नवीन लेखन...

देवा तुझ्या दारी आलो

‘उलाढाल’ या चित्रपटासाठी संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले आणि जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेले हे गाणे जबरदस्त हीट झाले आहे. विविध वाहिन्यांवरील संगीत स्पर्धेत सहभागी स्पर्धकांकडून तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतही ते हमखास गायले आणि वाजवले जाते. हे गाणे स्वतः अजय गोगावले यांनी गायले असून अजय-अतुल यांच्या खास शैलीमुळे गाण्याला एक वेगळेच  परिमाण मिळाले. […]

श्री प्रभु श्रीराम मंदिर, रामटेक, नागपूर

प्रभु श्री राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. नागपूरपासून ५५ कि.मी. वर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे. […]

श्रीनृसिंहसरस्वती महाराज, कारंजे

श्रीनृसिंहसरस्वतींचा जन्म वऱ्हाड प्रांतातील सुप्रसिद्ध ‘कारंजा’ या गावी झाला. त्यांच्या जन्मतिथीविषयी एकवाक्यता असली तरी जन्मशतकाविषयी विद्वानात मतभेद आहेत. काहींनी त्यांचा जन्म शके १३०० च्या सुमारास झाला असे म्हटले आहे, तर कुणी १३१४ हाच शक जन्मशक म्हणून मानतात. […]

श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, कुरवपूर

श्रीपाद श्रीवल्लभ यांची माहिती दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य ग्रंथ जो ‘गुरुचरित्र’ त्याच्या पाच, आठ, नऊ व दहा या चार अध्यायात आलेली आहे. त्यापलीकडे त्यांची माहिती इतर कोठल्याही ग्रंथात विशेष करून मिळत नाही. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामधुन त्यांचे चरित्र सर्वश्रुत झाले आहे. श्रीगुरुचरित्र ज्यांनी लिहिले त्या श्रीसरस्वती गंगाधरांचा हेतू श्रीनृसिंहसरस्वतींची लीला वर्णन करण्याचा असल्यामुळे श्रीपादश्रीवल्लभांची माहिती त्यात केवळ पूर्वपीठिका सांगण्यापुरतीच आलेली आहे. […]

श्री दत्तात्रय संप्रदाय

अत्रि – अनुसूयानंदन प्रभू श्रीदत्तात्रेय महाराजांनी जगदुध्दारासाठी श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती, श्रीमाणिक प्रभू आणि अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ असे चार अवतार धारण केले. ‘विश्वगुरु’ म्हणून उपनिषदकारांनी गौरविलेल्या प्रभू दत्तात्रेयांच्या महान संप्रदायाचे प्राचीनकालापासून चालत आलेले लोकोदाराचे व वैदिक धर्मरक्षणाचे कार्य ज्या चार दत्तावतारांनी पुढे चालविले, त्यांची ओळख करून घेण्यापूर्वी आपण दत्तसंप्रदायाची थोडक्यात माहिती करून घेऊ. […]

सेरेंगेटीतील श्वापदांचे अदभुत स्थलांतर

सफरीत ओढे, नाले, नद्या ओलांडण्यासाठी श्वापदांची एक रांगेत पन्नास किमी लांबीची विलक्षण रांग लागते. १९५१ साली ब्रिटिश राज्यकर्त्यांनी हा पाचहजार सातशे चौरस मैलांचा टापू ‘सेरेंगेटी राष्ट्रीय उद्यान’ म्हणून घोषित केला. श्वापदांच्या या मांदियाळीत सामील असतात, वनराज सिंह, डहाण्या वाघ, चित्ते, किंकाळी फोडणारे तरस, कोल्हे. वर आकाशात गिधाडे भक्षाच्या शोधात सतत घिरट्या घालत असतात. […]

एका पत्रकाराला ठार मारला!

डेव्हिड हा केवळ पत्रकारच नव्हता. तो वृत्तपत्र कर्मचारी संघटनेचा अध्यक्षही होता. निदर्शक दडपशाही विरोध-कृती मोहिम ठरविण्यासाठी दारेसालाम या राजधानीपासून पाचशे किलोमीटर वर असलेल्या या खेड्यात जमले होते. […]

एका बेटावरचे बलाढ्य कासव

कासवांचे पृथ्वीतलावर २२ कोटी वर्षांपासून वास्तव्य आहे. म्हणजे कासव हे सरडे, साप किंवा मगरी या प्राण्यांपेक्षा पुरातन प्राणी आहे. […]

1 2 3 102
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..