नवीन लेखन...

लाले दी जान !

मंडळी सप्रे म नमस्कार !
NETFLIX वर एक अप्रतिम सुंदर चित्रपट पाहिला.एका चित्रपटातून किती सुंदर शिकवण देता येऊ शकते याचं एक उत्कृष्ट उदाहरण !

समाजातील एका अनिष्ट प्रथेमुळे किती जणांचं आयुष्य पणाला लागू शकतं याची कल्पनाही आपण करु शकत नाही.आजही आपल्या देशात स्त्री ला किती दुय्यम वागणूक दिली जाते हे लक्षात येतं.वास्तवीकत: स्त्री ही पुरुषापेक्षा कैक लक्ष पटीने श्रेष्ठ आहे आणि संसार छान चालायला जितकी पुरुषाची तितकीच स्त्री ची भूमिकाही महत्वाची असते ! एखाद्या घरी पुरुष गेला तर त्याच्यापश्चात् स्त्री फारच क्वचित पुनर्विवाह करून पुढील आयुष्य जगते.बहुतांश वेळी स्त्री आपली अपत्य ( असल्यास ) आणि माणसांसह यांना स्वाभिमानाने उभं करते ! पण स्त्रीच्या पश्चात् पुरुष इतक्या धैर्याने उभा राहण्याची खूपच कमी उदाहरणं पहाण्यात येतात ( माझ्या पहाण्यात नात्यातीलच असे काही पुरुष आहेत पण अशी उदाहरणं अपवादात्मक ! )

संपूर्ण चित्रपटातील संवाद आणि दिग्दर्शन अप्रतिम आहेत ! दोन प्रसंगी डोळे भरून वाहू लागतात — एकदा चित्रपटाच्या मध्यावर आणि एकदा शेवटी….. मुलगी शिकली प्रगति झाली! हे अजूनही छापील वाक्य वाटावं अशीच परिस्थिती आहे देशामधे शहरे वगळता बर्‍याच ठिकाणी…..

सगळे अभिनेते नवीन , अनोळखी पण इतकी सुंदर कामं केली आहेत की दाद द्यावीशी वाटते.निर्माते किरण राव व आमीर खान ! दिग्दर्शिका किरण राव !

चित्रपटाचं नांव ला पता लेडीज् ! म्हणूनच लेखाचं शीर्षक आहे लाले दी जान !

चित्रपटाची कथा अजिबात न सांगता जेवढं लिहिता आलं तेवढं लिहिलंय , बाकी स्वत: अतिशय परफेक्शनीस्ट असलेल्या आमीर खाननं चित्रपट पण तितकाच सुंदर काढलाय आणि चित्रपटातून ठळक शिकवण दिली आहे ! चित्रपटात एक प्रसंग असा आहे ज्यात लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण! ही म्हण लक्षात येते ( अशी मस्त सणसणीत कानाखाली वाजवलीये किरण राव ने उत्कृष्ट दिग्दर्शनाची चुणूक दाखवत! ) तो प्रसंग तुमच्यासारखे चाणाक्ष लोक नक्की ओळखतील याची खात्री आहे !

कळावे ,

-उदय गंगाधर सप्रे म—ठाणे
शनिवार २६ एप्रिल २०२४ दु.३.०० वा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..