नवीन लेखन...

शाप !

पुन्हा, पुन्हा हे असच घडतंय ! मी फारसा आकर्षक चेहरा घेऊन नाही जन्माला आलो . यात माझा काय दोष ? मी कुरूप म्हणून काय मला प्रेम करण्याचा अधिकार नाही का ? या तारुण्यात मलाही कोणाचा तरी हात हाती घेऊन सूर्यास्त पाहावा वाटतो ! […]

एक पाऊल ओल्या वाळूंत – भाग ४

“पुढे काय झालं?” सुरेशने अधीरतेने विचारलं. “हो रे, सांगते नां !” लककीने सुरुवात केली. “याच सुमाराला पप्पांच्या एका नातेवाईकाने डाव साधला. रमेश कामत असं त्याचं नांव. त्याचाही हॉटेल व्यवसाय होता. माझ्या आईशी लग्न व्हावे अशी त्याची इच्छा होती, म्हणजे त्याकाळी त्याला भरपूर हुंडा मिळाला असता, शिवाय आजोबांची इस्टेट. पण दामू आज्जांनी मम्मीकरतां पप्पांची निवड केली हे […]

नाभिकेंद्रांत आत्मा

आत्मा कोठे असतो,     नाभी केंद्रात शोधाल का ? तो तर दिसत नसे,     मग त्यास जाणाल का ?….१, सर्व इंद्रिये वापरली,     परि न झाला बोध, कोठे लपला आहे,    न लागे कुणा शोध….२, विचार आणि भावना,     संबंध त्याचा ज्ञानाशी मेंदूत आहे इंद्रिय,    संपर्क त्यांचा सर्वांशी….३, मेंदूवरी ताबा असे,    नाभीतील मध्य बिंदूचा समजून घ्या सारे,    तेथेच आत्मा देहाचा…४, मातेचे […]

चुकीचे मूल्यमापन

चार कविता सुंदर रचिल्या,  काव्य वाचन केले त्याचे रसिक जनाची स्तुति ऐकूनी,  स्वप्न रंगविले कालीदासाचे….१, कॉलेजातील रंगमंचावरी,  तल्लीन होवूनी भूमिका केली टाळ्याचा तो कडकडाट ऐकूनी, नटसम्राटाची आठवण झाली….२, जमले होते शंभर श्रोते,  भाषण ज्यांचे समोर केले श्रोत्या मधली स्फुर्ति बघूनी,  गांधी नेहरूसम होवूं वाटले…३, यश जेंव्हां पदरी पडते,  भारावूनी जातो आम्ही त्यावेळी कर्तृत्व शक्तीचे मूल्यमापन,  करीत […]

मुंबैची BEST बस..

मला बीयश्टीच्या बसचा प्रवास खुप आवडतो. बसचे डयव्हर-कंडक्टर तर मनुष्य स्वभावाचे नमुने असतातच, पण प्रवासीही काही कमी नसतात. कंडक्टर-प्रवाशांचे होणारे वाद-संवाद तर माणूस किती प्रकारे विचार करु शकतो याचा उत्तम नमुना असतो. मला बसचा प्रवास, त्याच्या गुण-दोषांसकट, समृद्ध करणारा वाटतो. प्रवास कितीही लांबचा असो, वेळ असेल तर मी बसचाच उपयोग करतो. […]

मराठी शाहीर व लोककलाकार विठ्ठल उमप

मराठी शाहीर व लोककलाकार विठ्ठल उमप यांचा जन्म १५ जुलै १९३१ रोजी झाला. आपल्या भारूडाने समस्त मराठी रसिकांना वेड लावणा-या विठ्ठल उमप यांनी आपल्या बहुआयामी कलासाधनेने अवघ्या महाराष्ट्रावर मोहिनी घातली होती. राज्याच्या लोककलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यामध्ये लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं मोठं योगदान आहे. विठ्ठल उमप यांचा मूळचा गळा विदर्भाचा असला, तरी नगर जिल्ह्यातील एका खेड्यात त्यांच्या घराण्याने भेदिकाची […]

…आणि चष्मा लागला

स्थळ ठाणे रेल्वे स्टेशनचा तीन नंबरचा फलाट. तीन नंबरवर येणारी गाडी मी दोन नंबर फलाटावरच येते आहे असे समजून गाडी येणार्‍या फलाटाच्या कडेला जाउुन वाकून बघत होतो. एवढयात दिन्याने नुकत्याच खाल्लेल्या सुप्रसिद्ध कचेरी मिसळीचे उपकार विसरून मी आंधळा असल्याचे फलाटाच्या त्या गर्दीतच जाहीर केले. […]

मेघ बरसला

मेघ बरसला विरही अश्रूंचा खारा खारा. मेघ बरसला प्रथम आषाढी प्रिय वार्तेचा. मेघ बरसला माळात रानात काळा काळा. मेघ बरसला भिजली धरणी हिरवी हिरवी. — विवेक पटाईत

पोळी का करपली ? वेताळ कथा

पोपट नामक एका तरुणाचे लग्न झाले होते . (येथून पुढे याला पोपट्या म्हणायचे . लग्न झालेल्यांना फारशी किंमत द्यायची नसते . जेष्ठ नागरिक झाल्यावर पोपटराव वगैरे म्हणता येईल . तोवर पोपट्याच ! )साधारण चार सहा महिन्यांनी त्याचा  ‘नव्या लग्नाचे ‘नऊ दिवस संपले . आणि त्याला आपल्या बायकोतले काही दोष जाणवू लागले . […]

एकाग्रतेने जगा

जगण्या झाले कठीण क्षण, अन्यायाने सीमा गाठली । चक्र आहे दैव गतीचे, समजूत कुणीतरी मना घातली  ।। जीवन मार्ग सरळ असता,  फेरे पडती नशीबाचे  । अनेक वाटा दिसून येता,  भटकणे मग होई जीवाचे  ।। विसरूनी जातो मार्ग आपला,  तंद्रीमध्ये भटकत असता  । बोलफूकाचे देत राही,  नशीब दैव म्हणता म्हणता  ।। असंख्य वाटा अनेक ध्येये, मिळेल एकची […]

1 4 5 6 7 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..