कलमवाली बाई
‘राम लखन’ मध्ये ती जॅकी सोबत होती. ‘नरसिंम्हा’ मध्ये सनी देओल, ‘प्रहार’ मध्ये नाना पाटेकर, ‘रुदाली’ मध्ये राज बब्बर, ‘दिल चाहता है’ मध्ये अक्षय खन्ना सोबत. अशा विविध भूमिका तिने साकारलेल्या आहेत. […]
‘राम लखन’ मध्ये ती जॅकी सोबत होती. ‘नरसिंम्हा’ मध्ये सनी देओल, ‘प्रहार’ मध्ये नाना पाटेकर, ‘रुदाली’ मध्ये राज बब्बर, ‘दिल चाहता है’ मध्ये अक्षय खन्ना सोबत. अशा विविध भूमिका तिने साकारलेल्या आहेत. […]
नायिका म्हणून तिचा पहिला चित्रपट होता, ‘रिक्शावाला’ तो काही फारसा चालला नाही. ‘यादों की बारात’ या मल्टीस्टार चित्रपटात तिच्यावर ‘लेकर हम दिवाना दिल.’ हे गाणं चित्रीत केले गेले. या गाण्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली व चित्रपट निर्मात्यांची तिच्यासाठी रांग लागली. […]
मीनाकुमारीच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘साहिब बीवी और गुलाम’ हा होता. तिला बारा चित्रपटांसाठी फिल्मफेअरचं नामांकन मिळालं होतं, त्यांपैकी चार चित्रपटांसाठी हा पुरस्कार मिळाला. तिला शायरी लिहिण्याचा छंद होता. तिच्या शायरीने भरलेल्या डायऱ्या आज गुलजारजींकडे शाबूत आहेत. […]
१९७१ साली मी नटराज टाॅकीजला गजानन जहागिरदार दिग्दर्शित, ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हा कृष्णधवल चित्रपट पाहिला. त्यामध्ये श्रीकांत मोघे व आशा पोतदार, प्रमुख भूमिकेत होते व एका सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या भूमिकेत एक नवीन चेहरा पहिल्यांदाच दिसला. तेव्हाच मला खात्री पटली होती की, हा ‘लंबी रेस का घोडा’ आहे. आणि घडलंही तसंच. आज त्या चित्रपटाला ५१ वर्षे पूर्ण झाली. […]
काही वर्षांनी दिपक इतका आळशी झाला की, त्याचे सहीपासूनचे सर्व व्यवहार संतोषच सांभाळू लागला. संतोषला काही वेळा, एक विचार सतावत रहायचा की उद्या दिपकनं आपल्याशी भांडून हाकलून दिलं तर आपली अवस्था अतिशय वाईट होईल.. त्यासाठी एकदा त्यानं दिपकला विनंती केली की, माझ्या नावावर ठेवायला काही पैसे देतोस का? त्यावर दिपक म्हणाला अरे, सर्व पैसे तुझ्याच खात्यावर असताना अजून तुला काय हवं? संतोष हे ऐकून, गप्प रहायचा.. […]
१९९२ साली राॅबर्ट जेम्स वाॅलर यानं लिहिलेली, त्याच नावाची कादंबरी प्रकाशित झाली. त्या कादंबरीची ९.५ दशलक्षची विक्री होऊन, अल्पावधीतच ‘बेस्टसेलर’ ठरली. १९९४ साली क्लींट ईस्टवुडने त्यावर चित्रपट करायचे ठरविले. ५२ दिवसांच्या शेड्युलच्या, पेपरवर्कनुसार शुटींग सुरु झाले. सर्व सहकाऱ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने, दहा दिवस आधीच चित्रीकरण पूर्ण झाले. २ जून १९९५ रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला. चित्रपटाने १८२ दशलक्ष डाॅलर्सचा अभूतपूर्व व्यवसाय केला!! […]
मर्लिनचा जन्म १ जून १९२६ रोजी, लाॅस एंजलिस येथे झाला. तिचं बालपण मात्र अनाथाश्रमात गेलं. नंतर अकरा पालकांनी तिचा सांभाळ केला. वयाच्या सतराव्या वर्षापासून तिनं माॅडेलिंग सुरु केलं. १९४६ साली तिनं चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. चार वर्षांच्या परिश्रमानंतर तिला प्रसिद्धी मिळू लागली.१९५३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नायगारा’ चित्रपटाने ती प्रकाशझोतात आली. १९५५ मधील तिच्या ‘सेव्हन इयर इच’ या चित्रपटाने तुफान व्यवसाय केला. याच चित्रपटावरुन ‘सखी शेजारिणी’ हे मराठी नाटक बेतले होते. १९५९ सालातील ‘समलाईक इट हाॅट’ या चित्रपटाने तिला सर्वोच्च असा ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ मिळवून दिला. […]
‘मेरा गाव मेरा देश’ चित्रपटाचे वेळी महेश भट्ट, राज खोसलांचे सहदिग्दर्शक होते. या शुटींगच्या दरम्यान विनोद खन्ना व महेश भट्ट यांची जिवलग मैत्री झाली. संजय दत्तच्या पदार्पणातील ‘राॅकी’ चित्रपट निर्मिती अवस्थेत असताना सुनील दत्त यांना नर्गिसच्या उपचारासाठी वारंवार परदेशात जावं लागे. तेव्हा राज खोसला यांनी मैत्रीला जागून, उर्वरित चित्रपट पूर्ण केला. […]
माझ्या वडिलांनी मला पहिलीसाठी भावे प्राथमिक शाळेत घातले. तेव्हा माझ्या हातात पहिले पुस्तक आले ते ‘बालभारती’चे! त्यावरील दीनानाथ दलाल यांनी काढलेले ‘मुला-मुलीचे पुस्तक वाचताना’चे रंगीत चित्र माझ्या डोक्यात, फिट्ट बसले! त्या छोट्या पुस्तकाच्या आतीलही रंगीत चित्रे, दलालांचीच होती.. मोट चालवणारा शेतकरी.. झाडाखाली बसून भाजी-भाकरी खाणारा शेतकरी.. खेळणारी मुलं.. बाहुली हातात घेतलेली मुलगी.. इथंच माझ्या मनावर त्यांच्या, अप्रतिम चित्रशैलीचा पगडा बसला.. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions