नवीन लेखन...

जयदेव- एक दुर्दैवी संगीतकार

  एक दावा काही लोकं कायम करतात कि तुमच्याजवळ जर प्रतिभा, हुनर असेल तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणी अडवू शकत नाही मग जयदेवजवळ काय नव्हते जे इतर संगीतकारांकडे होते. ज्यांना फक्त दुर्दैवाने साथ दिली? ४२ चित्रपटाना संगीत देऊनही एका खोलीत पेइंग गेस्ट म्हणून राहायची शिक्षा मिळाली. 3 ऑगस्ट 1918 ला नैरोबीत जन्मलेल्या जयदेवनी कुटुंब लुधियानात स्थायिक […]

हिन्दी सृष्टीतील फाईट मास्टर- शेट्टी

हिंदी सिनेमा सृष्टीत अनेक फाईट मास्टर झाले पण त्यात सर्वात नावाजलेला होता शेट्टी. कारण तो फाईट मास्टर शिवाय अभिनेता सुद्धा होता.त्याचे नाव होते मुद्दू बाबू शेट्टी. तो मुळचा मंग्लोरचा.लहानपणी त्याचे अभ्यासात अजिबात लक्ष नव्हते. म्हणून त्याच्या  वडिलांना काळजी होती. त्यांनी त्याला मुंबईला पाठवले.त्यावेळी तो केवळ 9 वर्षाचा होता.मुंबईला आल्यावर काय करायचे हा प्रश्न होता. त्याला कॉटन ग्रीन येथे टाटाच्या canteen मध्ये वेटरची नोकरी मिळाली.जेवण व थोडे पैसे याची सोय झाली.प्रसिद्ध जिम्नॅस्टिक् के.एम.मंडन याची भेट झाली.शेट्टीची शरीरयष्टी बघून त्यांनी त्याला बॉक्सिंग चे ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली.त्यात तो चम्पिअन बनला.सलग आठ वेळा त्याने मुंबईतील बॉक्सिंगची स्पर्धा जिंकली.याच वेळी अभिनेता भगवान यांची नजर त्याच्यावर पडली.त्यांनी शेट्टीला बोलावले व त्यांचे सहकारी बाबुराव पहेलवान यांच्या बरोबर फाईट सीन घेतले व त्याला 200 रुपये दिले. […]

डोळ्यासमोर आई वडिलांची हत्या पाहणारा गीतकार -गुलशन बावरा

गुलशन बावरा यांनी कायम हसती खेळती गाणी लिहिली. पण बालपणाच्या प्रसंगाची व्यथा त्यांना कुठे तरी सलत होती म्हणूनच त्यांनी जंजीर मधले “ बनाके क्यू बिगाडा , बिगाडा रे नासिबा उपरवाले “ हे गाणे लिहिले. त्यांनी अनेक संगीतकाराबरोबर काम केले. पण त्यांचे जास्त  सूर जुळले ते कल्याणजी आनंदजी व आर.डी बर्मन यांच्या बरोबर. त्यांनी जवळ जवळ २४० गाणी लिहिली. त्यांनी हौस म्हणून जवळ जवळ १५ चित्रपटात काम केले.(जंजीर चित्रपटाच्या “दिवाने है दिवानोको न घर चाहिये “ या गाण्यात रस्त्यावर पेटी वाजवताना दिसतात.) […]

बॉलीवूडची मैत्री

मैत्री ही फक्त गंमत मजा यासाठी न मर्यादीत रहाता, एकमेकांचा आधारवड बनू शकते, पडत्याला उभारी देउ शकते व एका ध्येयासाठी सर्वांना एकत्र आणू शकते याचे खूप सुंदर दर्शन या चित्रपटातून आपल्याला घडते. हा सिनेमा व्यवसायीक पातळीवर फार यशस्वी नसला तरी याने समिक्षक व चोखंदळ प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकली होती. फरहान (अभिनयात पदार्पण), अर्जून रामपाल, ल्यूक केनी आणि पूरब कोहली यांनी चारही मित्रांची केमिस्ट्री इतकी सुंदर दाखवलीय की हे चारजण खरेच कॉलेजपासून मित्र होते असे वाटत राहते. मैत्रीत आवडत्या गोष्टी एकत्र येउन करायला स्टेटस, वेळ व वयाचे बंधन नसते हे सिद्ध करणारा चित्रपट होता. […]

