नवीन लेखन...

व्यक्तिमत्त्वांची साखळी

 

गेल्या आठवड्यातील गोष्ट. मी ऑफिसच्या कामासाठी माझ्या एका छायाचित्रकार- कलाकार मित्राकडे गेलो होतो. इथं गेलं की मला बरं वाटतं. वातावरण बदलतं. वेगळ्या विषयावर गप्पा होतात. यावेळी जाहिरातीचा विषय होता. कॉपी मीच लिहिली होती, आता प्रश्न सजावटीचा होता. मित्रानं साजेशी कल्पना सुचविली. ती अमान्य करण्याचा प्रश्नच नव्हता. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी काही मॉडेल्स हवी होती. मित्रानं त्याच्या मित्राला-पत्नीला बोलावलं, मला म्हणाला तुम्हीही एक मॉडेल! चक्रावून टाकणारा विषय होता पण तयार झालो. झालं फोटोसेशनसाठी तयार झालो. ते संपलही आणि पुढे आले ते रिझल्टस्, माझा फोटो पाहूनही मी मला ओळखू शकलो नाही. इतरही कोणी ओळखू शकेल असे मला वाटत नाही, असं सांगतांना मी बोलून गेलो. टॉप व्हूनं मी तरी स्वतला कुठे पाहिलं होतं. खरंच होतं ते, असा मी मला कधीच दिसला नव्हता, मी पाहिला नव्हता, माझा मीच मला माहीत नव्हतो, छायाचित्रणाच्या प्रक्रियेतून मीच गेलो होतो म्हणून ते मान्य करायचं, काम संपलं, गप्पा संपल्या, पण मनातले संवाद संपलेले नव्हते, आपण स्वत कसे

 

आहोत, हे आपल्याला तरी कळतं कां? आरशात दिसणारा चेहरा हा माझा आहे, असं आपण समजतो तर मग दहा वर्षापूर्वीचे तुम्ही आज असता कां? तसेच असता कां? तुम्ही स्वतला खरोखर सच्चेपणानं संपूर्णपणे पाहता तरी का? बऱयाच वेळा नाही पाहात. कपाळावर येणारे केस मागे सारत असताना डोक्यावर मागच्या बाजूला `चंदादोय’ होत आहे याकडे दुर्लक्ष केलं जातं. एखादं व्यंग असेल तर शक्यतो ते न दाखविणं, लपविणं आणि स्वतही न पाहणच अधिक सोयीचं ठरतं. आपण जिथं स्वतला फिजिकली पहायला तयार नव्हतो तिथं अंतरंगात जाऊन स्वतला न्याहाळणं तर त्याहून दूर.

 

 

मला एक आठवतं, माझ्या आईनं सांगितलं

होतं की वर्षा-दीड वर्षाचा असताना

तू खूप छान दिसायचा. त्यावेळचं माझं एक छायाचित्र मी कोपरगावच्या एका स्टुडिओमध्ये पाहिलं. खरं म्हणजे आईनं सांगितलं म्हणून तो मी होतो, अन्यथा त्या प्रतिमेकडे मी पाहिलंही नसतं. त्या फोटोच्या प्रेमात पडलो मी; पण स्वतच्या प्रेमात नाही पडलो. आजही आठवणींचे गाठोडे सोडताना, लग्नाचे अल्बम पाहताना किंवा सहलीतले मित्र पाहताना आपली नजर जाते ती आपल्या प्रतिमेवर. तो मी असं आपण सांगतो. कारण आज तो मी राहिलेला नसतो. ज्याला आपण हा मी असं म्हणत असतो तो खरोखरच मी असतो का? आपण कोणाला भीत नाही, असं छातीठोकपणे सांगणारी माणसं किती भित्री असू शकतात, हे तुम्हाला थोडं डोळसपणे पाहिलं तरी सापडेल. `आपल्याला कधी राग येत नाही अन् आला तर आपण म्हणजे अगदी हे’ असं म्हणणारा माणूस बायकोच्या भुवईच्या धाकावर आवाज बदलताना आपण पाहतो. थोडक्यात काय तर आपण आपलीच आपल्याला हवी तशी प्रतिमा सुखावली तर आपणही सुखावतो. एखाद्या प्रतिमेत आपण स्वतला पहायला लागलो की आपलं स्वतच असं व्यक्तिमत्त्व तयार होतं. खरं तर हे व्यक्तिमत्त्व त्या-त्या क्षणाचं असतं. माणूस हा काही एक माणूस नसतो, तो म्हणजे विविध व्यक्तिमत्त्वांची साखळी असते. या साखळीतल्या एखाद्या कडीत आपण स्वतला अडकवून नव्या व्यक्तिमत्त्वाचा आनंद घेत नाही. ते व्यक्तिमत्त्व अनुभवत नाही. तो मी काल होतो, आज नाही याचं दुःख आज केलं जातं. उद्या मी असा असेल याचंही दुःख वाटू लागतं. जीवन हा एक अनुभवाचा प्रवास आहे. तो करायचा असेल तर वर्तमानात जगायला हवं. आजच्या स्वतला स्वीकारणं त्यासाठी आवश्यक आहे. भूतकाळाच्या प्रतिमा आणि भविष्यकाळाच्या कल्पनांना विश्राम देऊन आजचा अनुभव घ्यायला हवा. जो वर्तमानात जगतो त्याला स्पर्श करायला दुःखालाही दोनदा विचार करावा लागेल. वर्तमानात जगण्यासाठी स
वतला पाहणं, जाणून घेणंही तितकच महत्त्वाचं आहे. एकदा माझा मी जसा आहे तसा स्वीकारला की मग इतरांनाही तो जसा आहे तसं स्वीकारण्याचं भान येतं. एकदा माणूस, व्यक्ती, घटना किंवा परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारण्याची वृत्ती, प्रवृत्ती आली की मग दुःखाची बातच येत नाही.

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..