नवीन लेखन...

रणदीप हुडा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर

मंडळी सप्रे म नमस्कार !

रणदीप हुडा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा पाहिला. आज हा लेख लिहिण्याचा उद्देश या सिनेमाची समिक्षा करणे हा नसून , ३ तासांत सावरकर नावाचे विद्वान ज्वालामुखी पडद्यावर साकारणार्‍या रणदीप हुडाची वारेमाप स्तुती करणे , या सिनेमात येणारी पात्रं ही सावरकर या व्यक्तिमत्वाची व्यापक प्रतिमा उंचावणार्‍या पद्धतीने दिग्दर्शित करणार्‍या रणदीपचं कौतुक करणं — हा आहे!

सिनेमात येणार्‍या मदनलाल धिंग्रा या रगेल आणि रंगेल व्यक्तिमत्वामधे क्रांतिकारी देशभक्त म्हणून घडून आलेला बदल , भारतातील राजकारणातील इंग्रजांना खूश ठेवण्याच्या दृष्टीने राजकारण्यांनी केलेले लांगूलचालन , जिना , नेहेरु , गांधी यांचे बोटचेपे राजकारण , सेल्यूलर जेलचा जेलर डेव्हिड बॅरी व तिथला मुसलमान हवालदार यांची पात्र निवड व त्यांचा अभिनिवेष , दोन मिनिटांसाठी शृंखला दूर केल्यावर मोकळ्या अवयवांसह आकाशाला कवेत घेण्यासाठी स्वातंत्र्यवीरांचा आवेश व अभिनय ,लोकमान्य टिळक , सुभाषचंद्र बोस , बाबाराव व नारायण सावरकर ही पात्रे , अभिनव भारत या संस्थेच्या स्थापनेपासून ते सिनेमा संपेतोवर दाखवलेल्या कार्यपद्धतीतून अखंड भारत ही स्वातंत्र्यवीरांची पक्की मानसिक बैठक , भारत स्वतंत्र झाल्यानंतरही स्वातंत्र्यवीरांचा आपल्याच सरकारने केलेला मानसिक छळ व अटकसत्रे ( कुठेतरी मनाला जाणवून गेलं की अरे आता बास करा रे त्या पुण्यात्माचा हा छळ! निदान हा सिनेमा तरी लवकर संपवा म्हणजे या त्यांच्या यातना आम्हाला बघायला नकोत ! ) , सेल्यूलर जेलमधील स्वातंत्र्यवीरांची खोली — किडे पडलेलं अन्न , नंतर त्यांना झालेली उलटी व नंतरचा अतिसार….. कल्पनेपेक्षाही भयानक सत्य अतिशय वास्तववादी चित्रणातून दाखवलं गेलंय ! सहा फूट धिप्पाड रणदीपने सेल्यूलर जेलनंतरचे स्वातंत्र्यवीर वास्तववादी वाटावेत म्हणून कसोशीने केलेले शारीरीक बदल ….. रणदीप , तुला सलाम दोस्ता !

एक आमचे बाबूजी होते — कै.सुधीर फडके—ज्यांनी सावरकर सिनेमा काढण्यासाठी जिवाचं रान केलं आणि ते स्वप्न पूर्ण केलं आणि दुसरा तू , आपलं घरदार विकून सिनेमा पूर्ण करणारा रणदीप !

सिनेमाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे मूळ सिनेमा हिंदी व वेगळा सिनेमा रुपांतर मराठीत आहे.यामुळे अखिल भारतात हा सिनेमा पोचणार हे नक्की !

गांधी व सावरकर यांचे राजकीय विचार परस्परविरोधी होते पण मैं गांधीका विरोधक नहीं हूँ , अहिंसाका विरोधक हूँ! असं म्हणणारे सावरकर प्रसंगानुरूप गांधींविषयी जे संवाद बोलतात ते खरोखरच त्या त्या प्रसंगी आतडं पिळवटून टाकतात !

सिनेमा निघाल्या निघाल्या रणदीपच्या विरोधातील पण काही व्हिडिओ पाहिले , काही कौतुक करणारे लेख वाचले , या देशात सावरकरांनी रत्नागिरीत बांधलेले पतित पावन मंदिर ( जे इतर कुठल्याही राजकारणी नेत्यांना कल्पनेतही जमलं नाही ! ) , जीवनभर पाहिलेलं अखंड भारत हे स्वप्न….. तात्याराव , तुम्ही चुकीच्या देशात जन्माला आलात हो! भारतरत्न ची योग्यता असलेले तुम्ही — एक थोर क्रांतिकारी , कुशाग्र बुद्धिमत्तेचे साहित्यिक , थोर व्यक्तिमत्व : कुणीही सोम्या गोम्या उठतो आणि तुमच्याविरोधात बोलतो? आम्हां भारतीयांची खरंच योग्यता नाही हो तुमच्यासारखा थोर क्रांतिकारी आमच्या देशात जन्माला येण्याची !

वर्षानुवर्षे वाट बघणार्‍या करोडो भारतीयांचं विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न मिळण्याचं स्वप्न साकार करण्याचं पुण्य कधी पूर्ण होणार रे ईश्वरा ?

तुम्ही गांधीवादी असा वा सावरकरवादी , सावरकर कळण्यासाठी आणि ज्याला आपल्यापेक्षा बरेच जास्त सावरकर कळलेत — त्या रणदीपचं काम आणि दिग्दर्शन बघण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा थिएटरला जाऊन नक्की बघा ! आपलं घरदार विकणार्‍या कलाकाराचा एवढा हक्क नक्कीच आहे , हो ना ?

कळावे,
© उदय गंगाधर सप्रे म—ठाणे

शनिवार २३ मार्च २०२४ ( हुतात्मा दिन भगतसिंग—राजगुरु—सुखदेव—सुखदेव यांना २३ मार्च १९३१ ला फाशी दिलं गेलं ! )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..