्क असतात. प्रत्येक केबिनची कामाची हद्द २२ कि.मी. किंवा त्याहून जास्त किलोमीटर एवढी असते. […]

1 13 14 15 16 17 28
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..