नवीन लेखन...

‘चक्र’ – कादंबरी ते चित्रपट

मराठीतील अनेक नामवंत लेखकांच्या कादंबऱ्यावरुन आजवर चित्रपट निर्मिती झालेली आहे. तसाच जयवंत दळवी यांच्या ‘चक्र’ या कादंबरीवरुन १९८१ साली ‘चक्र’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्याविषयीचा दळवींना आलेला अनुभव त्यांनी ‘आत्मचरित्राऐवजी’ या पुस्तकातील एका प्रकरणात मांडलेला, माझ्या वाचनात आला. […]

सोशलमिडिया : वृत्तपत्र, प्रकाशक, थिएटर, डायस – सबकुछ

वृत्तपत्र, प्रकाशक, थिएटर, डायस, सगळ्यांचीच भूमिका एकाचवेळी निभावू शकणारी सोशल मिडिया सध्या जगामध्ये अवतरली आहे. लिहून वाचून मोठी झालेली आमची शेवटची पिढी जोपर्यंत जगात आहे तोवर या सगळ्यांचे अस्तित्व टिकून राहणार आहे. त्यानंतर मात्र अवघड आहे. […]

राज कपूर – निळ्या डोळ्यांचा जादूगार !

त्याच्याबरोबरच भारतीय चित्रसृष्टीतले प्रणयाचे पर्व अस्ताला गेले. अल्लड, खोडकर, बालीश ,धीरगंभीर , उत्कट,मनस्वी,अस्सल हे सारे प्रणयाचे, रोमँटिझमचे रंग हा जादूगार जाताना बरोबर घेऊन गेला. सतत भव्योदात्त असे काहीतरी पाहणारे निळ्या डोळ्यांचे मायाजाल आवरते घेऊन हा अवलिया आपला खेळ संपवून गेलाय. फार कमी नजरांना असे वरदान असते आणि पडलेली स्वप्ने खरी करण्याचे सामर्थ्य असते. […]

गोदावरी

‘अश्रद्धेकडून श्रद्धेकडचा प्रवास’… चित्रपटाचं उपशीर्षक एक प्रकारची हमी, सकारात्मकता देऊन जातं …आमच्यासारख्या सर्व सामान्य प्रेक्षकांना ‘and they lived happily ever after’ ची इतकी सवय आहे कि सिनेमा म्हटलं कि पहिल्यांदाच ‘शेवट गोड होतोय ना ‘ या कडे लक्ष लागून राहतं. ..आणि ते , ‘गोदावरी’ हा चित्रपट पूर्ण करतो.. […]

‘खुशबू’ – भावपाशांचा दस्तावेज !

एकेकाळी जीवन किती सोपे होते आणि त्याचे प्रतिबिंब ज्यात पडायचे ते चित्रपटही किती हृदयस्पर्शी होते याचे उदाहरण म्हणजे “खुशबू” .कोठलाही संदेश नाही, भाष्याचा आव नाही तरीही हा ” भावपाशांचा दस्तावेज ” मनाचा एक कोपरा व्यापून राहतोच. […]

ठाण्यातील नाट्यसंस्था – नाट्यछंदी

प्राथमिक फेरीपासून ते अंतिम फेरीपर्यंत सर्वोत्कृष्ट नाटक, अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना अशी चौफेर पारितोषिके मिळवून ‘नाट्यछंदी’ने नाट्यवर्तुळात आपला दबदबा निर्माण केला. […]

ठाण्यातील नाट्यसंस्था – पूर्णांक

‘पूर्णांक’ने आपल्या नाट्यप्रवासात ‘भक्ष्य’, ‘प्रेक्षकांनी क्षमा करावी’, ‘राक्षस’, ‘म्हातारबाबा कुठे चाललात?’, ‘यू बी द जज’ या एकांकिका आणि ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही नाटके सादर केली. […]

ठाण्यातील नाट्यसंस्था – कलासरगम

1970 च्या सुमारास राज्य नाट्यस्पर्धेभोवती साऱया हौशी रंगकर्मींच्या आशा केंद्रित झाल्या असताना ठाण्यातल्या काही चळवळ्या युवकांनी कलेची सरगम छेडत ‘कलासरगम’ची स्थापना केली. राज्य नाट्यस्पर्धेत नवनवे प्रयोग करत, आधी प्रायोगिक व नंतरच्या काळात समांतर म्हटली जाणारी चळवळ त्यांनी ठाण्यात रुजवली. […]

ठाण्यातील नाट्यसंस्था – आदर्शमित्र मंडळ

हिंदी नाट्यस्पर्धेत भाग घेऊन पारितोषिके मिळवणे ही आदर्श मित्र मंडळाची खासियतच. गडकरी रंगायतन सुरू झाल्यावर ठाणेकर कलाकारांनी सादर केलेले पहिले नाटक केशवराव मोरे यांनीच दिग्दर्शित केले होते. […]

ठाण्यातील नाट्यसंस्था – मित्रसहयोग

मित्रसहयोग’च्या माध्यमातून आपली रंग-कारकीर्द सुरू करणारे आणि नंतर नावारूपास आलेल्या कलाकारांची यादी मोठी आहे. उल्लेख करायचा झाला तर अशोक साठे, रजन ताम्हाणे, प्रबोध कुलकर्णी, प्रतिभा कुलकर्णी, शिरीष लाटकर, पराग बेडेकर, पल्लवी वाघ, अभिजित चव्हाण, गजेंद्र अहिरे यांचा करता येईल. वसंत कामत, नंदकुमार नाईक, अशोक बागवे, श्रीहरी जोशी, श्याम फडके, शिरीष हिंगणे, ॲ‍ड. संजय बोरकर आणि हर्षदा बोरकर हे ‘मित्रसहयोग’चे हक्काचे नाटककार होते. […]

1 6 7 8 9 10 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..