नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

भारतमातेच्या वीरांगना – ४७ – डॉ. इंदुमती नाईक

१८५६ पर्यत ब्रिटिशांचे एकछत्री साम्राज्य संपूर्ण भारतात स्थापित झाले होते. १८५७ चा ऐतिहासिक लढ्याने जनजगृती तर केली पण त्याला यश आले नाही. पुढे १८८५ पर्यंत राष्ट्रीय भावना वाढीस आली होती. लोकांमध्ये देशप्रेम, पारतंत्र्याची चीड, स्वराज्य हे सगळे विचार वाढतांना दिसून आले. सुरवातीला अर्ज-आर्जव करून अधिकार पदरात पाडून घ्यावे असे वाटत होते आणि तसेच काम पण सुरू होते,मात्र पुढे-पुढे ह्यातून निष्पन्न निघत नाही म्हटल्यावर मात्र जहाल विचार प्रबळ होऊ लागले. ह्या सगळ्या साठी संघटन महत्वाचे, एकी महत्वाची त्यासाठी काय काय करू शकतो, तर महाराष्ट्रातल्या पुण्याच्या डॉ इंदुमती नाईक ह्यांनी चक्क घरातच बांगड्यांचे दुकान काढले, घरा-घरातून स्वातंत्र्य चळवळ पोचविण्यासाठी. […]

‘राहून गेले….वाहून गेले….’

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. प्रदिप कर्णिक यांनी लिहिलेला हा लेख तुमच्या आयुष्यात राहून गेलेल्या, ज्या तुम्हाला करायच्या होत्या, पण होऊ शकल्या नाहीत, अशा विषयावर आमच्या दिवाळी अंकासाठी एक लेख लिहून द्यावा, असा श्री. नालेसाहेबांचा फोन आला. ते विषयाचा अधिक विस्तार करीत होते आणि मी त्याचवेळेला विषयाला मनात प्रारंभही केला. म्हटले, अरे वा, अगदीच […]

सफर लंडनची

माझ्या ७५०व्या कार्यक्रमाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. अनेक मोठ्या वर्तमानपत्रांनी या कार्यक्रमाची दखल घेतली. डॉ. आशा मंडपे यांनी टाईम्स ऑफ इंडियामध्ये ‘कोहिनूर ऑफ थाने’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला. त्या स्वतः उत्तम व्हायोलिन वादक असल्याने त्यांना गाण्याची उत्तम जाण आहे. अशा व्यक्तीने पाठ थोपटल्यास विशेष आनंद होतो. या कार्यक्रमानंतर आठ दिवस विश्रांती घेतली आणि पुढील एका महिन्यात […]

रेल्वे पोलिस आणि मी – भाग १ (आठवणींची मिसळ ०९)

तुम्ही सर्वांनीच अनेक वर्षे लोकलने किंवा अनेकवार दूर जाणाऱ्या गाड्यांनी प्रवास केला असेल आणि तरीही तुमचा कधीही रेल्वे पोलिसांशी संबंध आला नसेल. बहुतेकांनी रेल्वे पोलिसांना ओझरते कुठेतरी पाहिल्याच आठवत असेल. त्यामुळे तुम्हाला माझ्या आजच्या लेखाचा मथळा वाचून आश्चर्य वाटलं असेल. लेख लिहिण्याएवढा यांचा रेल्वे पोलिसांशी काय संबंध? विचार योग्य आहे.पण माझ्या बाबतीत अशा मजेदार घटना घडल्या की रेल्वे पोलिसांनी नाकी दम आणला. […]

उगाच काहीतरी – २

सोशल मीडिया आल्यापासून काही नतद्रष्ट लोकांनी चंगच बांधलेला आहे की आपल्याला एक ही सण आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने करू द्यायचा नाही. हे लोक इतर वेळेस झोपलेले असतात पण एखादा सण आला की यांना जाग येते आणि मग पोस्ट सुरु होतात. […]

भारतमातेच्या वीरांगना – ४६ – यशोधरा दसप्पा

१९३० साली झालेल्या जंगल सत्याग्रहात ही त्यांनी भाग घेतला ज्याचे फलित १२०० लोकांना कारावास भोगावा लागला. विदूरश्वथ जे कर्नाटकातील एक गावा आहे, तिथल्या सत्याग्रहाच्या वेळी पोलिसांनी समोरच्या घोळक्यावर गोळ्या झाडायला सुरवात केली, ३५ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आणि बाकीच्यांना कारावास मिळाला, श्रीमती यशोधरा दसप्पा त्यापैकी एक होत्या. त्यांचे घर म्हणजे भूमिगत सत्याग्रही लोकांसाठी हक्काची जागा. स्वातंत्र्य चळवळीतल्या सेनानी, वीरांगना ह्याचीभेटण्याची जागा. आपल्या देशातील एका वास्तू ‘हॅमिल्टन’ हे नामविधान त्यांना मान्य नव्हते, त्यासाठी त्यांनी अनेक पत्र लिहिलीत, अनेक ठिकाणी भाषणे दिली. […]

आय एम इन अ मिटिंग

माझं देशपांडेंकडे काही काम होतं. मी देशपांडेंना त्यांच्या मोबाईलवर फोन केला. देशपांडेंनी फोन घेतला. मी माझं नाव सांगितलं व त्यांना बोलण्यासाठी वेळ आहे का ते विचारलं. “आय एम इन अ मिटिंग, आय विल कॉल यू लेटर” देशपांडे दबक्या आवाजात उद्गारले. मी फोन बंद केला. देशपांडे मिटिंग आटोपल्यावर फोन करतील या समजूतीवर मी देशपांडेंच्या फोनची प्रतीक्षा करु […]

मुक्त विचार

मेंदूचा सक्रिय हिस्सा जेव्हा रिकामा असतो तेव्हा खूप काही नवं सुचतं, त्रास देणाऱ्या समस्यांची उत्तरे चुटकीसरशी मिळतात, शॉवर खाली असताना काहीतरी भन्नाट सुचून जातं. मानवी मेंदूची क्षमता अफाट असली तरी रोज जो अनावश्यक कचरा(क्लटर) आपण वेगवेगळ्या माध्यमांमधून त्यांत कोंबत असतो, ती केराची टोपली चालताना अंशतः रिकामी होते. […]

टारगेट ७५० चे

यानंतर दोन मोठ्या कार्यक्रमांसाठी मी गायलो. माझे आवडते संगीतकार एस.डी. बर्मन आणि सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा एक प्रदीर्घ कार्यक्रम इंद्रधनू या संस्थेने केला आणि माझे गुरू संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या रचनांचा ‘श्रीकांतसंध्या’ हा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकरता साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे आम्ही सादर केला. या कार्यक्रमात माझ्याबरोबर गायिका रंजना जोगळेकर आणि निवेदक भाऊ […]

दृष्टिकोन

आता मी सुद्धा माझा दृष्टिकोन बदलून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसा भाग घेता येईल  असे कार्यक्रम सादर करायचे ठरविले . विद्यार्थ्यांचा आनंद हाच तर माझा आनंद होता. मुलांच्या दृष्टिकोन जाणून घेतल्यामुळे मला  अनाकलनीय असं काहीतरी साध्य केल्याचा आनंद झाला.        […]

1 107 108 109 110 111 490
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..