नवीन लेखन...

पाणीबचतीचा हासुद्धा भन्नाट मार्ग

A New way adopted by a school to save water

शाळेतल्या मुलांच्या पाण्याच्या बाटल्या घरी जाताना बहुतेकवेळा अर्ध्या भरलेल्या असतात. घरी गेल्यावर हे पाणी बेसीनमध्ये ओतून टाकलं जातं. ते अर्थातच वाया जातं. हजारो मुलांकडून असं हजारो लिटर पाणी वाया जातं… तेही दररोज.

यावर पुण्यातल्या पिंपरीमधल्या एका शाळेने एक नामी शक्कल लढवली. “सिटी प्राईड स्कूल” ही ती शाळा. त्यांनी असा नियम केला की सगळ्या मुलांनी घरी जाताना बाटलीतलं उरलेलं पाणी शाळेतच ठेवलेल्या एका पिंपात जमा करायचं. असं जमा केलेलं पाणी शाळेच्या बागेतल्या झाडांना घातलं जातं.

आतापर्यंत जितकं पाणी जमा केलंय त्यावरुन अंदाज काढलाय की एका वर्षात या एकाच शाळेत किमान १ लाख लिटर्स पाणी जमा होईल.

आता जवळपासच्या इतरही शाळांनी त्यांचा कित्ता गिरवायला सुरुवात केलेय.

अशा शाळांच्या व्यवस्थापनाचे आणि त्यातील मुलांचेही कौतुक केले पाहिजे. पाणी तयार तर करता येत नाही, पण वाचवता तर येते.. वाचवलेला एक-एक थेंब महत्त्वाचा आहे…

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..