नवीन लेखन...

पुतळे उभारुनी (सुमंत उवाच – १५)

पुतळे उभारुनी काय केले ते सांगा
या एवढ्या समोर नाकर्त्यांच्या रांगा
कसे कोण ठेवील या तुमच्या ढोंगा
मनामधे!

शिवजन्म आज सारे म्हणवुनी घेतो
दिमाखात समाजास सुट्टी ही देतो
खरंच विचार त्यांचे पुढे नेतो?
स्वतःलाच विचारा!

अर्थ-

पुतळे उभारुनी काय केले ते सांगा, या एवढ्या समोर नाकर्त्यांच्या रांगा, कसे कोण ठेवील या तुमच्या ढोंगा, मनामधे!

(एखाद्या व्यक्तीचे पुतळे नुसते जागोजागी उभारले म्हणजे त्यांना आपलंसं केलं असं होतं नाही. दिखावेपण आता लोकांच्या लक्षात यायला लागलंय, त्यामुळे नुसते पुतळ्यांना हार घालून, त्यासमोर घोषणा देऊन आणि त्यानावे गर्दी जमा करून काही होत नाही. या असल्या क्षणिक कांगाव्या समोर जनता आता बधणार नाही तर तुम्हाला त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.)

शिवजन्म आज सारे म्हणवुनी घेतो, दिमाखात समाजास सुट्टी ही देतो, खरंच विचार त्यांचे पुढे नेतो?, स्वतःलाच विचारा!

(शककर्ते शिवराय यांचा आज जन्मदिवस, त्यासाठी सुट्टी अर्पण करून त्याचा गवगवा आणि नुसते नाटकी चेहरे करून काय उपयोग? खरंच आपला समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर जातोय का? आपण स्वतः त्यांच्या विचारांना आपलंसं करून जगतोय का? केवळ नामस्मरण करून त्यातून भक्ती साध्य होत नाही तर त्या नामस्मरणाच्या डोहात मनसोक्त पोहावं लागतं तर त्या नामाशी आपण एकरूप होऊन त्या विचारांवर चालणे सोप्पे होते. नाहीतर तोंडी जय भवानी जय शिवाजी म्हणायचे आणि रात्री त्याच शिवजयंती उत्सवाच्या स्टेज मागे बाटल्या फोडायच्या, अहो रायगडावर छत्रपतींच्या मेघडबरी समोर बसून लोकांना दारू पिताना पकडले म्हणजे पहा! इतका समाज त्यांना क्षणिक मानतो अजून आत्मचिंतनाची गरज नक्की कोणाला आहे हे स्वतःला विचारा.)

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..