मुंबई सी एस एम टी ला लोकल प्लॅटफॉर्म वर आली होती पण अनाउन्समेंट किंवा इंडिकेटर वर कोणती लोकल आहे त्याची कुठलीच सुचना नव्हती. त्यामुळे फारशी लोकं लोकल थांबायच्या आत आणि थांबल्यावर सुद्धा चढली नाही. मला कल्याणला जायचे असल्याने मी पटकन चढलो आणि विंडो सीट मिळवली. दोन मिनिटात इंडिकेटर वर ती लोकल 6.53 ची कर्जत फास्ट असल्याचे […]
१९९२ म्हणजे नव्वदीच्या दशकात ज्या गावात शिक्षणाला फारसं महत्व दीलं जात नव्हतं त्या काळात रीटायर्ड मेजर श्री. महादेव गोविंद तोडकर ( MG आण्णा ) यांनी ग्रंथालयाची स्थापना केली आणी गावाला ज्ञानाच्या व्दारात उभा करण्याचं काम केलं. ज्ञानाचं दान तरूणांच्या पदरात देवून त्यांना सुशिक्षीत, सुसंस्कृत बनवण्याचं पहीलं पाउल नव्वदीच्या दशकात त्यांनी टाकलं. […]
“खळ खळ गोदा ” अशा खळखळत्या आवाजात जेव्हा राहुल देशपांडे चित्रपटाच्या शेवटी एक प्रकारे “गोदे ” ची आरती करतो, तेव्हा कुचंबलेल्या मीही थोडा स्वच्छ श्वास घेतला. […]
पहाटेच्या वेळी इन्स्पेक्टर मोहिते मिरज स्टेशन वर गाडीतून उतरले . पाटील व त्यांचा मुलगा केदार त्यांच्या गाडीची वाट पाहात प्लॅटफॉर्म वर उभेच होते . खरे तर इ . मोहित्यांना सरळ सरकारी विश्राम गृहात जाण्याची ईच्छा होती . परंतु पाटीलांच्या आग्रहाखातर सकाळच्या चहासाठी त्यांनी पाटीलांकडे जाणे कबूल केले होते . […]
बर्वे साहेबांना गणपती दोन दिवसांवर येऊन ठेपले तरीही कामाच्या व्यापामुळे घरातल्या गणेशोत्सवासाठी गणपतीची मुर्ती अगोदरच जाऊन बुक करता आली नव्हती. या शहरात बदली होऊन राहायला येऊन त्यांना चारच महिने झाले होते. तसे कामावर जाता येताना त्यांच्या नजरेस दोन तीन मुर्तीकारांच्या कार्यशाळा पडल्या होत्या. बर्वे बाईंनी आणि मुलांनी श्री गणेशाची मुर्ती पसंत केली का असे विचारले असता […]
कल्पनाचं वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. किशोरनं तिला पाहताक्षणीच पसंत केलं होतं. किशोरचे आई-बाबा दोन वर्षे त्याच्यासाठी मुली पहात होते. प्रत्येकवेळी काहीना काही कारणाने लग्न काही ठरत नव्हतं. किशोर चांगल्या कंपनीत नोकरीला होता. त्याला शिकलेली आणि गृहकृत्यदक्ष अशी पत्नी हवी होती. त्याच्या आईचा तो लाडका असल्याने आईने त्याच्याच पसंतीला महत्त्व देण्याचे ठरविले होते. किशोरचे बाबा मात्र दोघांच्या […]
भौतिक सुखे असे साध्या शब्दात म्हणता येईल मिळवण्यासाठी आपली सारी उर्जा खर्च करतो. आता आपण आपले श्रेयस, म्हणजे भौतिक सुखापलीकडचे असे काही तरी, जे आपल्या आत्म्याला परमानंद देईल, खर्या अर्थाने जगण्याचे सार्थक करेल, ते शोधून त्याचा उत्साह, उमेद आणि उर्जेने पाठपुरावा करायला हवा. हे सर्वात महत्त्वाचे आहे कारण त्यातच आपल्या जगण्याचे प्रयोजन असते.ज्येष्ठ होऊनही वृद्धत्त्व टाळायचे […]
राज स्त्रिया पालखीचा वापर करीत. वनविहार करायला जाणाऱ्या स्त्रिया पालखीतून जात असतं. उत्सव प्रसंगी, स्वागत प्रसंगी, देवळात जाताना, बाजारात जातांना पूर्वी श्रीमंत स्त्रिया पालखीतून जात असत. स्त्रियांच्या किंवा राजाच्या पालख्या एकट्याच निघत नसत. त्यांच्याबरोबर फार मोठा लवाजमा असे. […]
पुलंच्या नंतर काही वर्षांतच त्यांचे सगळे मानसपुत्रही इहलोक सोडून परलोकवासी झाले. परवाच पुलंच्या एकशे तिनव्या जयंतीनिमित्त त्यांचे सगळ्यांचे नातू शिल्लक मुलं पणतू सगळ्यांनी एकत्र गेट टुगेदर केलं होतं. साक्षात सरस्वतीने आणि रंगशारदेने त्यांच्या सगळ्यांवर अमृत वर्षाव केला. आमच्या पूर्वजांना आम्ही खुशाल असल्याचा निरोप देण्याची विनंती त्यांनी सर्वांनी पुलंकडे केली. एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात अश्रू घेऊन सर्वजण आपल्या घरी उच्चतम स्मृती घेऊन गेली. […]
महाभारतातील एक गोष्ट आहे. एक गरीब वृद्ध हस्तिनापूरला गेला आणि धर्मराजाला भेटून त्याने दानाची याचना केली. मात्र सूर्यास्त झाल्यामुळे नियमानुसार धर्मराजाने त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. तो बिचारा माघारी फिरला. हे भीम पहात होता. तो धर्मराजाला म्हणाला, ‘दादा, एक विचारू का? तुम्ही त्या याचकाला उद्या दान देण्याचं कबूल केले आहे, मात्र त्याच्या उद्याच्या आयुष्याची तुम्ही खात्री […]