नवीन लेखन...

खैय्याम

काही संगीतकारांच्या मनात काही राग हे कायमचे वस्तीला आलेले असतात आणि त्यांचे प्रारूप, त्यांच्या स्वररचनांमधून आपल्याला सारखे जाणवत असते. खैय्याम यांच्याबाबत हे विधान काहीसे ठामपणे करता येईल. “पहाडी” सारखा लोकसंगीतातून स्थिरावलेला राग, त्यांच्या गाण्यांतून बरेचवेळा डोकावत असतो, अर्थात चालींचे वेगळेपण राखून. काहीवेळा त्यांच्यावर टीका देखील झाली परंतु एखाद्या रागावर अनन्वित श्रद्धा असेल तर त्याच रागातून किती […]

थेंबभर

ग्लासभर व्हिस्की, थेंबभर पाणी रोज ग्लास मी सात-आठ हाणी होणारच, झाले आजार डॉक्टरनें केलें बेजार ‘हें खा, तें घ्या, तें नको’ कंटाळुन गेली बायको तरिही अजुन मी भरतो पेला ग्लासभर पाणी, थेंबभर हाला. – हाणणें : भरपूर रिचवणें हाला : मद्य – सुभाष स. नाईक ( ९८६९००२१२६)

सिंघम

पाहत असतां सिनेमा ‘सिंघम’ अविरत चघळत होतो चिंगम हाणामारी दावी पडदा जोरानें मी करी ओरडा चिंगम चिकटे गळ्यात धावत गेलो इस्पितळात. – चिंगम : Chewing Gum – सुभाष स. नाईक ( ९८६९००२१२६)

व्यायाम केलाच पाहिजे का?

‘आरोग्यम् धनसंपदा-’ या उक्तीचा साक्षात्कार झाला की मी व्यायाम चालू करतो आणि ते वेळापत्रक दोन दिवसात कोलमडते. एरव्ही व्यायामाची मला आवड आहे अशातला भाग नाही. कोणतरी हार्टफेलने गेला किंवा कुणाचे बीपी वाढलेले कानावर आले की मी नेमाने व्यायाम सुरू करतो. आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवायचेच म्हणून आपोआप आतून स्फुरण येते, पण ते फारच कमी टिकते. […]

आज जडी-बूटी दिवस

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हि आयुर्वेदावर अनुसंधानचे कार्य फारच कमी झाले. त्याचे मुख्य कारण आंग्ल भाषेत कार्य करणाऱ्या कार्यपालिकेची गुलाम मानसिकता. विदेशी औषधी कंपन्यांचा दबाव आणि राजनेत्यांची अनिच्छा (आज हि जीएसटी एलोपेथी औषधींंवर ४ टक्के आणि भारतात निर्मित आयुर्वैदिक औषधींवर १८ टक्के) विचित्रच आहे ना. एकीकडे आयुर्वेदिक कंपन्यांंची अनुसंधानवर अब्जावधी रुपये खर्च करण्याची क्षमता नाही, दुसरीकडे सरकारस्तरावर कुठलीही अपेक्षा ठेवणे व्यर्थ. हि आजची परिस्थिती. […]

एक काल्पनीक पत्र

दिल्लीमध्ये नुकतेच झालेले तीन भूकबळी. त्याबद्दलची अस्वस्थता मांडण्याचा केलेला प्रयत्न […]

प्रेमाचा निर्मळ झरा

शब्दांच्या मायावी सागरात मुक्त पणे विहरावे… उपहासाच्या लाटांना हलकेच शिताफीने चुकवावे अंतर्मनी विश्वासाचा रहावा कायम खोलावा विरहाचा खोल भोवरा… अलगद पणे चुकवावा आनंदाच्या तुषारांनी रोमांचित होउन उठावे अपमानाचे ते शिंतोडे… अलगद पुसून काढावे उन्मादाच्या फेसाळ बुडबुड्यास व्यर्थ हवा नाही द्यायची अहंकाराच्या दगडाची ठेच… तटस्थ पणे चुकवायची कौतुकाच्या वर्षावांनी हर खुन बहकुन नाही जायचं वादळी आरोपांच्या कणांनी […]

अनंत हे अनंतात विलीन झाले

समस्त जीवांस अक्कलकोट मध्ये प्रत्यक्ष दिसणारी परब्रह्म मूर्ती चैत्र वद्य त्रयोदशी, सहवद्य चतुर्दशी, शके १८००, सन १८७८ ला समाधी लीलेचे निमित्त करून पृथ्वीतला वरून गुप्त झाली. […]

गीत तुझे माझे

गीत माझेच मी गात असता का लागती ना सूर माझे आज प्रथमच तुझ्याविना मी प्रेमगीत गातोय माझे । मैफीलही तीच आहे सखे रात्रही तशीच आहे परी आज माझ्या सुरांना ना पुर्वीचे ते माधुर्य आहे । गेलीस मजसी सोडून तू शब्दही पोरके करुन माझे कसे रसिकांना मग भावतील ज्यात नाहीत स्वर तुझे । शब्दांना माझ्या सवय होती […]

वाचा आणि विचार करा

आज मराठी सृष्टीवर श्री. जयवंत वानखडे ( रहाणार : कोपरना) यांची एक सुंदर गझल (गज़ल) वाचली. कोपरना महाराष्टात कुठे आहे, मला माहीत नाहीं.( हा हन्त हन्त !) . मात्र तें, मंबई-पुणे-नागपुर-कोल्हापुर-सोलापुर-नाशिक-औरंगाबाद-रत्नागिरी वगैरेंसारखे नाहीं, हें मात्र मला कळतें आहे. वानखडे प्रोफेशननें कवी नाहींत. ते शाळेचे मुख्याध्यापक होते. हें सर्व लिहिण्यांचें कारण की, मनाला भिडेल असें कांहींहीं लिहायला […]

1 18 19 20 21
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..