नवीन लेखन...

विरोध होता क्रोध वाढतो (सुमंत उवाच – ५१)

विरोध होता क्रोध वाढतो
जाळुनी टाकी सारे
लाकडातल्या अग्नी ने
लाकूडच बनती निखारे

वानर येति रचुनी लाकडे
अग्नी शमवूनी जाई
मनातला तो क्रोध घालावी
हनुमंत प्रसाद देई

अर्थ

ज्यात जे आहे तेच त्याच्या विनाशाचं कारण ठरू लागलं तर आयुष्य क्षणात संपायला वेळ लागत नाही. लाकडात असलेला अग्नी शेवटी त्याच लाकडाला जाळून टाकतो आणि त्याची केवळ राख बनून रहाते. तसेच माणसाच्या शरीरातील क्रोध हाही अग्नीचाच प्रकार म्हणून समजला जातो. एखाद्या वेळी जर तो क्रोध वाढू लागला तर त्या अग्नीचे वणव्यात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही आणि एकदा का वणवा पेटला की मग त्या क्रोधाग्नीत शरीरातील इतर चांगले गुण जळून राख होतात आणि मग हातात काहीच रहात नाही.

आपल्या आजूबाजूचे आपल्याला कोणत्या गोष्टी साठी चिथवत तर नाहीत ना? आपण आपल्या क्रोधाचा बळी तर ठरत नाही ना? याचा विचार करायला पाहिजे. अशा वेळी श्री हनुमंत यांची आठवण होते. क्रोधास क्रोध न मानता त्यास ऊर्जा म्हणून जेव्हा पाहिले जाते तेव्हा त्याचा फायदा खुप जास्त होतो याचे उत्तम उदाहरण आहे श्री मारुती. ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली गेली की लंका दहन सारखे अशक्य पराक्रम ही शक्य होतात.

महाराजांच्या मावळ्यांनी त्यांची ऊर्जा स्वराज्य स्थापन करण्यात लावली त्यामुळे बाजीप्रभू, तानाजी, हिरोजी, बहिर्जी सारखे पराक्रमी घडले आणि हे स्वराज्य उभे राहिले.

आपल्यातल्या क्रोधास बांध घालून ती ऊर्जा योग्य ठिकणी वापरली तर त्यातून पराक्रमाची ज्योत पेटेल, मग वणवा खूप दूर राहिला.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..