नवीन लेखन...

वाचा आणि विचार करा

आज मराठी सृष्टीवर श्री. जयवंत वानखडे ( रहाणार : कोपरना) यांची एक सुंदर गझल (गज़ल) वाचली. कोपरना महाराष्टात कुठे आहे, मला माहीत नाहीं.( हा हन्त हन्त !) . मात्र तें, मंबई-पुणे-नागपुर-कोल्हापुर-सोलापुर-नाशिक-औरंगाबाद-रत्नागिरी वगैरेंसारखे नाहीं, हें मात्र मला कळतें आहे. वानखडे प्रोफेशननें कवी नाहींत. ते शाळेचे मुख्याध्यापक होते. हें सर्व लिहिण्यांचें कारण की, मनाला भिडेल असें कांहींहीं लिहायला व्यवसाय, निवासाचें गांव/शहर अशा गोष्टी आड येत नाहींत.

– मराठी सृष्टीच्या वाचकांनी मूळ गझल वाचावी. तसें तर, सुंदर बांधलेल्या गझला बरेच जण लिहितात, ( हें मी एक गझलप्रेमी व गझलगो म्हणुन सांगत आहे). पण त्यांतही, एखादा शेर मनाला असा भिडतो की, ‘वाह् क्या बात है!’ असा उद्गार काढणेंही आपण विसरून जातो. इथें माजें तेंच झालें.

– वानखडे यांच्या गझलचा अंतिम शेर पहा –

‘भूकेस शरण गेली आज माय कोणी
ओट्यात (ओच्यात ?) दडवलेले पाव पाहिले मी’ .

एक आई आपल्या भुकेल्या कच्चा-बच्चांसाठी, कुणीतरी तिला दिलेले , किंवा कुणीतरी फेकून दिलेले, किंवा तिनें चोरलेले, पाव दडवून नेते आहे ! चोरले असतील तर, तौ ते पाव दडवणारच. पण चोरले बसले, आणि तरीही ती दडवत असली तर तें अधिकच करुण आहे, कारण तिला त्याची स्वत:लाच लाज वाटते आहे . रस्त्यात किंवा कचर्‍यात कुणीतरी अर्धवट खाऊन फेकलेले पाव, किंवा बुसटलेले म्हणून कुणीतरी फेकून दिलेले पाव नेणें, हें लज्जास्पसदच की ! गरिबांनाही अब्रू असतेच ! फक्त , ती त्यांना गुंडाळून बाजूला ठेवावी लागते,केवळ नाइलाजानें.

– भारतातील बहुतांशी अस्तित्वात असलेल्या या ‘कुरूप सत्या’चें ( अग्ली ट्रुथ) वानखडे यांनी अल्प शब्दांमध्ये अगदी तथार्थ दर्शन घडवलें आहे.

– आपण सिनेमात अशी दृश्यें पाहतो , की एका कुणीतरी ( सहसा लहान मुलानें किंवा मुलीने, किंवा आई किंवा बापानें, ) एक पाव चोरला, मग मार खाल्ला , वगैरे वगैरे. त्यावेळी आपण तें दृश्य पाहतो, आणि नंतर विसरूनही जातो, कारण सिनेमा हा केवळ कल्पनेचा खेळ आहे ! मात्र, वानखडे यांनी केलेला उल्लेख वाचला तर स्पष्ट जाणीव होते की हें, आणि केवळ हेंच, आपल्या देशातले सत्य आहे!

आज आय्. टी. वगैरेंमुळे मध्यमवर्गीयांना भरपूर पगार मिळताहेत ( अर्थात, माझी त्याबद्दल अजिबात तक्रार नाहींच ), पण होतें काय की , त्यामुळे, देशातील अन्यांच्या दैन्यावस्थेकडे आपलें दुर्लक्ष तर होत नाहीं ना ? अशा वेळी वानखडे यांचा शेर आपल्याला अंतर्मुख करतो; मला केलें, तुम्हांलाही करेल.

– या प्रसंगीं मला असाच एक शेर आठवला, जो मी बर्‍याच वर्षांपूर्वी वाचला होता, हृदयाला भिडला होता, व आजही तो माझ्या मनावर परिणाम करतो. श्री. अनिल कांबळे यांच्या एका गझलमधील तो शेर असा आहे –

‘खोकल्यानें बाप मेला, माय आजारात गेली
घेउनी देहास आपल्या, लेक बाजारात गेली’

किती विदारक सत्य ! नेकेड-अग्ली ट्रुथ !

– अखेरीस : ‘सोशली सिग्निफिकंट’ शेरासाठी वानखडे यांचे अभिनंदन आनि आभारही.

— सुभाष स. नाईक,
मुंबई, पुणें.
९८६९००२१२६

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..