नवीन लेखन...

शैक्षणिक

पडे-झडे माल वाढे

आज कालच्या आया मुलांच्याबद्दल अतीदक्ष असतात, त्या मुळे मुले छोटे छोटे निर्णय घेण्यास असमर्थ ठरत आहेत. उदाहरण द्यायचे तर सातवी आठवीतील मुलांना सुद्धा आया आज हात धरून रास्ता ओलांडून देतात, त्यात मुलगी असेल तर विचारूच नका. हायवे, किव्वा अती वर्दळीचा रस्ता मी समजू शकतो, पण लहान रस्त्यावर सुद्धा हीच स्थिती दिसते. हि स्थिती साधारण मध्यमवर्गीय, उच्च […]

टिप्पणी – ६ : मोहेन-जो-दारो

बातमी : आशुतोष गोवारीकर यांचा ‘मोहेन-जो-दारो’ या सिनेमाबद्दल संदर्भ : ‘लोकसत्ता’ मुंबई आवृत्ती, दि. २४ जुलै २०१६. आजच्या लोकसत्तामध्ये (पुरवणीत) आशुतोष गोवारीकर यांच्या ‘मोहेन जो दारो’ या चित्रपटावर लेख आला आहे. या विषयावर त्यांनी केलेला अभ्यास कौतुकास्पद आहे. या विषयावरील experts ना सुद्धा ते कन्सल्ट करतच आहेत. गेली कांहीं वर्षें मी या संस्कृतीविषयीं वाचन करत आलेलो […]

हरपत चाललेलं समाजभान

दररोज ट्रेनमध्ये एक गोष्ट हमखास दिसू लागलीय. ट्रेनमधेच कशाला, कुठेही हेच दृष्य दिसते..जवळपास प्रत्येकाचे डोळे हातातल्या मोबाईलच्या स्क्रिनमध्ये खिळलेले आणि कानात इअरफोन कानात गच्च बसवलेले..आपण काय करतोय, कुठे आहोत असं ना स्वत:चं भान ना आजुबाजूचं..! गंभिर गोष्ट म्हणजे ह्याला कोणताही वयोगट अपवाद नाही.. डोळे व कान ही अतिशय महत्वाची ज्ञानेद्रीये आहेत. बाहय जगाचं भान ही ज्ञानेद्रीये […]

भारतरत्न – देशाचा सर्वात मोठा नागरी सन्मान

भारतरत्न हा देशाचा सर्वात मोठा नागरी सन्मान असून जीवनच्या कुठल्याही क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी तो दिला जातो. १९५४ मध्ये हा सन्मान सुरू झाला. वंश, व्यवसाय, लिंगभाव यावर आधारित भेदभावाशिवाय तो पात्र व्यक्तीस दिला जातो. पंतप्रधान भाररत्नसाठी व्यक्तींच्या नावाची शिफारस करतात. इतर औपचारिक शिफारशींची गरज नसते. एका वर्षांत तीन जणांना भारतरत्न देता येते. भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीला सनद (प्रमाणपत्र) […]

बृहन्महाराष्ट्र व महाराष्ट्रीयत्व

बृहन्महाराष्ट्र हा जो शब्द आजकाल सर्वत्र वापरात आहे, त्याबद्दल प्रथमच एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, ‘महाराष्ट्र’ ही एक भौगोलिक, सांस्कृतिक, आणि आतां राजकीयही, संकल्पना आहे ; परंतु ‘बृहन्महाराष्ट्र’ ही केवळ सांस्कृतिक संज्ञा आहे. भूगोलाच्या दृष्टिकोनातून बघायचें झाल्यास, बृहन्महाराष्ट्रीय म्हणजे, ‘ज्यांनी किंवा ज्यांच्या पूर्वजांनी महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात स्थलांतर केलेले आहे, असे महाराष्ट्रीय जन’, असें म्हणायला हरकत नाहीं. तेव्हां, बृहन्महाराष्ट्राबद्दल चर्चा करतांना, आधी आपण महाराष्ट्र, महाराष्ट्रीय व महाराष्ट्रीयत्व या शब्दांचा विचार करायला हवा. […]

आंबा – भारताचे राष्ट्रीय फळ

भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत शत्रू असले तरी एक अशी वस्तू आहे जी दोघांमध्ये समान आहे. आंबा हे भारत व पाकिस्तान यांचे राष्ट्रीय फळ आहे. आंब्याचं झाड हे बांगलादेशाचे राष्ट्रीय झाड आहे आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्हही आहे. आंब्यांचा उगम – आंबा हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे एक फळ आहे. आंब्यांचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे, परंतु […]

माझा गुन्हा एकच होता ! वरील प्रतिक्रिया

६ मे २०१६ रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एका संस्थेतर्फे ‘स्वयंसिध्द शेतकरी’ ही माझी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यशाळेत कर्नाटकातून आलेल्या दोन महिला कृषी संशोधकांशी माझी ओळख करून देण्यात आली. त्यातील एका संशोधकाने कथन केलेली तिची दुर्दैवी कहाणी (कागदोपत्री पुरावे माझ्या हातात आल्यानंतर) १२ मे २०१६ रोजी मी फेसबुकवर पोस्ट केली. व्हॉट्सऍपशी माझा दुरूनही […]

माझा गुन्हा एकच होता !

मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातील उदगीरला आयोजित करण्यात आलेली ‘स्वयंसिध्द शेतकरी’ ही कार्यशाळा सुरु होण्याआधी सभागृहातील त्या दोघींनी माझं लक्ष वेधून घेतलं. त्या मान खाली घालून बसल्या होत्या व त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात उत्साह नव्हता. कार्यशाळा सुरु होण्याआधी आयोजकांनी त्यांचा परिचय करून दिला. त्या कर्नाटकातील कृषी शास्त्रज्ञ होत्या व अकरा तासांचा प्रवास करून स्व-खर्चाने तिथे आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या अत्यंत […]

पाणीबचतीचा हासुद्धा भन्नाट मार्ग

शाळेतल्या मुलांच्या पाण्याच्या बाटल्या घरी जाताना बहुतेकवेळा अर्ध्या भरलेल्या असतात. घरी गेल्यावर हे पाणी बेसीनमध्ये ओतून टाकलं जातं. ते अर्थातच वाया जातं. हजारो मुलांकडून असं हजारो लिटर पाणी वाया जातं… तेही दररोज. यावर पुण्यातल्या पिंपरीमधल्या एका शाळेने एक नामी शक्कल लढवली. “सिटी प्राईड स्कूल” ही ती शाळा. त्यांनी असा नियम केला की सगळ्या मुलांनी घरी जाताना […]

शिव दुग्धाभिषेक – सत्य घटनेवर आधारित

सन १९७०-७२चा काळ.  जुन्या दिल्लीत  नवी बस्तीतून एक गल्ली नया बाजार कडे  जाते, त्या गल्लीत एका घरात राधा-कृष्णाचे  मंदिर होते. मंदिराच्या  प्रांगणात  शिवपंचायत हि होती. भक्त गण आधी महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक / जलाभिषेक करायचे आणि नंतर राधा-कृष्णाचे दर्शन घेत असे.  मंदिर निजी संपती असली तरी जवळपासच्या भक्तांसाठी   मंदिर सकाळी १० पर्यंत  उघडे राहात होते.  मंदिराच्या […]

1 157 158 159 160 161 168
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..