‘उरी-दी सर्जीकल स्ट्राइक’

मला वाटते ‘उरी’ या सिनेमाने नव्या भारताने सर्जीकल स्ट्राइक्स करुन शत्रु राष्ट्रांच्या व त्यांनी पोसलेल्या दहशतावाद्यांच्या मनात धडकी भरवण्याचे व भिती बसवण्याचे जे काम केलय ते हुबेहुब या सिनेमात प्रतिबिंबीत केलय. ‘ये नया भारत है..ये घुसेगा भी और मारेगा भी..’ हे वाक्य भारतीय लष्कराने दोन सर्जिकल स्ट्राईक करुन अधोरेखित केलय. त्यामुळेच प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी हा लेख लिहीताना मला हा पूर्णतया नव्या भारताचे प्रतिनिधित्व करणारा सिनेमा वाटतो. […]

निर्मात्याचे संगीतकार – कल्याणजी आनंदजी

कल्याणजी आनंदजी हे निर्मात्यांचे संगीतकार होते.असे म्हणण्याचे कारण ते निर्मात्याला हवे आहे तसे देत असत.थोडक्यात ते बनिया वृत्तीचे होते.आणि स्वताला बनिया म्हणवून घेण्यात त्यांना कमीपणा वाटत नसे. […]

एक रुबाबदार अभिनेता – विनोद खन्ना

गुलजार आपल्या पहिल्या मेरे अपने  चित्रपटासाठी एका वैफल्यग्रस्त तरुणांच्या भूमिकेसाठी शोध घेत होते. त्याच वेळी त्यांची नजर विनोद खन्नावर गेली. त्यांनी त्याला ती भूमिका दिली. त्याच्या या कामाला मिनाकुमारीने सुद्धा दाद  दिली. […]

बॉम्बे टॉकीजची राणी – देविका राणी

हिमांशू रॉय यांच्या निधनानंतर बॉम्बे टोकीज फुटली शशधर मुखर्जी व अशोककुमार त्यातून बाहेर पडले.तरी देविका डगमगली नाही सहायक दिग्दर्शक अमिया चक्रवर्तीला घेऊन चित्रपट काढले १९४५ साली “ज्वारभाटा” काढला. त्यावेळी चक्रवर्तीने “युसुफ खान”नावाच्या एका फळविक्याला आणले. देविका म्हणाली हे नाव चालणार नाही म्हणून त्याचे दिलीपकुमार असे बारसे केले. […]

टर्मिनेटर २ – जजमेंटल डे

साराह कॉनर आणि भविष्यकाळात परग्रहावरुन येणाऱ्या आक्रमणाविरुद्ध मानवी वंशाच्या लढ्याचा नेता म्हणून उदयाला येणार असणारा तिचा जॉन कॉनर हा टिनेजर मुलगा यांची ही कथा. […]

‘३८, कृष्ण व्हिला’ – सुघड साहित्यिक गुंतागुंत !

मराठी रंगभूमीला देखण्या, भारदस्त पुरुष नटांची परंपरा तशी क्षीण ! माझी यादी सुरु होते- सतीश पुळेकर, त्यानंतर जयराम हर्डीकर (दुर्दैववश अपघाती निधन झाल्यामुळे खऱ्या अर्थाने आपण एका बलदंड अभिनेत्याला मुकलो) आणि आता डॉ गिरीश ओक !बालगंधर्वच्या बाहेर डॉ गिरीश ओकांचे हे ५० वे नाटक आहे असा सार्थ आणि गौरवास्पद बोर्ड होता आणि सगळ्या ५० नाटकांची यादीही ! माझ्यासारख्याने त्यातील बहुतांशी पाहिलेली आहेत. […]

1 7 8 9 10 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..